शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

सहकार खात्यातील कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन आजपासून

By admin | Updated: April 1, 2016 01:07 IST

सहकारी संस्थांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ होऊन त्याचा फायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला व्हावा या उद्देशातून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली.

कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य : काळ्या फिती लावून केले आंदोलनभंडारा : सहकारी संस्थांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ होऊन त्याचा फायदा राज्यातील सर्वसामान्य जनतेला व्हावा या उद्देशातून सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली. परंतु शासन व जनतेची दिशाभूल करून सहकार खात्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजामध्ये गुंतवून शासनाची व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यात आली. त्याचा परिणाम सहकारी संसथांच्या गुणात्मक व संख्यात्मक वाढीवर होऊन सर्वसामान्य जनतेच्या ठेवी बुडणे, बेकायदेशिर सावकारी, विकासकांकडून फसविले जाणे असा विपरीत परिणाम झाला आहे.राज्यातील सहकार विभागातील कर्मचाऱ्यांना एकाचवेळी नियमित कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त संस्था सर्वेक्षण, अवसायन कामकाज, प्रशासक, ८९-अ तपासण्या, निवडणुका आदी कामे वर्ग तीन कर्मचारी करीत असताना कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या, कामांची संख्या व जबाबदारी याचा बिलकुल विचार न करता सर्व कामे एकाचवेळी उरकण्याच्या आग्रहास्तव कर्मचाऱ्यांना कारवाईची भिती दाखवून त्यांच्याकडे असलेल्या कामाच्या संख्येचा विचार न करता सर्व कामे एकाच वेळी पूर्ण करण्याच्या घाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य आले असून त्यांना शारीरिक व मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. त्यामुळे कर्मचारी आत्महत्येसारख्या मार्गाचा अवलंब करू लागले आहेत. वारंवार कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांची पदे कमी करून वर्ग एकपेक्षा वरील अधिकाऱ्यांची पदे वाढविण्याचा प्रकार होत आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेने केलेल्या पत्रव्यवहारावर कारवाई होत नाही. अडचणींबाबत बैठका होऊनसुद्धा सदर सभेचे इतिवृत्त पाठविले जात नाही. आश्वासनांची पुर्तता केली जात नाही. महाराष्ट्र राज्य सहकार खाते गट क कर्मचारी संघटनेने सभासदांच्या मागणीस्तव आवाहन केल्यानुसार राज्यातील सर्व वर्ग - ३ चे कर्मचाऱ्यांनी ३० व ३१ मार्च रोजी काळ्या फिती लावून आंदोलन केले. आता १ एप्रिलपासून लेखणी बंद आंदोलन करण्याचा ईशारा महाराष्ट्र राज्य सहकार खाते गट क कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनुप भांडारकर यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)