शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

चिचाळ ग्रामपंचायतीचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:00 IST

गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच घराशेजारी ठिकठिकाणी शेणखताचे ठिगारे असल्यामुळे परीसरात खूप दुर्गंधी पसरली आहे.

ठळक मुद्देगावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात : नागरिकांनी केली स्वच्छतेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया चिचाळ येथील ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी ग्रामस्वच्छता अभियान राबविले जात आहे. गावागावात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. तसेच स्वच्छतेबाबत ग्रामपंचायतस्तरावरून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र चिचाळ गावात अजूनही जंतुनाशक फवारणी करण्यात आली नाही.गावातील वाहणाऱ्या नालीच्या सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीने साचलेल्या व तुडुंब भरलेल्या नाल्यांची सफाई करण्याची आवश्यकता आहे. याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस पावले उचलून सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत. तसेच घराशेजारी ठिकठिकाणी शेणखताचे ठिगारे असल्यामुळे परीसरात खूप दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.कोरोना विषाणूने सारे जग भयभयीत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छतेबाबतीत जागृकता निर्माण झाली आहे.यासंदर्भात चिचाळ येथील नागरीक उत्तम नंदेश्वर यांनी स्थानिक प्रशासनाला लेखी निवेदन देऊन घराशेजारी असलेले शेणखताचे ढिगारे हटविण्याची मागणी केली मात्र याकडे स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.त्यांनी याप्रकरणी तंटामुक्त समिती चिचाळ, संबंधित आरोग्य अधिकारी बारव्हा व खंडविकास अधिकारी यांना सुद्धा लेखी निवेदन देण्यात आले पण अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. जिल्ह्याचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात सरपंच गिरीष झोडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.नालीवर खातकुडेचिचाळ येथील नागरिक उत्तम नंदेश्वर यांच्या घराशेजारी परिसरातील काही नागरिकांनी सांडपाणी वाहून जाणाºया नालीवर शेणखताचे खातकुडे तयार केले आहेत. त्यामुळे नालीत वाहणारे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून शेणखताच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे गावकऱ्यांत संसर्गजन्य आजाराची भीती निर्माण झाली आहे. अंगणवाडी सभोवताल काही नागरिक आपली जनावरे बांधत आहेत. जनावरांच्या मलमूत्रामुळे घाण निर्माण झाली आहे. अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत