शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाहतुकीचा बट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:54 IST

स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही.

ठळक मुद्देपार्र्किं गचा प्रश्न : खड्डेमय अर्धवट रस्त्यांची समस्या, नागरिक झाले त्रस्त

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही. परिणामी वाहतुकीचा कोंडमारा होत असतून कोणत्या रस्त्याने जावे अशा प्रश्न वाहनधारकांना सारखा सतावत असतो.शहरातील जिल्हा परिषदचौक ते खात रोड या रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे. सहा महिन्यापुर्वी या कामाला प्रारंभ झाला. सुरुवातीला काही कारणास्तव काम रोखण्यात आले. त्यानंतर कामाने वेग घेतला परंतू महिना संपलातरी काम पूर्णच झाले नाही. या रस्त्यावर शहरातील सर्वाधिक वाहतुक असते. परंतू रस्ता एका बाजूने खोदलेल्या आहे. त्या रस्त्यावरुन चालताना अनेकदा कसरत करावी लागते. मोठे वाहन आले की तासनतास् वाहतूक ठप्प होते. राजीव गांधी चौकात तर वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. कोण कोणत्या बाजूने येईल याचा नेम नाही. चुकीच्या बाजूने वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी होते. भर उन्हात दुचाकीस्वारांना कोंडीत फसावे लागते. साई मंदिर रोड, शितलामाता चौक येथेही असाच अनुभव येतो.रस्त्याच्या कामाने वाहतुक कोंढी हा प्रकार समजूनही घेता येईल. मात्र शहरातील इतर भागातही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील गांधी चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी पार्र्किंगची व्यवस्थाच नाही. अनेक व्यावसायीकांची आपली दुकाने रस्त्यावर थाटली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बाजार, बसस्टँड, मुस्लिम लायब्ररी चौकात जाणाºया रस्त्यावर सिग्नल व्यवस्था नाही. रस्त्यावर मनमर्जीने वाहन चालविले जातात. शहरात वाहतुक पोलिसांची नियुक्ती असली तरी तेही हतबल झाल्याचे दिसून येतात. विशेष म्हणजे बसस्थानक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, साई मंदिर या परिसरात शाळा, बँका, हॉस्पीटल अनेक शोरुम आहेत. त्यामुळे वर्दळ असते त्या वर्दळीत अपघात होण्याची कायम भीती असते.अधिकृत पार्किंग गरजेचीशहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, शितलामाता मंदिर, मेन बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. नो पार्किंग असलेल्या ठिकाणी वाहने उभे केली जातात. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करीत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहने अधिक आहेत. रस्ते गुळगुळीत करताना पार्किंगचीही सुविधा गरजेची झाली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी