शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस

By admin | Updated: May 9, 2016 00:24 IST

मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारला सकाळपासून निरभ्र वातावरण होते.

जनजीवन विस्कळीत : शेतातील कापणी झालेल्या पिकांचे नुकसान, विजेचा लपंडावभंडारा : मागील तीन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज रविवारला सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होवून जिल्ह्यात काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह रिमझीम तर भंडारा शहरात मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसाचा रबी पिकांना जबर फटका बसला असून शेतक-यांची धावाधाव झाली. भंडारा शहरात ३.२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कारधा पर्जन्यमान खात्याने केली.‘मे हिट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच नागरिक उष्णतेच्या काहिलीने त्रस्त झाले होते. सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाची प्रखरता जाणवत असल्याने नागरिकांनी घराबोहर पडने बंद केले होते. अशा स्थितीत मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वीजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. भंडारा शहरात रविवारला सकाळपासून निरभ्र वातावरण होते. मात्र दुपारी साडेतीन वाजतापासून वातावरणात बदल घडला. ढग दाटून आल्यानंतर वादळी वारा सुरु झाला. दुपारी ४ वाजेपासून अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून सर्वसामान्यांना काही प्रमाणात का होईना तो उकाड्यापासून दिलासा देणारा ठरला आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडीत झाला होता.साकोलीत सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. आज आठवडी बाजार असल्याने बाजारात खरेदी-विक्रीसाठी आलेल्यांची चांगलीच धावपड झाली. वादळी पावसाने छोट्या व्यावसायिकांची दुकानांमध्ये नागरिकांनी आश्रय घेतल्याने सर्वांची तारांबळ उडाल्याचे एकच चित्र दिसून येत होते. भारतीय हवामान विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार दि. ९ मे पर्यंत विदर्भात गारपीटसह पाऊस पडणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (शहर प्रतिनिधी)नागरिकांची त्रेधातिरपीटभंडारा शहराचा रविवारी आठवडी बाजार असल्याने व उद्या सोमवारला अक्षय्य तृतीय सणाची खरेदी करण्याकरिता अनेक कुटुंब दुपारीच बाजारपेठेत गेले होते. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी करताना त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी मिळेल तिथे त्यांनी आश्रय घेऊन स्वत:चा पावसापासून बचाव केला. अवकाळी पावसामुळे अक्षय्य तृतीयेच्या खरेदीवर परिणाम पडला. शेतातील पिकांचे नुकसानरबी हंगामातील चणा, धान, ज्वारी, जवस आदी पिकांना या पावसाचा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी रबी पिकाची कापणी करुन शेतात साठा केला होता. मात्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची यावेळी तारांबळ उडाली. यासोबतच विटाभट्टी व्यवसायीकांना याचा भटका बसला असून वीटभट्टी मालकांचे हजारोंचे नुकसान झाले आहे. तुमसरात पाऊस, पालांदूरात वादळभंडारा शहरासह तुमसर तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे येथील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी बळीराजासाठी तो नुकसानीचा ठरला आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे वादळाने हजेरी लावली. यामुळे छोट्या व्यावसायिकांमध्ये छप्परे उडण्याची भीती निर्माण झाली होती. वादळानंतर रिमझीम पावसाने हजेरी लावली.