शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

ढगाळ वातावरणाचा धानाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST

जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. सुरूवातीच्या काळाला धान्य बियाण्यांची लागवड करण्यात आली. मात्र पाऊस बरसला नसल्याने हातात आले पºहेही करपले. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. वेळप्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात धानाची रोवणीही सुरू झाली. पावसाचा सातत्यपणा असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : काढणीला आलेला धान पावसात भिजण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऐन धान कापणी हंगामाच्या तोंडावर ढगाळ वातावरणाने धानावर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यातच काही ठिकाणी बरसलेल्या परतीच्या पावसामुळे धान पीक जमिनदोस्त झाले आहे. परिणामी बळीराजासमोर पुन्हा अस्मानी संकट उभे ठाकले असून कृषी विभाग मात्र बिनधास्त दिसून येत आहे.जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात येते. सुरूवातीच्या काळाला धान्य बियाण्यांची लागवड करण्यात आली. मात्र पाऊस बरसला नसल्याने हातात आले पºहेही करपले. बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. वेळप्रसंगी वरूणराजाने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यात धानाची रोवणीही सुरू झाली. पावसाचा सातत्यपणा असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत धानावर कुठलेही संकट दिसले नाही. मात्र सप्टेंबर महिन्याच्या चवथ्या आठवड्यापासून धानपिकावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव दिसून आला. दुसरीकडे जिल्हा कृषी विभागाने सबसिडीवर शेतकºयांसाठी औषधी उपलब्ध करून न दिल्याने बळीराजाला पुन्हा आर्थिक फटका सहन करावा लागला. जिल्ह्यासह तालुका पातळीवर शेतकºयांची महागडी औषध खरेदी करण्यासाठी लगबग दिसून आली. त्यातच बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडत गेला.ज्या शेतकºयांना परवडत होते अशांनी धानावर फवारणी करून हातात आलेले पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. दुसरीकडे धानावर तुडतुड्याचा प्रादूर्भाव कायम असतानाच मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत शनिवारी काही भागात सुसाट वाºयासह पावसाने हजेरी लावली. चौरास पट्ट्यात धानपिकाची नासाडी झाली. काही ठिकाणी कापूण ठेवलेल्या धानाच्या पेंढ्या ओल्या झाल्या. पाऊस अधिक बरसल्यास कापलेल्या पेंढ्या अधिक ओल्या होवून धान पाखर होण्याची भीतीही शेतकºयांनी व्यक्त केली आहे.काही तालुक्यात कृषी अधिकारी बांध्यावर जावून शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहे. परंतु तालुक्यातील सर्वच शेतशिवारात जावून शेतकºयांना मार्गदर्शन केले जाऊ शकत नाही. अशा स्थितीत इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती शेतकºयांसमोर निर्माण झाली आहे.रोग व किडीच्या प्रादूर्भावाने धानपिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना अधिकारी मात्र सर्व आलबेल आहे, असे सांगत आहेत. यंदा धान पीक बºयापैकी होण्याची आशा असताना आता काढणीच्या वेळी ढगाळी वातावरणाने चिंता वाढविली आहे.तूर पिकावरही संक्रांतजिल्ह्यात धान पीक लागवड होत असताना जागेच्या बांध्यावर तूर पिकाची लागवड केली जाते. सध्या तुरीला फूल उमलू लागली आहेत. अशा स्थितीत ढगाळ वातावरणामुळे तूर पिकाचा हा बार झडू लागला आहे. परिणामी तूर पिकाच्या उत्पादनात घट तर होणार नाही ना, अशी चिंताही शेतकरी व्यक्त करीत आहे. तुरीवरही किडीचा प्रादूर्भाव जाणवत आहे.

टॅग्स :agricultureशेती