शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

जमुनिया गावात स्वच्छ भारत अभियान

By admin | Updated: November 15, 2014 01:20 IST

जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे.

काचेवानी : जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे. तिरोडा तालुक्यात स्वच्छ भारत अभियानास ८ तारेखपासून सुरूवात करण्यात आली असून ११ नोव्हेंबरपर्यंत सदर अभियान राबविण्यात आले. जमुनिया येथे नोडल अधिकारी कृषी सहायिका हर्षविणा पडारे यांच्यामार्फत स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करण्यात आली आली. या कार्यक्रमात संरपच तोमेश्वरी पटले, सदस्य नीता परतेती, पोलीस पाटील भाऊ गजभिये, अंगणवाडी सेविका विजयालक्ष्मी तुरकर, तंमुसचे दिगंबर रहांगडाले, कल्पना रहांगडाले, टेकचंद भैरम, जितेंद्र रहांगडाले, राधेश्याम रहांगडाले, हेमराज पटले आणि गंगा पटले या अभियानात प्रामुख्याने सहभागी झाले. स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या दिवसापासून गावातील रस्ते, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक शौचालय, मुत्रालय, अंगणवाडी इमारत, स्वयंपाक गृह इत्यादींची सफाई करण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानाकरिता नोडल अधिकारी म्हणून हर्षविणा पढारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आभियानासाठी हर्षविणा पढारे या मार्गदर्शन करीत असून स्वत: स्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात ग्रा.पं. सदस्य, महिला मंडळ कार्यकर्त्या, गावातील नागरिक प्रामुख्याने आणि स्वेच्छेने भाग घेत असल्याची माहिती हर्षविणा पढारे यांनी लोकमतला सांगितली आहे. गोंदिया : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फुलचूर येथे ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अंतर्गत जि.प. सदस्य राजेश चतुर यांनी शाळेला भेट दिली व शाळा स्वच्छता अभियानात भाग घेऊन मार्गदर्शन केले. शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या व इतर सुखसुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापक सी.व्ही. मेश्राम यांनी एक निवेदनसुध्दा दिले. या स्वच्छता अभियान अंतर्गत शालेय पटांगणाची साफसफाई करण्यात आली. सदर अभियानसाठी आर.एच. रहांगडाले, पी.के. गहेरवार, जी.बी. बोपचे, एस.बी. रामटेके, जी.बी. मेंढे, डी.एम. बागडे या सर्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष येमेंद्र येरकडे व रामेश्वर दहीकर, बेबी, सुलोचना येरकडे व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)