शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शहरातील वाहतुकीचा बट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:54 IST

स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही.

ठळक मुद्देपार्र्किं गचा प्रश्न : खड्डेमय अर्धवट रस्त्यांची समस्या, नागरिक झाले त्रस्त

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही. परिणामी वाहतुकीचा कोंडमारा होत असतून कोणत्या रस्त्याने जावे अशा प्रश्न वाहनधारकांना सारखा सतावत असतो.शहरातील जिल्हा परिषदचौक ते खात रोड या रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे. सहा महिन्यापुर्वी या कामाला प्रारंभ झाला. सुरुवातीला काही कारणास्तव काम रोखण्यात आले. त्यानंतर कामाने वेग घेतला परंतू महिना संपलातरी काम पूर्णच झाले नाही. या रस्त्यावर शहरातील सर्वाधिक वाहतुक असते. परंतू रस्ता एका बाजूने खोदलेल्या आहे. त्या रस्त्यावरुन चालताना अनेकदा कसरत करावी लागते. मोठे वाहन आले की तासनतास् वाहतूक ठप्प होते. राजीव गांधी चौकात तर वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. कोण कोणत्या बाजूने येईल याचा नेम नाही. चुकीच्या बाजूने वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी होते. भर उन्हात दुचाकीस्वारांना कोंडीत फसावे लागते. साई मंदिर रोड, शितलामाता चौक येथेही असाच अनुभव येतो.रस्त्याच्या कामाने वाहतुक कोंढी हा प्रकार समजूनही घेता येईल. मात्र शहरातील इतर भागातही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील गांधी चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी पार्र्किंगची व्यवस्थाच नाही. अनेक व्यावसायीकांची आपली दुकाने रस्त्यावर थाटली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बाजार, बसस्टँड, मुस्लिम लायब्ररी चौकात जाणाºया रस्त्यावर सिग्नल व्यवस्था नाही. रस्त्यावर मनमर्जीने वाहन चालविले जातात. शहरात वाहतुक पोलिसांची नियुक्ती असली तरी तेही हतबल झाल्याचे दिसून येतात. विशेष म्हणजे बसस्थानक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, साई मंदिर या परिसरात शाळा, बँका, हॉस्पीटल अनेक शोरुम आहेत. त्यामुळे वर्दळ असते त्या वर्दळीत अपघात होण्याची कायम भीती असते.अधिकृत पार्किंग गरजेचीशहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, शितलामाता मंदिर, मेन बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. नो पार्किंग असलेल्या ठिकाणी वाहने उभे केली जातात. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करीत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहने अधिक आहेत. रस्ते गुळगुळीत करताना पार्किंगचीही सुविधा गरजेची झाली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी