शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

आॅनलाईन परीक्षा पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:13 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही.

ठळक मुद्दे प्रशासनाकडे निवेदन : कौशल्य विकास मंत्र्यांकडे मागणी

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने ३५ व्यवसाय प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर परीक्षा आॅनलाईन पद्धतीने होणार आहे. आयटीआयच्या प्रत्येक विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असणारच असे नाही. त्यामुळे आयटीआयच्या विद्यार्थ्यांची आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.जिल्हाधिकाºयांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांची सेमिस्टर सैद्धांतिक परीक्षा ओएमआर सिटचा वापर करून ५ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. परंतु याबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. या परीक्षेच्या स्वरूपाबाबत प्रशिक्षणार्थी अनभिज्ञ आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या परीक्षेबाबत अचानक निर्णय आल्याने प्रशिक्षणार्थी भयभित झाले आहेत. पूर्व सूचना न देता व पूर्व तयारी न करता शेवटच्या क्षणी सेमिस्टरच्या आॅनलाईन परीक्षा पद्धतीमुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. आयटीआय अंतर्गत अनेक प्रशिक्षणार्थी दहावी उत्तीर्ण असतात तर काही प्रशिक्षणार्थी दहावी अनुत्तीर्ण असतात. त्यामुळे प्रत्येकच विद्यार्थ्याला संगणकाचे ज्ञान असेलच असे नाही. संगणकाचे ज्ञान असेल तरीसुद्धा एकाएकी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांवर आॅनलाईन परीक्षा थोपविण्याचे काम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केले आहे. त्यामुळे आयटीआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून आॅनलाई परीक्षा बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली.निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांनी स्वीकारले. निवेदन देताना आयटीव्हीओ कार्यकर्ते विनोद मडावी, अंकूश कोकोडे, अधिर गेडाम, पीतांबर हरो, शरद वेलादी, राहूल पेंदाम, सावन चिकराम, शेषराव गावडे, रत्नमाला आत्राम, शीतल पेंदाम, स्वाती कोडाप, पूजा उईके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.परीक्षा धोरणात विसंगतीचा आरोपएकाच व्यवसायाच्या सेमिस्टरच्या प्रशिक्षणार्थ्यांची परीक्षा जिल्हा केंद्रावर आॅनलाईन पद्धतीने व तालुका केंद्रावर ओएमआर शिटचा वापर करून आॅफलाईन पद्धतीने घेणे हे धोरण विसंगत व समान न्याय व्यवस्थेत भेदभावपूर्ण असल्याची भावना प्रशिक्षणार्थ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे परीक्षा स्वरूपात बदल करीत असताना तज्ज्ञ समिती नेमून प्रशिक्षणार्थ्यांचा शैक्षणिक स्तर, प्रशिक्षणार्थ्यांस स्तर पारदर्शकता आदी बाबींचा विचार करून परीक्षा द्यावी, आॅनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.