शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

सामाजिक बांधिलकी जोपासणारे सिहरी गाव

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

ज्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरीक असतील त्या गावात कधीही शांतता चिरकाल टिकून राहते.

विलास बन्सोड उसर्राज्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरीक असतील त्या गावात कधीही शांतता चिरकाल टिकून राहते. मोहाडी तालुक्यातील सिहरी हे एक छोटेसे गाव आहे. हा गाव पुतळयाचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. या गावात प्रवेश करण्याआधीच हे पुतळे पहावयास मिळतात. संपूर्ण एकाच ठिकाणी आठ पुतळे असल्याने येथील परिसर रम्य व शांततामय दिसते.२५ वर्षापूर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते शंकर पानतावने यांनी स्वकर्तुत्व लोक वर्गणी या सदराखाली गावात पुतळे बनविण्यासाठी प्रारंभ केला. या पुतळयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सिध्दार्थ गौतम बुध्द, महात्मा ज्योतीबा फुले, गुरु किसनदास, नागमंदीर आदीचे पुतळे. त्यावेळी बांधकाम करण्यात आले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकराचें दोन पुतळे तर गौतम बुध्दाचे दोन पुतळे यांचा समावेश आहे.हा नैसर्गिक रम्य ठिकाण मात्र विकासापासून वंचित आहे. यात मुख्य समस्या पाण्याची आहे. पुतळ्याजवळ दोन घरे आहेत. हि जागा गावापासून दोनशे मिटर दूर आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने येथील दोन घरांना पायपीट करावी लागते. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनाही पाण्यापासून वंचितच राहावे लागते. शासनाकडून विविध योजना पर्यटनाच्या दृष्टीकोणातून सुरु आहेत. पण सिहरी गावाला कुणीही ढुंकून पाहत नाही. शासनाने येथे सोयी सुविधा द्यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी कित्येकदा केली पण विकासापासून वंचितच आहे.राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे पुतळयाचे स्मारक परिसरातील सौंदर्यीकरण करणे आदीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून आतापर्यंत त्याचे साधे उत्तरही आले नाही. या परिसराचा विकास व्हायला पाहिजे- ईस्तारी बेलेकर, तंटामुक्त अध्यक्ष सिहरी.