शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

हातपंपावर महिलांना दिले स्वच्छतेचे धडे

By admin | Updated: February 26, 2017 00:30 IST

शाळेच्या मागील बाजूला हातपंपावर महिला पाणी भरत होत्या. हातपंपालगत व सभोवती घाण पसरली होती. काही महिला पाण्याचे गुंड तिथे धूत होत्या.

सुकळीत महिलांनी दिली साद : पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन, विविध प्रश्नांच्या उत्तरांनी महिलांचे समाधानभंडारा : शाळेच्या मागील बाजूला हातपंपावर महिला पाणी भरत होत्या. हातपंपालगत व सभोवती घाण पसरली होती. काही महिला पाण्याचे गुंड तिथे धूत होत्या. काही अंतरावर कपडे धुणे सुरु होते. अशा अस्वच्छतेमुळे आरोग्यावर परिणाम होतात, याची कल्पनाच महिलांना नसल्याने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी महिलांना स्वच्छतेचे धडे दिले.स्वच्छतेचे महत्व महिलांना सांगितले आणि क्षणात महिलांनी स्वत: हातपंपाची स्वच्छता केली. हा प्रसंग होता पंचायत समिती तुमसर अंतर्गत ग्राम पंचायत सुकळी येथील. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतावर हातपंप असो व विहिर असो, यावर कपडे, भांडेकुंडे, पाण्यासाठी वापरात यणारे माठही त्याच ठिकाणी स्वच्छ केल्या जातात, हे चित्र सर्वत्र बघायला मिळते. असेच चित्र तुमसर पंचायत समिती सुकळी दे. येथे आढळून आले. वैयक्तिक शौचालय बांधकामाची पाहणी व ज्या कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही त्या कुटुंबांना भेटी देवून शौचालयाकरिता प्रोत्साहित करण्यात येत होते. दरम्यान शालेय परिसरातील कुटुंबांना भेटी दरम्यान रस्त्यालगत दुपारच्या सुमारास हातपंपवर काही महिला पाणी भरत होत्या. काही महिला कपडे धूत होत्या. हातपंपवर व सभोवती घाण पसरली होती. त्याच स्थितीत महिला पाणी भरत होत्या. परंतु त्या ठिकाणी असलेली घाण मात्र कोण स्वच्छ करणार असा प्रश्न होता. पाण्याचा माठ कितीही स्वच्छ केला परंतु त्याच्या बुडाला जर घाण लागत असेल, हातपायाद्वारे ती घाण जर घरात जात असेल तर ते पाणी स्वच्छ समजायचे काय? असा प्रश्न होता. अखेर त्या ठिकाणी जावून महिलांना हातपंपावरील घाणीबाबत अवगत केले असता, साहेब आम्हीच भरतो का पाणी, पुष्कळ महिला पाणी भरतात, ग्रामपंचायतीने स्वच्छ करावी, महिलांनीही स्वच्छ करावी, आम्हीच का म्हणून स्वच्छ करायचे असे अनेक प्रश्न उपस्थित होते. यावेळी माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, पाणी गुणवत्ता सल्लागार पौर्णिमा डुंभरे, ग्रामपंचायत कर्मचारी तेजराम नेरकर यांची उपस्थिती होती. विविध प्रश्न उपस्थित करीत असलेल्या महिलांना पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताबद्दल राजेश येरणे, पौर्णिमा डुंभरे यांनी विचारणा केली. पिण्याचे स्त्रोत कुणाकरिता, पाणी कोण वापरते, घाणीद्वारे अशुद्ध पाणी कोणाच्या घरी जाते, अशुद्ध पाण्याचा त्रास कुणाला सहन करावा लागतो, बोअरवेलवर घाणीसाठी कोण जबाबदार आहे असे अनेक प्रश्न त्यांना विचारून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याद्वारेच देण्यात आली. मग सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला कुटुंबाला त्रास होणार असेल तर स्वच्छतेसाठी महिलांनी पुढाकार का घेऊ नये, पिण्याचे शुद्ध म्हणून आपण भरतो तर त्या पाण्याची शुद्धता का जपू नये असे पटवून देत महिलांना स्वच्छतेची महती सांगितली. उपस्थित महिलांना त्याची महती पटली अािण आश्चर्य झाले. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन. हातपंपावरची घाण स्वच्छ केली. सभोवतीचा परिसर स्वच्छ केला. संपूर्ण हातपंपाची स्वच्छता केल्याशिवाय पाणी भरले नाही. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही स्वच्छता केली व हातपंपाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सरपंच बांडेबुचे आले त्यांनाही पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताबाबद स्वच्छतेसाठी सांगण्यात आले. यावेळी महिलांनी स्वच्छतेच्या कार्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पण या प्रसंगामुळेच त्या महिलांच्या मनातील नकारात्मक असलेले स्वच्छतेचे महत्व सकारात्मकरित्या पटवून देण्याचे आल्याचे समाधान यावेळी पहायला मिळाले. पाण्याची स्त्रोतांची स्वच्छता महिलांच्या पुढाकारातून झाली तर ग्रामपंचायतीला त्यावर वेगळा पैसा खर्च करावा लागणार नाही. त्याहीपेक्षा स्त्रोतांचे पाणी चांगले राहील व विविध उपक्रम राबविण्यासाठी लोकसहभाग तयार होईल. (शहर प्रतिनिधी)