शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

वैनगंगा नदी तीरावरील गावातील नागरिक नाईलाजाने पितात दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालानंतरही उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा प्रशासनाच्या लेखी टँकरमुक्त असून विशाल पात्र असलेल्या वैनगंगेमुळे तशी पाणीटंचाई जाणवत नाही. परंतु वैनगंगेचे दूषित पाणी आता कळीचा मुद्दा झाला असून भंडारा आणि पवनी तालुक्यातील वैनगंगा तिरावरील तब्बल ६७ गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. प्रशासनाच्या वतीने जल शुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे. भंडारा तालुक्यातील ३३ आणि पवनी तालुक्यातील ३४ असे एकुण ६७ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहेत. बहुतांश गावाच्या पाणीपुरवठा योजना वैनगंगेवरून असून पाणी कितीही शुद्ध केले तरी त्याचा परिणाम होत नाही. सध्या वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला १० एनटीयू तर तळाशी १७ एनटीयू आहे. पाच एनटीयूचा स्तर सामान्य मानला जातो. वैनगंगा बचाव समितीने पाणी शुद्धीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी ६१७ गावे पाणीटंचाई उपाययोजनेत प्रस्तावित आहेत. जिल्ह्यातील ११६३ जलस्त्रोतांना पाणीटंचाईची झळ यंदा उन्हाळ्यात जाणवणार आहे.वैनगंगा नदीच्या तीरावर पिंडकेपार गाव असले तरी गावात बोअरवेल खोदून त्यावर नळ योजना कार्यान्वित आहे. जल शुद्धीकरण संयंत्र लावण्यात आले आहे. वैनगंगेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा कुणीही वापर करीत नाही. शुद्ध पाणी पुरवठा केला जातो.-कविता आतीलकरसरपंच, पिंडकेपारगणेशपूर वैनगंगेतून पाणी घेऊन ते शुद्ध करण्यात येते. परंतु १०० टक्के पाणी शुद्ध होत नाही. गावातील जलवाहिन्याही ४० टक्के जुन्या आहेत. आता गोसे प्रकल्पाच्या निधीतून नवीन विहिर तयार केली जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी अडीच कोटीचा प्रस्ताव आहे.-जया सोनकुसरेजि.प. सदस्य, गणेशपूरखमारी येथे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी वैनगंगा नदीपात्रापासून दीड किलोमीटर अंतरावर विहिर खोदण्यात आली आहे. पाणी जलकुंभात आणून नळाच्या द्वारे वितरीत केले जाते. गावात कुठेही सार्वजनिक आरो नाही. दूषित पाण्याचा परिणाम फारसा होत नाही.-कृष्णा शेंडेसरपंच, खमारीवैनगंगा बचाव अभियान नागरी समितीच्या वतीने वैनगंगा शुद्धीकरणासाठी लढा दिला जात आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे.-नितीन तुमाने, अध्यक्ष, वैनगंगा बचाव अभियान नागरी समिती

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण