शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:21 IST

वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात तीन वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील ६५ महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे. नगर परिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून तब्बल ६८ लाख ७७ हजार रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कुणालाही झाला नाही.

ठळक मुद्देसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : ७० लाखांचा खर्च व्यर्थ, ६८पैकी तीन कॅमेरे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी शहरातील विविध चौकात तीन वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील ६५ महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यांपैकी केवळ तीनच कॅमेरे कार्यरत असल्याची माहिती आहे. नगर परिषदेने नाविण्यपूर्ण योजनेतून तब्बल ६८ लाख ७७ हजार रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कुणालाही झाला नाही.नगर परिषदेच्या वतीने नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निश्चित करण्यात आले. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने ७२ लाख १९ हजार रुपयांचा खर्चाला मंजूरी प्रदान केली. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळवून एका कंत्राटदाराला सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे कंत्राट देण्यात आले. शहरातील १७ चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. देखभाल दुरुस्तीची व्यवस्थाही करण्यात आली. या कॅमेरांचा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला. यातून संपूर्ण शहरावर तिसºया डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरु झाले. पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होवू लागली. परंतु देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे चालेनासे झाले. आता नादुरुस्ती झालेल्या कॅमेराकडे कुणी लक्षही देत नाही. शहरातील ६८ पैकी केवळ तीन कॅमेरे सुरु आहेत. नगर परिषदेने नामवंत कंपनीचे कॅमेरे खरेदी केले असतांना काही महिन्यातच कॅमेरे नादुरुस्त झाले. त्यामुळे कॅमरेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.येथे लागले होते सीसीटीव्ही कॅमेरेखांबतलाव चौक, छोटा बाजार चौक, एमआयडीसी वसाहत, हत्तीखाना चौका, सामान्य रुग्णालय चौक, नागपूर नाका चौक, पोस्ट आॅफीस चौक, मिस्कीन टँक चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक, बसस्थानक चौक, मोठा बाजार चौक, गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, शितलामाता चौक, त्रिमुर्ती चौक, शास्त्री चौक या ठिकाणी कॅमेरा लावण्याचे निश्चीत झाले. बहुतांश ठिकाणी कॅमेरे लावण्यातही आले.हल्लेखोरांना पकडण्यात आले होते यशभंडारा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गुन्हेगारांना वटणीवर आणण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश आले होते. शहरात घडलेल्या प्रिती पटेल व शिंदे कुटूंबावरील हल्ल्यातील आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनेच गाठले होते. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने त्यावेळी कुणीही गुन्हा करतांना दहावेळा विचार करीत होता. पंरतु आता कॅमेरेच बंद झाल्याने गुन्हेगारांना मोकळे रान झाले आहे.