शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ढग जमतात, पण पाऊस बरसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:32 IST

आकाशात ढग दाटून येतात, सोबत मंद वारा वाहतो. क्षणात पाऊस येईल अशी आस मनात तयार होते.

बळीराजा चिंतातूर : २५ टक्के रोवणी पूर्ण, दुबार पेरणीचे संकटमुखरू बागडे। लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : आकाशात ढग दाटून येतात, सोबत मंद वारा वाहतो. क्षणात पाऊस येईल अशी आस मनात तयार होते. ढगांना पोहण मिळते आणि बघता बघता ढग पुढे पुढे सरकत जातात. मनातली अभिलाशा मनातच विरते. पाऊस रिमझिम पडतो न पडतो पुन्हा गायब आणि आकाश निरभ्र होतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षित पाऊस पडत नसल्याने बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे.मागील तीन वर्षाची परिस्थिती बघता खरीबाच्या आरंभाला पऱ्हे भरणीपर्यंत पाऊस मेहरबान असतो. नंतर मात्र दोन-तीन नक्षत्र अक्षरश: रडवतो. याही हंगामात तीच अवस्था असून पुनर्वसू नक्षत्र सुरु असून १५ जुलैपासून पालांदुरात ३६६.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असूनही नदी नाले कोरडे पडलेले आहेत. ही चुलबंदच्या खोऱ्यातील वास्तविकता आहे.पालांदूर मंडळ कृषी सर्वेनुसार सुमारे २३०० हेक्टरची रोवणी पूर्ण झाली आहे. १७४९ एकुण हेक्टरपैकी १०६९३ हेक्टरवर भात (धान) लागवडीखाली नियोजित केली असून नर्सरीचे नियोजन केले आहे. ६७६ हेक्टरमध्ये आवल्याची पेरणी केली आहे. ७१० हेक्टरमध्ये बांधावर तुर पिकाचे नियोजन असून १३ हेक्टरमध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे. कोरडवाहू शेतकरी रोवणी पूर्वीची संपूर्ण मशागत आटोपून रोवणीची वाट पाहत आहे. निसर्गाच्या अशाच दृष्टचक्राने शेतकरी खरेच कर्जबाजारी होत असून शासन, प्रशासन ही मात्र त्याची चेष्टा करताना दिसतो. कर्जमाफीला अटी व शर्तीची लगाम लावत फसवी कर्जमाफी असल्याची टीका जनसामान्यातून उमटत आहे. बाजारभावाचा अभ्यास करता दोन पैसे अधिक मिळविण्याच्या आशेने हायब्रिड धानाचा पेरा यंदा वाढला आहे. या धानाला विशिष्ट दिवसातच लावले तर अपेक्षित उत्पन्न मिळते. मात्र फसव्या मान्सूनमुळे अधिक उत्पन्नाची आशा फोल ठरत आहे. शेतकरी नव्याने काही करू अपेक्षितो. मात्र पराधिनतेने सर्वकाही मातीमोल ठरत आहे. प्रशासन मात्र कागदावरच अंदाज बांधत आहे. सेवा सहकारी संस्थेंतर्गत चालू हंगामात पीक विमा न काढण्याचा ठराव घेऊन वरिष्ठांना कळविले असूनसुद्धा शासन मात्र सरसकट जबरानजोत पंतप्रधान पीक विमा कर्ज रकमेच्या दोन टक्क्यांनी रक्कम काढण्याचा आदेश दिला आहे. २ टक्के कर्जाच्या रकमेवरील पीक विम्याचा हप्ता खूप मोठी रक्कम होत असून शेतकऱ्यांना नाहक यात गुंतवून त्याची आर्थिक लुट केली जात आहे. पिकविमा हा ऐच्छिक असावा, त्याची जबरदस्ती नसावी अशी आर्त मागणी शेतकरी करीत आहे. लोकप्रतिनिधींनी तरी या मुद्याला हात घालून शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्या, अशी मागणी आहे. पावसाने पाठ दाखविल्याने परिसरातील बळीराजा पुरता हतबल झालेला आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी रोवणी आटोपती घेतली. मात्र, पावसाच्या प्रतिक्षेतील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट घोंगावत आहे.