शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

जात वैधता कार्यालयात नागरिकांची पायपीट

By admin | Updated: May 26, 2017 02:05 IST

जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांना जात वैधता पडताळणीचे प्रमाणपत्र जिल्हा मुख्यालयी मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने

अर्ज ‘रेफर टू’ नागपूर : अधिकारी-कर्मचारी सुस्त, विद्यार्थी नागरिक त्रस्तलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील विद्यार्थी, नागरिकांना जात वैधता पडताळणीचे प्रमाणपत्र जिल्हा मुख्यालयी मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ पासून जात वैधता पडताळणीचे स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. मात्र अर्ज या कार्यालयात पडून असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. महिनाभरापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नागरिक जात वैधता पडताळणीचे अर्ज योग्यत्या दस्तऐवजासह प्रत्यक्ष हस्तपोचने सादर करीत असून तब्बल सहा महिने उलटून गेली तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना सदर कार्यालयाची दररोज पायपीट करावी लागत आहे. प्रमाणपत्राबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुम्हाला मोबाईलवर मॅजेस येईल असे सांगून नागरिक विद्यार्थ्यांची बोळवण केली जात आहे. अधिकारी, कर्मचारी सुस्त व नागरिक त्रस्त असे या कार्यालयाचे सकृतपणे चित्र दिसून येत असून सदर कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेवून व सम्यक विचार करून नागरिक व विद्यार्थ्यांना तात्काळ जात वैधता पडताळणीचे प्रमाणपत्र अदा करावे अन्यथा या विरोधात जिल्हाभर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील, असा इशारा भंडारा जिल्हा विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक कान्हेकर, अनिल मेश्राम, धनराज कान्हेकर, अशोक फुलेकर, राज मेश्राम, गौतम कान्हेकर, बुद्धपाल डहाट यांनी दिला आहे.शिक्षण, नोकरी व निवडणूक कार्यायासाठी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राची नितांत गरज असते. त्यासाठी अर्जदार हे योग्य त्या दस्ताऐवजासह अर्ज भंडारा येथील जात वैधता प्रमाणपत्र कार्यालयात प्रत्यक्ष हस्तपोचने सादर करीत असतात. भंडारा येथे नोव्हेंबर महिन्यापासून जात वैधता पडताळणीचे स्वतंत्र कार्यालय सुरू झाले तेव्हापासून नागरिकांनी अर्ज सादर केले. त्यानुसार सदर अर्जावर संबंधित यंत्रणेने कार्यवाही करून अंतिम कार्यवाहीसाठी सदर प्रस्ताव नागपूर येथील कार्यालय रेफर केले असून मागील सहा महिन्यापासून सदर प्रस्ताव अंतिमरित्या निकाली निघत नसल्याने व प्रमाणपत्रावर संबंधित जबाबदार अधिकाऱ्याची स्वाक्षरी होत नसल्याने बरेच प्रस्ताव नागपूर येथील कार्यालयात धूळ खात असल्याने विद्यार्थी व नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागत असून सदर कार्यालयाच्या हेतुपूरस्पर अक्षम्य दुर्लक्षामुळे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचे अर्ज ‘रेफर टू’ नागपूर करीत आहेत.