शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

रासायनिक खताचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:38 IST

केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीला धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी वाढ करून धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा डांगोरा पिटला. मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या किमतीत प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची गळचेपी : दीडपट हमीभाव केवळ स्वप्नरंजन, खतांच्या दरात २५० ते ३०० रुपयांची वाढ
<p>हरिश्चंद्र कोरे।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीला धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी वाढ करून धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा डांगोरा पिटला. मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या किमतीत प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले आहेत. सद्यस्थितीत शेतकरी धान रोवणीची निगा घेत रासायनिक खतांची मात्रा देऊन विविध औषधांची फवारणी करीत आहेत. यंदा मे महिन्याच्या तुलनेत सध्या खतांच्या दरात सरासरी २५० ते ३०० रुपयांनी वाढ झाल्याचे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच गतवर्षी धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लुबाडणूक करण्यात आली. यंदा केंद्र शासनाने धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी भरीव वाढ करून शेतकºयांना दिलासा दिला. परंतु लागलीच रासायनिक खतांच्या दरात वाढ करून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे स्वप्न धुळीस मिळविले. परिणामी शासनाने दीडपट हमीभाव दिल्याचा कांगावा करून केवळ शेतकऱ्यांचे स्वप्नरंजन केल्याचा आरोप काही जाणकार शेतकऱ्यांनी केला आहे.वस्तू व सेवा कराने वाढविली डोकेदुखीखते, बियाणे, औषधे आदी शेती साहित्यावर सरकारने वस्तू सेवा कर लादला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरुपात पैसा येत असला तरी लादण्यात आलेल्या वस्तूसेवा कराने शेतकऱ्यांसह कृषी केंद्र चालकांची डोकेदुखी वाढविली आहे.माल एकच पण दर वेगवेगळेफर्टिलायझर साहित्यावर सरकारने ५ टक्के कीटकनाशकांवर १८ टक्के तर काही कृषी साहित्यावर १२ ते १८ टक्के वस्तू व सेवा कर लावला आहे. सध्या हा कर शेतकऱ्यांसह कृषी केंद्र चालकांच्या अडचणीत भर टाकत असून खतांचा माल एकच असताना वेगवेगळ्या कंपन्या आपले उत्पादन वेगवेगळ्या दरात विकत आहेत. परिणामी शेतकरी यात विनाकारण भरडल्या जात आहे.