शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

जमुनिया गावात स्वच्छ भारत अभियान

By admin | Updated: November 15, 2014 01:20 IST

जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे.

काचेवानी : जवळच्या जमुनिया येथे स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ ग्राम अभियान सुरू करण्यात आले आहे. तिरोडा तालुक्यात स्वच्छ भारत अभियानास ८ तारेखपासून सुरूवात करण्यात आली असून ११ नोव्हेंबरपर्यंत सदर अभियान राबविण्यात आले. जमुनिया येथे नोडल अधिकारी कृषी सहायिका हर्षविणा पडारे यांच्यामार्फत स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात करण्यात आली आली. या कार्यक्रमात संरपच तोमेश्वरी पटले, सदस्य नीता परतेती, पोलीस पाटील भाऊ गजभिये, अंगणवाडी सेविका विजयालक्ष्मी तुरकर, तंमुसचे दिगंबर रहांगडाले, कल्पना रहांगडाले, टेकचंद भैरम, जितेंद्र रहांगडाले, राधेश्याम रहांगडाले, हेमराज पटले आणि गंगा पटले या अभियानात प्रामुख्याने सहभागी झाले. स्वच्छ भारत अभियानाच्या पहिल्या दिवसापासून गावातील रस्ते, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक शौचालय, मुत्रालय, अंगणवाडी इमारत, स्वयंपाक गृह इत्यादींची सफाई करण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानाकरिता नोडल अधिकारी म्हणून हर्षविणा पढारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आभियानासाठी हर्षविणा पढारे या मार्गदर्शन करीत असून स्वत: स्वच्छता अभियानात सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात ग्रा.पं. सदस्य, महिला मंडळ कार्यकर्त्या, गावातील नागरिक प्रामुख्याने आणि स्वेच्छेने भाग घेत असल्याची माहिती हर्षविणा पढारे यांनी लोकमतला सांगितली आहे. गोंदिया : जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फुलचूर येथे ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अंतर्गत जि.प. सदस्य राजेश चतुर यांनी शाळेला भेट दिली व शाळा स्वच्छता अभियानात भाग घेऊन मार्गदर्शन केले. शाळेतील पिण्याच्या पाण्याची समस्या व इतर सुखसुविधा लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी मुख्याध्यापक सी.व्ही. मेश्राम यांनी एक निवेदनसुध्दा दिले. या स्वच्छता अभियान अंतर्गत शालेय पटांगणाची साफसफाई करण्यात आली. सदर अभियानसाठी आर.एच. रहांगडाले, पी.के. गहेरवार, जी.बी. बोपचे, एस.बी. रामटेके, जी.बी. मेंढे, डी.एम. बागडे या सर्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष येमेंद्र येरकडे व रामेश्वर दहीकर, बेबी, सुलोचना येरकडे व सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)