शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले ...

भंडारा : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून पडणाऱ्या दाट धुक्यामुळे गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. हाता-तोंडाशी आलेले पीक पुन्हा निसर्गाच्या अवकृपेमुळे वाया जाते की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वातावरणातील बदलामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे हरभरा, गहू व कांदा पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यातील अनेक भागात धुके वाढले आहेत. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा कडाका वाढत असताना तीन दिवसांपासून सर्वदूर धुके दाटत आहे. गत काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाने शेतकरी त्रस्त झाले होते. त्यात पुन्हा आता धुक्याची भर पडली आहे. तीन दिवसांपासून धुके पडत असून, सकाळी तर धुक्याची जाड चादरच निर्माण झालेली दिसते. गहू व कांदा पिकांसाठी धुके धोकादायक समजले जात असून, परिणामी रब्बी पिकांना फटका बसत आहे.

खरीप हंगामात निसर्गाच्या वक्रदृष्टीने धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले. आता रब्बी पिकांवर आस असताना हरभरा, गहू व कांदा पिकांवर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक कसे वाचवावे, यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

- उमराव मस्के, शेतकरी खुटसावरी.

हरभरा पिकावरील घाटेअळीच्या नियंत्रणासाठी क्विनालफाॅस २५ टक्के, ईसी २० मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के, एसजी ३ ग्रॅम किंवा क्लोरानट्रनिलीप्रोल १८.५ टक्के, एससी २.५ मिलि प्रती दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यावी.

-हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, भंडारा