शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदी तीरावरील गावातील नागरिक नाईलाजाने पितात दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या अहवालानंतरही उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हा प्रशासनाच्या लेखी टँकरमुक्त असून विशाल पात्र असलेल्या वैनगंगेमुळे तशी पाणीटंचाई जाणवत नाही. परंतु वैनगंगेचे दूषित पाणी आता कळीचा मुद्दा झाला असून भंडारा आणि पवनी तालुक्यातील वैनगंगा तिरावरील तब्बल ६७ गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. प्रशासनाच्या वतीने जल शुद्धीकरण संयंत्र बसविण्यात आले असले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी नाग नदीतून येणाऱ्या नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. गोसेखुर्द धरणामुळे साठविलेल्या पाण्यात जलपर्णी व जलकिड्यांची मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेने (निरीने) वैनगंगा नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही असा अहवाल दिला आहे. भंडारा तालुक्यातील ३३ आणि पवनी तालुक्यातील ३४ असे एकुण ६७ गावे वैनगंगा नदीच्या तीरावर आहेत. बहुतांश गावाच्या पाणीपुरवठा योजना वैनगंगेवरून असून पाणी कितीही शुद्ध केले तरी त्याचा परिणाम होत नाही. सध्या वैनगंगेच्या पाण्यातील गढूळपणा वरच्या भागाला १० एनटीयू तर तळाशी १७ एनटीयू आहे. पाच एनटीयूचा स्तर सामान्य मानला जातो. वैनगंगा बचाव समितीने पाणी शुद्धीकरणासाठी पुढाकार घेतला आहे.भंडारा जिल्ह्यात ५४१ ग्रामपंचायती असून गावांची संख्या ८७८ आहे. यापैकी ६१७ गावे पाणीटंचाई उपाययोजनेत प्रस्तावित आहेत. जिल्ह्यातील ११६३ जलस्त्रोतांना पाणीटंचाईची झळ यंदा उन्हाळ्यात जाणवणार आहे.वैनगंगा नदीच्या तीरावर पिंडकेपार गाव असले तरी गावात बोअरवेल खोदून त्यावर नळ योजना कार्यान्वित आहे. जल शुद्धीकरण संयंत्र लावण्यात आले आहे. वैनगंगेचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा कुणीही वापर करीत नाही. शुद्ध पाणी पुरवठा केला जातो.-कविता आतीलकरसरपंच, पिंडकेपारगणेशपूर वैनगंगेतून पाणी घेऊन ते शुद्ध करण्यात येते. परंतु १०० टक्के पाणी शुद्ध होत नाही. गावातील जलवाहिन्याही ४० टक्के जुन्या आहेत. आता गोसे प्रकल्पाच्या निधीतून नवीन विहिर तयार केली जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी अडीच कोटीचा प्रस्ताव आहे.-जया सोनकुसरेजि.प. सदस्य, गणेशपूरखमारी येथे शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी वैनगंगा नदीपात्रापासून दीड किलोमीटर अंतरावर विहिर खोदण्यात आली आहे. पाणी जलकुंभात आणून नळाच्या द्वारे वितरीत केले जाते. गावात कुठेही सार्वजनिक आरो नाही. दूषित पाण्याचा परिणाम फारसा होत नाही.-कृष्णा शेंडेसरपंच, खमारीवैनगंगा बचाव अभियान नागरी समितीच्या वतीने वैनगंगा शुद्धीकरणासाठी लढा दिला जात आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. शुद्धीकरणासाठी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्र्यांनाही पत्र देण्यात आले आहे.-नितीन तुमाने, अध्यक्ष, वैनगंगा बचाव अभियान नागरी समिती

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण