शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

बाहेरचं स्वच्छ अन् घरचं खरखटं ठेवायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:48 IST

गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते.

ठळक मुद्देकान्हळगावचा कारभार : गावात अस्वच्छता व रोगराई

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते. घरचे खरखटं ठेवायचे अन् बाहेरचे स्वच्छ करायचे असंच चित्र सध्या कान्हळगाव / सिरसोली येथील गावात होत आहे.कान्हळगाव (सिरसोली) येथील सरपंच गावी राहत नाही. मोहाडी येथे राहून गावाचा कारभार चालवित आहेत. गावातील एकही नाल्या स्वच्छ केलेल्या नाहीत. कोणत्याही वॉर्डात जा, कुठे नाल्या रेती मातीने बुजलेल्या तर कुठे पाण्याने साचलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी नाल्या आहेत काय याचा शोध घेण्यास उशिर लागतो. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी नाल्यावरच अतिक्रमण केले आहे.नालींमध्ये पाणी साठवण होत आहे. त्यामुळे नालींमधील पाण्याचा निचरा होत नाही. त्या कारणाने मोठ्या प्रमाणात नाल्या डासांची निर्मिती केंद्र बनली आहेत. स्वाभाविकच गावातील जनतेला रोगराईचा सामना करावा लागत आहे. गावातील कचरा कधीच साफ केला जात नाही. त्यामुळे चौकात व वाटेने कचरा पडलेला दिसतो.आठवडी बाजारातील कचरा कधीच साफ केला जात नाही. नवीन नालीचे बांधकाम केले जाते. मात्र ज्या नाल्या तयार झाल्या आहेत त्यातील पाणी प्रवाहित होतो काय? कुठे नाल्या बुजल्या आहेत याची साधी पाहणीही गावातील सरपंच करीत नाही. सरपंच मोहाडी येथे राहत असल्याने गावाचा कारभार असाच सुरु आहे. गावातील समस्या, जनतेच्या समस्या जाणून घेण्याची वेळ कधीच सरपंच यांना मिळत नाही.सिरसोली / डोंगरला या टी पॉइंटवर अकरा वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. त्यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले यांनी भूमिपूजन केले होते. पण त्यानंतर गावाच्या सत्तेत आलेल्या सरपंचांनी कवडीचाही लक्ष दिला नाही. आधी पती व आता पत्नीच्या हाती गावचा कारभाराची सूत्रे हे गावकऱ्यांनी सोपविली. पण मोहाडी येथे राहून सरपंच गावाचा विकास साधत नसल्याचे गावकऱ्यांना दिसू लागले आहे. त्या गुरुदेव चौकात काही लोकांनी जनावरे बांधण्याचा काम चालविला आहे. गुरुदेव चौक नामकरण झालेल्या जागेत जनावरांचे शेण, मुत्र त्या भूमिपूजनाच्या दगडावर जात आहे. अशावेळी तरी सरपंचांनी लक्ष देणे आवश्यक होते. पण केवळ सत्ता गाजवायचे, गावाच्या अस्वच्छतेकडे लक्ष द्यायचे नाही असाच विचार सरपंच करीत आहेत. मात्र घरच्या शेजारील नाली साफ करून फोटो काढायची व स्वच्छता करीत असल्याचे भासवून फुकटची प्रसिद्धी मिळवून स्वत:च्या पाठीवर शाबासकीची थाप स्वत:च द्यायचा प्रकार दिसून आला आहे. गावातील सर्व नाल्या मोकळ्या करण्यात याव्या व गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.