शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक बांधिलकी जोपासणारे सिहरी गाव

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

ज्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरीक असतील त्या गावात कधीही शांतता चिरकाल टिकून राहते.

विलास बन्सोड उसर्राज्या गावात सामाजिक बांधिलकी जोपासणारे नागरीक असतील त्या गावात कधीही शांतता चिरकाल टिकून राहते. मोहाडी तालुक्यातील सिहरी हे एक छोटेसे गाव आहे. हा गाव पुतळयाचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. या गावात प्रवेश करण्याआधीच हे पुतळे पहावयास मिळतात. संपूर्ण एकाच ठिकाणी आठ पुतळे असल्याने येथील परिसर रम्य व शांततामय दिसते.२५ वर्षापूर्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते शंकर पानतावने यांनी स्वकर्तुत्व लोक वर्गणी या सदराखाली गावात पुतळे बनविण्यासाठी प्रारंभ केला. या पुतळयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सिध्दार्थ गौतम बुध्द, महात्मा ज्योतीबा फुले, गुरु किसनदास, नागमंदीर आदीचे पुतळे. त्यावेळी बांधकाम करण्यात आले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकराचें दोन पुतळे तर गौतम बुध्दाचे दोन पुतळे यांचा समावेश आहे.हा नैसर्गिक रम्य ठिकाण मात्र विकासापासून वंचित आहे. यात मुख्य समस्या पाण्याची आहे. पुतळ्याजवळ दोन घरे आहेत. हि जागा गावापासून दोनशे मिटर दूर आहे. त्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने येथील दोन घरांना पायपीट करावी लागते. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनाही पाण्यापासून वंचितच राहावे लागते. शासनाकडून विविध योजना पर्यटनाच्या दृष्टीकोणातून सुरु आहेत. पण सिहरी गावाला कुणीही ढुंकून पाहत नाही. शासनाने येथे सोयी सुविधा द्यावेत अशी मागणी येथील नागरिकांनी कित्येकदा केली पण विकासापासून वंचितच आहे.राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे पुतळयाचे स्मारक परिसरातील सौंदर्यीकरण करणे आदीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून आतापर्यंत त्याचे साधे उत्तरही आले नाही. या परिसराचा विकास व्हायला पाहिजे- ईस्तारी बेलेकर, तंटामुक्त अध्यक्ष सिहरी.