शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कोरोनातून सावरलेल्या बालकांना ‘एमएसआयसी’ आजाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

भंडारा : कोरोनानंतर विविध आजार डोके वर काढत आहेत. अशातच ‘एमएसआयसी’ म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा बालकांमध्ये धोका बळावण्याची ...

भंडारा : कोरोनानंतर विविध आजार डोके वर काढत आहेत. अशातच ‘एमएसआयसी’ म्हणजेच मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचा बालकांमध्ये धोका बळावण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना झालेल्या बालकांना पंधरा दिवस ते तीन महिन्यांच्या कालावधीत हा आजार उद्भवू शकतो. प्राथमिक लक्षणे ओळखून औषधोपचार केल्यास त्यावर सहजपणे मात करता येऊ शकते.

जिल्ह्यात आतापर्यंत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ६५१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ३४१ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. एमएसआयसी आजार वय वर्ष ३ ते १२ या गटात होऊ शकतो. २४ तासांपेक्षा जास्तवेळ अंगात ताप असणे, बाळाला सुस्त वाटणे, शरीरावर लाल चट्टे येणे, डोळे लाल होणे, उलटी, मळमळ व हगवण लागणे, हृदयाची गती वाढणे, श्वसन प्रक्रिया वेगात होणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे अशी लक्षणे आढळताच तत्काळ डॉक्टरांना दाखवून देणे अत्यंत आवश्यक आहे. दिरंगाई करणे म्हणजे बाळाला धोक्यात ठेवण्यासारखे आहे. याशिवाय आपल्या मनाने बाळाला औषध देऊ नये.

बॉक्स

जिल्ह्यात ६५१ बालकांना कोरोना

जिल्ह्यात आतापर्यंत ० ते १० वयोगटातील ६५१ बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन बालकांचा मृत्यू झाला, तर इतर बालके बरी होऊन घरी परतली.

बॉक्स

ही घ्या काळजी

२४ तासांपेक्षा जास्त ताप असणे, शरीर अस्वस्थ वाटणे, शरीरावर लाल चट्टे येणे, उलटी होणे, डोळे लाल होणे, हगवण, हृदयाची गती वाढणे अशी लक्षणे आढळतात. यावर वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. प्राथमिक लक्षणे आढळली तरी स्वमताने बालकाला औषध देऊ नये. वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एखाद्या बालकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो बरा झाला असेल तर त्यावर लक्ष देत राहावे. घाबरण्याचे कारण नाही. परंतु दक्ष असणे महत्त्वाचे आहे.

कोट बॉक्स

बालकाला कोरोना झाल्यानंतर पंधरा ते तीन महिन्यांपर्यंत एमएसआयसीचा धोका असू शकतो. घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. प्राथमिक लक्षणे लक्षात येताच वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. उगीच जोखीम पत्करण्यापेक्षा उपचार करणे कधीही चांगले असते.

डॉ. अमित कावळे, बालरोगतज्ज्ञ, भंडारा.