शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: June 21, 2017 00:30 IST

प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. १ ते ७ जुलैपर्यंत आयोजित केलेल्या वृक्ष लागवड सप्ताहात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन...

नाना पटोले : १ ते ७ जुलैपर्यंत सप्ताहचे आयोजन, पीक देणाऱ्या वृक्षांवर भरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रदूषणामुळे निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. १ ते ७ जुलैपर्यंत आयोजित केलेल्या वृक्ष लागवड सप्ताहात नागरिकांनी सक्रीय सहभाग घेऊन एक व्यक्त एक झाड लावून निसर्ग, पर्यावरणाचे जतन व संरक्षण करावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.राष्ट्रीय वननिती १९८८ मधील धोरणानुसार एकुण भौगिलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वनीकरण व वृक्षाच्छादन असणे आवश्यक असून महाराष्ट्र राज्य हे देशातील प्रगतशील राज्य असून राज्यातील ३० हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी ६१.३५ लाख हेक्टर म्हणजे २० टक्के इतकी जमीन वृच्छादित आहे. परंतु विविध कारणांमुळे वृक्षतोड तसेच कृत्रिम व नैसर्गिक वनवे, यामुळे घनदाट अरण्य ओसाड पडली असून जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच विविध प्रकारच्या घातक प्रदूषणामुळे जागतिक तापमानात वाढ झाली असून पर्यावरणीय बदलामुळे नैसर्गिक बदल झाल्याने अल्प व अनियमित पर्यन्यवृष्टी तर कधी ओला, कोरडा दुष्काळ पडत असतो. या विपरीत परिणाम वनस्पतीसृष्टी व प्राणी सृष्टीवर होऊन पीक उत्पादनात घट येत असते. सजीव प्राण्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असतो. ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब असून याबाबत बुद्धीवंत, प्रज्ञावंत, अभ्यासकांसह नागरिकांनी सम्यक विचार करणे काळाची गरज आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर यासाठी संबंधित यंत्रेणेने नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये वने, वन्यप्राणी, वनस्पती, जैवविविधता, दुर्मिळ वनसंपदा, औषधी वनस्पती यांचे रक्षण, संरक्षण आणि संवर्धन याबाबत जनजागृती करून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करून वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगणे गरजेचे आहे. मागील वर्षी राज्यात सुमारे २ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या कार्यक्रम राबविण्यात आला. आता येणाऱ्या तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठावयाचे असून या कार्यक्रमात नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे महत्वाचे असून प्रत्येक कार्यालयाच्या सभोवताल, शाळा महाविद्यालयांनी विद्यालय परिसरात, ग्रामस्थांनी अंगण परिसरात तर शेतकरी बांधवांनी शेताच्या धुऱ्यावर, पडीत जमीनवर व सर्वांनी रस्त्याच्या कडेला आंबा, पेरू, जांभुळ, सीताफळ, बोर अशा नगदी पीक देणाऱ्या वृक्षांची लागवड करावी. प्रत्येक कार्यालय व शाळा महाविद्यालयांनी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे छायाचित्रण करावे व याबाबदचा कृती अहवाल दर्शनार्थासाठी जपून ठेवावयाची काळजी घ्यावी. निसर्ग पर्यावरणाचे संतुल राखण्यासाठी सर्व नागरिकांनी वृक्षलागवड कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.