शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील वाहतुकीचा बट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 21:54 IST

स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही.

ठळक मुद्देपार्र्किं गचा प्रश्न : खड्डेमय अर्धवट रस्त्यांची समस्या, नागरिक झाले त्रस्त

संतोष जाधवर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : स्मार्ट शहराच्या नावाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जात आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्यांचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या कामाने वाहतुकीची कायम कोंडी होत आहे. वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर गत सहा महिन्यात कोणताच तोडगा काढला नाही. परिणामी वाहतुकीचा कोंडमारा होत असतून कोणत्या रस्त्याने जावे अशा प्रश्न वाहनधारकांना सारखा सतावत असतो.शहरातील जिल्हा परिषदचौक ते खात रोड या रस्त्याचे चौपदरीकरण केले जात आहे. सहा महिन्यापुर्वी या कामाला प्रारंभ झाला. सुरुवातीला काही कारणास्तव काम रोखण्यात आले. त्यानंतर कामाने वेग घेतला परंतू महिना संपलातरी काम पूर्णच झाले नाही. या रस्त्यावर शहरातील सर्वाधिक वाहतुक असते. परंतू रस्ता एका बाजूने खोदलेल्या आहे. त्या रस्त्यावरुन चालताना अनेकदा कसरत करावी लागते. मोठे वाहन आले की तासनतास् वाहतूक ठप्प होते. राजीव गांधी चौकात तर वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. कोण कोणत्या बाजूने येईल याचा नेम नाही. चुकीच्या बाजूने वाहन आल्यास वाहतुकीची कोंडी होते. भर उन्हात दुचाकीस्वारांना कोंडीत फसावे लागते. साई मंदिर रोड, शितलामाता चौक येथेही असाच अनुभव येतो.रस्त्याच्या कामाने वाहतुक कोंढी हा प्रकार समजूनही घेता येईल. मात्र शहरातील इतर भागातही वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. शहरातील गांधी चौक, बसस्थानक परिसर आदी ठिकाणी पार्र्किंगची व्यवस्थाच नाही. अनेक व्यावसायीकांची आपली दुकाने रस्त्यावर थाटली आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. बाजार, बसस्टँड, मुस्लिम लायब्ररी चौकात जाणाºया रस्त्यावर सिग्नल व्यवस्था नाही. रस्त्यावर मनमर्जीने वाहन चालविले जातात. शहरात वाहतुक पोलिसांची नियुक्ती असली तरी तेही हतबल झाल्याचे दिसून येतात. विशेष म्हणजे बसस्थानक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, साई मंदिर या परिसरात शाळा, बँका, हॉस्पीटल अनेक शोरुम आहेत. त्यामुळे वर्दळ असते त्या वर्दळीत अपघात होण्याची कायम भीती असते.अधिकृत पार्किंग गरजेचीशहरातील गांधी चौक, राजीव गांधी चौक, शितलामाता मंदिर, मेन बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. नो पार्किंग असलेल्या ठिकाणी वाहने उभे केली जातात. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करीत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहने अधिक आहेत. रस्ते गुळगुळीत करताना पार्किंगचीही सुविधा गरजेची झाली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी