शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सीसीटिव्हीच्या निगराणीत दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 06:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाने चार वर्षापुर्वी जांभोरा येथील जय संतोषी माँ विद्यालयाला दहावीचे परीक्षा केंद्र दिले. सरस्वती विद्यालय जांभोरा, जिल्हा परिषद विद्यालय पालोरा आणि जय संतोषी माँ विद्यालयासाठी हे परीक्षा केंद्र आहे. तीनही शाळांचे २४० विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार आहे.

ठळक मुद्देजांभोरातील उपक्रम : ग्रामपंचायत देणार यंत्रणा उपलब्ध करून, जिल्ह्यातील पहिले केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपाययोजना करीत आहे. त्याला सहकार्य म्हणून मोहाडी तालुक्यातील जांभोरा ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून दहावीच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या निगराणीत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वीत करून दिली जाणार आहे. अशापद्धतीने परीक्षा घेणारे जांभोरा हे जिल्ह्यातील एकमेव केंद्र ठरणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाने चार वर्षापुर्वी जांभोरा येथील जय संतोषी माँ विद्यालयाला दहावीचे परीक्षा केंद्र दिले. सरस्वती विद्यालय जांभोरा, जिल्हा परिषद विद्यालय पालोरा आणि जय संतोषी माँ विद्यालयासाठी हे परीक्षा केंद्र आहे. तीनही शाळांचे २४० विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार आहे. परीक्षा केंद्र मिळाल्यापासून भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेतली जात आहे. मात्र कुठलाही गैरप्रकार होवू नये म्हणून जांभोराचा सरपंच भुपेंद्र पवनकार यांनी पुढाकार घेतला. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही यंत्रणा लावून देण्याची तयारी दर्शविली. यासाठी त्यांनी शिक्षक आणि पालकांना विश्वासात घेतले. काहींनी सुरूवातीला विरोध दर्शविला. मात्र मुख्याध्यापिका सिंधु गहाने यांनी या निर्णयाचे स्वागत करून सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आता जांभोरा येथील परीक्षा केंद्रावर सीसीटिव्हीच्या निगरानीत दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. एखाद्या सरपंचाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुढाकार घेण्याची ही जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील पहिली घटना असावी.परीक्षा मंडळाकडून सीसीटिव्ही कॅमेराबाबत विचारणा करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापन समितीकडून कॅमेरे बसविणे विचाराधीन होते. पोलीस ठाण्याकडूनही तशी सूचना मिळाली होती. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही लावल्यानंतर विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी होईल. अभ्यास जिद्दीने करतील.-सिंधू गहाणे, मुख्याध्यापिका.कॉपीमुक्त परीक्षा व्हावी. विद्यार्थ्याानी भयमुक्त परीक्षा द्यावी यासाठी आपण पुढाकार घेतला. सीसीटिव्ही यंत्रणा आपण कार्यान्वित करून देणार आहोत. विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करावा आणि उत्तम गुण मिळावे ही त्यामागची भूमिका आहे. परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील.-भूपेंद्र पवनकार, सरपंच जांभोरा.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही