शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील चौक ठरताहेत नावापुरते

By admin | Updated: October 25, 2015 00:38 IST

शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार भंडारावासीयांना नित्याचाच झाला आहे.

  चौकांना अतिक्रमणाचा विळखा :

बॅनर, पोस्टर्सही हटविणे आवश्यक, वाहतूक समस्या ठरतेय नागरिकांना डोकेदुखी

लोकमत जागर

भंडारा : शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार भंडारावासीयांना नित्याचाच झाला आहे. शहरात वाहतुकीचे संचलन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची कुमक कमी असल्याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसून चालक वाहन पळवितात. बेफाम वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाईची मागणी होत आहे. शहराची लोकसंख्या सव्वा लाखांहून अधिक आहे. भंडारा शहरातून राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग जातात. यामुळे जडवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. वाढते अपघात आणि राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीची समस्या निकाली काढण्यासाठी उड्डाणपुल बांधण्याची गरज आहे. वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. शहरातील अंतर्गत रस्ते वाहतुकीला अपूरे पडत आहेत. शहरातील मार्गावर धावणारे वाहनांची संख्या वाढली. मात्र रस्त्यांची रूंदी कायमच असल्याने अनेक वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी येथील प्रमुख मार्ग व चौकात वाहतूक पोलीस राहत असूनही चालकांना पुढाकार घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी लागत आहे. भंडारा शहरात येथे १० ते १५ वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्तीची गरज व्यक्त होत आहे. तसेच पार्किंग झोन तयार केल्यास ही समस्या निकाली निघु शकेल. अतिक्रमण हटविल्यास रस्त्याचे रूंदीकरण करण्यास वाव राहिल. बसस्थानक परिसरात आॅटोसह अन्य खासगी वाहनांच्या रांगा लागत असल्याने वर्दळीकरिता रस्ताच शिल्लक नसतो. कशीबशी वाट काढून चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. चौकांचे विद्रुपीकरण होर्डिंग्जमुळे त्रिमूर्ती चौकाचे विद्रुपीकरण झाले आहे. भंडारा शहरात पालिकेच्या यादीनुसार लहान मोठे २५ च्यावर चौक आहेत. यामध्ये महात्मा गांधी चौक, राजीव गांधी चौक, अण्णाभाऊ साठे चौक, लायब्ररी चौक, त्रिमूर्ती चौक, शास्त्री चौक, नागपूर नाका चौक, जिल्हा परिषद चौक, असे मुख्य चौक आहेत. त्रिमूर्ती चौकाच्या मधोमध गोलाकार अस्तित्वात आहे. मात्र या चौकात ट्रॅफिक सिग्नल अस्तित्वात नाही. पालिकेच्या यादीत पालिकेच्या यादीत महापुरूषांचे पुतळे असलेल्या १२ चौकांचा समावेश आहे. मात्र एकदोन सोडले तर बहुतेक पुतळ्यावरील धूळही साफ होत नाही. पादचाऱ्यांसाठी आवश्यक झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे प्रत्येक चौकातून गायब आहेत, वाहतुकीचे नियम सांगणारे चिन्हांचे फलक किंवा रस्त्यांची माहिती दर्शविणारे फलक कुठेही आढळत नाहीत. याउलट जाहिरातींच्या फलकांनी अक्षरश: बाजार मांडलेला आहे. असावे स्मार्ट थांबे चौकाच्या थोड्या अंतरावर संबधित मागार्ने जाणाऱ्यांसाठी आॅटो थांबा असावा. जड वाहने, कार आणि दुचाकींसाठी विशिष्ट जागी उभे राहण्याची नियमावली असावी. जेणेकरून गोंधळ उडणार नाही. शहरातून जड वाहतुकीला पायबंद घालण्यात यावे. जिल्हा परिषद चौकातून राजीव गांधी चौक मार्गे शास्त्री चौकाकडे जड वाहने धावतात. नागपूर नाका मार्गे ही वाहने गेली तर सोयीचे होईल.