विलास बन्सोड उसर्राज्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरीक असतील त्या गावात कधीही शांतता चिरकाल टिकून राहते. मोहाडी तालुक्यातील सिहरी हे एक छोटेसे गाव आहे. हा गाव पुतळयाचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. या गावात प्रवेश करण्याआधीच हे पुतळे पहावयास मिळतात. संपूर्ण एकाच ठिकाणी आठ पुतळे असल्याने येथील परिसर रम्य व शांततामय दिसते.२५ वर्षापूर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते शंकर पानतावने यांनी स्वकर्तुत्व लोक वर्गणी या सदराखाली गावात पुतळे बनविण्यासाठी प्रारंभ केला. या पुतळयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सिध्दार्थ गौतम बुध्द, महात्मा ज्योतीबा फुले, गुरु किसनदास, नागमंदीर आदीचे पुतळे. त्यावेळी बांधकाम करण्यात आले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकराचें दोन पुतळे तर गौतम बुध्दाचे दोन पुतळे यांचा समावेश आहे.हा नैसर्गिक रम्य ठिकाण मात्र विकासापासून वंचित आहे. यात मुख्य समस्या पाण्याची आहे. पुतळ्याजवळ दोन घरे आहेत. हि जागा गावापासून दोनशे मिटर दूर आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने येथील दोन घरांना पायपीट करावी लागते. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनाही पाण्यापासून वंचितच राहावे लागते. शासनाकडून विविध योजना पर्यटनाच्या दृष्टीकोणातून सुरु आहेत. पण सिहरी गावाला कुणीही ढुंकून पाहत नाही. शासनाने येथे सोयी सुविधा द्यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी कित्येकदा केली पण विकासापासून वंचितच आहे.राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे पुतळयाचे स्मारक परिसरातील सौंदर्यीकरण करणे आदीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून आतापर्यंत त्याचे साधे उत्तरही आले नाही. या परिसराचा विकास व्हायला पाहिजे- ईस्तारी बेलेकर, तंटामुक्त अध्यक्ष सिहरी.
सामाजिक बांधिलकी जोपासणारे सिहरी गाव
By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST