शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रासायनिक खताचे दर वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:38 IST

केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीला धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी वाढ करून धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा डांगोरा पिटला. मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या किमतीत प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची गळचेपी : दीडपट हमीभाव केवळ स्वप्नरंजन, खतांच्या दरात २५० ते ३०० रुपयांची वाढ
<p>हरिश्चंद्र कोरे।लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : केंद्र सरकारने खरीप हंगामाच्या सुरुवातीला धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी वाढ करून धान उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिल्याचा डांगोरा पिटला. मात्र त्यानंतर रासायनिक खतांच्या किमतीत प्रती क्विंटल २५० ते ३०० रुपयांनी वाढ करून शेतकऱ्यांची गळचेपी चालविली आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले आहेत. सद्यस्थितीत शेतकरी धान रोवणीची निगा घेत रासायनिक खतांची मात्रा देऊन विविध औषधांची फवारणी करीत आहेत. यंदा मे महिन्याच्या तुलनेत सध्या खतांच्या दरात सरासरी २५० ते ३०० रुपयांनी वाढ झाल्याचे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.गेल्या तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच गतवर्षी धानाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लुबाडणूक करण्यात आली. यंदा केंद्र शासनाने धानाच्या हमीभावात १८० रुपयांनी भरीव वाढ करून शेतकºयांना दिलासा दिला. परंतु लागलीच रासायनिक खतांच्या दरात वाढ करून उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे स्वप्न धुळीस मिळविले. परिणामी शासनाने दीडपट हमीभाव दिल्याचा कांगावा करून केवळ शेतकऱ्यांचे स्वप्नरंजन केल्याचा आरोप काही जाणकार शेतकऱ्यांनी केला आहे.वस्तू व सेवा कराने वाढविली डोकेदुखीखते, बियाणे, औषधे आदी शेती साहित्यावर सरकारने वस्तू सेवा कर लादला आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत कराच्या स्वरुपात पैसा येत असला तरी लादण्यात आलेल्या वस्तूसेवा कराने शेतकऱ्यांसह कृषी केंद्र चालकांची डोकेदुखी वाढविली आहे.माल एकच पण दर वेगवेगळेफर्टिलायझर साहित्यावर सरकारने ५ टक्के कीटकनाशकांवर १८ टक्के तर काही कृषी साहित्यावर १२ ते १८ टक्के वस्तू व सेवा कर लावला आहे. सध्या हा कर शेतकऱ्यांसह कृषी केंद्र चालकांच्या अडचणीत भर टाकत असून खतांचा माल एकच असताना वेगवेगळ्या कंपन्या आपले उत्पादन वेगवेगळ्या दरात विकत आहेत. परिणामी शेतकरी यात विनाकारण भरडल्या जात आहे.