शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

नागरिकांनी संविधान आत्मसात करावे

By admin | Updated: February 2, 2015 23:01 IST

भारतीय संविधान हे जगातील लिखित असे अद्वितीय संविधान आहे. या संविधानातील मुलभूत हक्क व अधिकारासोबत मूलभूत कर्तव्यसुद्धा समजणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे महत्व

भंडारा : भारतीय संविधान हे जगातील लिखित असे अद्वितीय संविधान आहे. या संविधानातील मुलभूत हक्क व अधिकारासोबत मूलभूत कर्तव्यसुद्धा समजणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे महत्व जाणणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत संविधान बांधिलकी महोत्सवात उपस्थित मान्यवरांनी केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा व अ.भा. महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमुर्ती चौक येथे संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिवताप अधिकारी हर्षल मेश्राम हे होते. विशेष अतिथी म्हणून भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बळीराम सार्वे, अमृत बंसोड, नरेश आंबीलकर, अ‍ॅड. संजीव गजभिये, अमृत बन्सोड, प्रा. डॉ. जयश्री सातोरकर, हिवराज उके, भैय्याजी लांबट आदी उपस्थित होते.याप्रसंगी भारतीय संविधानाची जडणघडण कशी झाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना देण्यात आलेले भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी अत्यंत सामर्थपणे कशी पार पाडली हे महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रा. नरेश आंबीलकर यांनी सांगितले. पंडीत सोमाजी गायकवाड, अ‍ॅड. रामदयाल हिरकणे, अश्विनी भिवगडे, महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंचाच्या अध्यक्षा राज्यलक्ष्मी पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे सरयु डहाट, मअंनिसचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी भारतीय संविधानाचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी हिवताप अधिकारी हर्षल मेश्राम यांनी संविधान हे सर्व ग्रंथापेक्षा जगातील उत्कृष्ठ व लोकहिताचे सर्वश्रेष्ठ असे संविधान आहे याचे नागरिकांनी काटेकोरपणे वाचन व पालन करावे तरच आपल्याला खरी लोकशाही मिळेल असे सांगितले.या प्रसंगी पॉल चर्च स्कूलचे विद्यार्थी दिव्या गायधने, पुजा बाच्छिल, यशस्वी गजभिये, साक्षी फुलसुंगे, वैशाली डहारे यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. आभार विष्णुदास लोणारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज परदेशी, बसपा फाये, त्रिवेणी वासनिक, राजकुमार दहेकर, मेहमुद अली, कविता लोणारे, कोठीराम पवनकर, सुजाता घेडीचोर, लक्ष्मण भोपे, रहिम तुरक, आशा गजभिये यांनी अथक सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)