शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले ...

भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले पीक पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे हरभरा, गहू व कांदा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात धुके वाढले आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना तीन दिवसांपासून सर्वदूर धुके दाटत आहे. गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकरी त्रस्त झाले होते. त्यात पुन्हा आता धुक्याची भर पडली आहे. तीन दिवसांपासून धुके पडत असून, सकाळी तर धुक्याची जाड चादरच निर्माण झालेली दिसते. गहू व कांदा पिकांसाठी धुके धोकादायक समजले जात असून, परिणामी रब्बी पिकांना फटका बसत आहे.

खरीप हंगामात निसर्गाच्या वक्रदृष्टीने धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले. आता रब्बी पिकांवर आस असताना हरभरा, गहू व कांदा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक कसे वाचवावे, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- उमराव मस्के, शेतकरी खुटसावरी.

हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी क्विनालफाॅस २५ टक्के, ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के, एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल १८.५ टक्के, एससी २.५ मिलि प्रती दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी.

-हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, भंडारा