शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले ...

भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले पीक पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे हरभरा, गहू व कांदा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात धुके वाढले आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना तीन दिवसांपासून सर्वदूर धुके दाटत आहे. गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकरी त्रस्त झाले होते. त्यात पुन्हा आता धुक्याची भर पडली आहे. तीन दिवसांपासून धुके पडत असून, सकाळी तर धुक्याची जाड चादरच निर्माण झालेली दिसते. गहू व कांदा पिकांसाठी धुके धोकादायक समजले जात असून, परिणामी रब्बी पिकांना फटका बसत आहे.

खरीप हंगामात निसर्गाच्या वक्रदृष्टीने धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले. आता रब्बी पिकांवर आस असताना हरभरा, गहू व कांदा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक कसे वाचवावे, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- उमराव मस्के, शेतकरी खुटसावरी.

हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी क्विनालफाॅस २५ टक्के, ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के, एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल १८.५ टक्के, एससी २.५ मिलि प्रती दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी.

-हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, भंडारा