शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

ढगाळ वातावरणाचा धानाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. सुरूवातीच्या काळाला धान्य बियाण्यांची लागवड करण्यात आली. मात्र पाऊस बरसला नसल्याने हातात आले पºहेही करपले. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. वेळप्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात धानाची रोवणीही सुरू झाली. पावसाचा सातत्यपणा असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : काढणीला आलेला धान पावसात भिजण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन धान कापणी हंगामाच्या तोंडावर ढगाळ वातावरणाने धानावर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी बरसलेल्या परतीच्या पावसामुळे धान पीक जमिनदोस्त झाले आहे. परिणामी बळीराजासमोर पुन्हा अस्मानी संकट उभे ठाकले असून कृषी विभाग मात्र बिनधास्त दिसून येत आहे.जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. सुरूवातीच्या काळाला धान्य बियाण्यांची लागवड करण्यात आली. मात्र पाऊस बरसला नसल्याने हातात आले पºहेही करपले. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. वेळप्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात धानाची रोवणीही सुरू झाली. पावसाचा सातत्यपणा असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत धानावर कुठलेही संकट दिसले नाही. मात्र सप्टेंबर महिन्याच्या चवथ्या आठवड्यापासून धानपिकावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव दिसून आला. दुसरीकडे जिल्हा कृषी विभागाने सबसिडीवर शेतकºयांसाठी औषधी उपलब्ध करून न दिल्याने बळीराजाला पुन्हा आर्थिक फटका सहन करावा लागला. जिल्ह्यासह तालुका पातळीवर शेतकºयांची महागडी औषध खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली. त्यातच बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडत गेला.ज्या शेतकºयांना परवडत होते अशांनी धानावर फवारणी करून हातात आलेले पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दुसरीकडे धानावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव कायम असतानाच मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शनिवारी काही भागात सुसाट वाºयासह पावसाने हजेरी लावली. चौरास पट्ट्यात धानपिकाची नासाडी झाली. काही ठिकाणी कापूण ठेवलेल्या धानाच्या पेंढ्या ओल्या झाल्या. पाऊस अधिक बरसल्यास कापलेल्या पेंढ्या अधिक ओल्या होवून धान पाखर होण्याची भीतीही शेतकºयांनी व्यक्त केली आहे.काही तालुक्यात कृषी अधिकारी बांध्यावर जावून शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहे. परंतु तालुक्यातील सर्वच शेतशिवारात जावून शेतकºयांना मार्गदर्शन केले जाऊ शकत नाही. अशा स्थितीत इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे.रोग व किडीच्या प्रादूर्भावाने धानपिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना अधिकारी मात्र सर्व आलबेल आहे, असे सांगत आहेत. यंदा धान पीक बºयापैकी होण्याची आशा असताना आता काढणीच्या वेळी ढगाळी वातावरणाने चिंता वाढविली आहे.तूर पिकावरही संक्रांतजिल्ह्यात धान पीक लागवड होत असताना जागेच्या बांध्यावर तूर पिकाची लागवड केली जाते. सध्या तुरीला फूल उमलू लागली आहेत. अशा स्थितीत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचा हा बार झडू लागला आहे. परिणामी तूर पिकाच्या उत्पादनात घट तर होणार नाही ना, अशी चिंताही शेतकरी व्यक्त करीत आहे. तुरीवरही किडीचा प्रादूर्भाव जाणवत आहे.

टॅग्स :agricultureशेती