शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

बाहेरचं स्वच्छ अन् घरचं खरखटं ठेवायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 21:48 IST

गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते.

ठळक मुद्देकान्हळगावचा कारभार : गावात अस्वच्छता व रोगराई

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : गावात रेती मातीने नाल्या बुजल्या आहेत. नालीत पाणी अडून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे आजार बळावत आहेत. तथापि बाहेरच्या नगरातील नाल्या साफ करून प्रसिद्धी मिळविली जाते. घरचे खरखटं ठेवायचे अन् बाहेरचे स्वच्छ करायचे असंच चित्र सध्या कान्हळगाव / सिरसोली येथील गावात होत आहे.कान्हळगाव (सिरसोली) येथील सरपंच गावी राहत नाही. मोहाडी येथे राहून गावाचा कारभार चालवित आहेत. गावातील एकही नाल्या स्वच्छ केलेल्या नाहीत. कोणत्याही वॉर्डात जा, कुठे नाल्या रेती मातीने बुजलेल्या तर कुठे पाण्याने साचलेल्या दिसून येतात. काही ठिकाणी नाल्या आहेत काय याचा शोध घेण्यास उशिर लागतो. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी नाल्यावरच अतिक्रमण केले आहे.नालींमध्ये पाणी साठवण होत आहे. त्यामुळे नालींमधील पाण्याचा निचरा होत नाही. त्या कारणाने मोठ्या प्रमाणात नाल्या डासांची निर्मिती केंद्र बनली आहेत. स्वाभाविकच गावातील जनतेला रोगराईचा सामना करावा लागत आहे. गावातील कचरा कधीच साफ केला जात नाही. त्यामुळे चौकात व वाटेने कचरा पडलेला दिसतो.आठवडी बाजारातील कचरा कधीच साफ केला जात नाही. नवीन नालीचे बांधकाम केले जाते. मात्र ज्या नाल्या तयार झाल्या आहेत त्यातील पाणी प्रवाहित होतो काय? कुठे नाल्या बुजल्या आहेत याची साधी पाहणीही गावातील सरपंच करीत नाही. सरपंच मोहाडी येथे राहत असल्याने गावाचा कारभार असाच सुरु आहे. गावातील समस्या, जनतेच्या समस्या जाणून घेण्याची वेळ कधीच सरपंच यांना मिळत नाही.सिरसोली / डोंगरला या टी पॉइंटवर अकरा वर्षापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या स्मारकासाठी जागा राखून ठेवण्यात आली होती. त्यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले यांनी भूमिपूजन केले होते. पण त्यानंतर गावाच्या सत्तेत आलेल्या सरपंचांनी कवडीचाही लक्ष दिला नाही. आधी पती व आता पत्नीच्या हाती गावचा कारभाराची सूत्रे हे गावकऱ्यांनी सोपविली. पण मोहाडी येथे राहून सरपंच गावाचा विकास साधत नसल्याचे गावकऱ्यांना दिसू लागले आहे. त्या गुरुदेव चौकात काही लोकांनी जनावरे बांधण्याचा काम चालविला आहे. गुरुदेव चौक नामकरण झालेल्या जागेत जनावरांचे शेण, मुत्र त्या भूमिपूजनाच्या दगडावर जात आहे. अशावेळी तरी सरपंचांनी लक्ष देणे आवश्यक होते. पण केवळ सत्ता गाजवायचे, गावाच्या अस्वच्छतेकडे लक्ष द्यायचे नाही असाच विचार सरपंच करीत आहेत. मात्र घरच्या शेजारील नाली साफ करून फोटो काढायची व स्वच्छता करीत असल्याचे भासवून फुकटची प्रसिद्धी मिळवून स्वत:च्या पाठीवर शाबासकीची थाप स्वत:च द्यायचा प्रकार दिसून आला आहे. गावातील सर्व नाल्या मोकळ्या करण्यात याव्या व गाव स्वच्छता मोहीम हाती घेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.