शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘बॅरिकेड’च्या भरवशावर तपासणी नाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:40 IST

बपेरा आंतरराज्यीय सिमेवर तैनात असणारा पोलीसाचा तपासणी नाका हटविण्यात आलेला आहे. आतंरराज्यीय सीमेवर तपासणी नाक्याची भूमिका बॅरिकेड्स बजावित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआंतरराज्यीय सीमेवरील प्रकार : चौकशीची गरज

रंजित चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतरराज्यीय सिमेवर तैनात असणारा पोलीसाचा तपासणी नाका हटविण्यात आलेला आहे. आतंरराज्यीय सीमेवर तपासणी नाक्याची भूमिका बॅरिकेड्स बजावित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.मध्यप्रदेश राज्याचे हाकेच्या अंतरावर बपेरा आंतर राज्यीय सिमा आहे. सिहोरा पोलीस स्टेशन पासून १३ किमी अंतरावर असणाऱ्या या सिमेचे संदर्भात पोलीस प्रशासन गंभीर नाही. याच सिमेवर पोलिसांचे तपासणी नाका मंजुर करण्यात आलेला आहे. देवसर्रा गावाचे हद्दीत जागेची चाचपणी करण्यात आली आहे. महसुल विभागाची जागा राखीव करण्यात आली असतांना इमारत बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला नाही. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ अशी अवस्था या तपासणी नाक्याची झाली आहे. मध्यांतरी १० लक्ष रुपये या तपासणी नाक्याचे बांधकामाकरिता मंजुर झाले असल्याची माहिती व चर्चा होती. परंतु ही चर्चा नंतर हवेत विरली. दरम्यान या तपासणी नाक्याची जबाबदारी सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस नियुक्त केले जात नाही. या पोलीस स्टशेनमध्ये ठिकठाक नाही. कामाचे वाढते व्याप असल्याने मोठी कसरत पोलीस करित आहे. पोलीस स्टेशनमध्ये ५३ पदे असून फक्त २५ पोलीस कार्यरत आहे. बिटमध्ये कार्यरत हवालदारांची रिक्त पदे डोक्याला ताप आणणारी आहे. वाहतुक पोलिसांवर राज्य मार्गाची जबाबदारी आहे. २८ कि.मी. पर्यंत राज्य मार्गाचा विस्तार असून वाहतुक पोलिसांचे खांद्यावर बपेरा बिट सांभाळण्याची दुहेरी जबाबदारी देण्यात आली आहे. एका बिटमध्ये अनेक गावांचा समावेश असल्याने पदे रिक्त आहे. काही बिटाचा कारभार शिपाई पदाचे कर्मचाºयांवर देण्याची पाळी आली आहे. जिल्ह्यात दरवर्षी पोलीस भर्ती करण्यात येत आहे. पंरतु पोलिसांचे रिक्त पदाचे असणारे अनुशेष भरुन काढण्यात येत नाही. सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये असणाºया रिक्त पदाकडे जिल्हा प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येते.पथक कालबाह्यमुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचे विरोधात कारवाईकरिता चिडीमार पथक कार्यरत होते. परंतु सुरक्षा व धाक निर्माण करणारा हा पथक कालबाह्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे गर्दीचे ठिकाणी टवाळखोरीचे प्रकार वाढले आहे.