शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

पर्यावरण शिक्षण विषयाच्या मूल्यमापन पद्धतीत बदल

By admin | Updated: August 23, 2015 00:54 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना सत्र २०१५-२०१६ पासून लागू केली आहे.

बाह्य परीक्षकांची नियुक्ती करणार : इयत्ता १२ वी साठी नवीन निकषचंदन मोटघरे लाखनीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना सत्र २०१५-२०१६ पासून लागू केली आहे.पर्यावरण शिक्षण हा विषय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम व सर्व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. या विषयाची गुण विभागणी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून प्रथम द्वितीय या प्रमाणे दोन सत्रामध्ये न विभागता वार्षिक पद्धतीने मुल्यमापन करावे लागणार आहे. पुर्नरचित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण शिक्षण या विषयाची अंमलबजावणी इयत्ता ११ वी साठी सन २०१२-१३ पासून व इयत्ता १२ वी साठी सन २०१३-१४ पासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत इयत्ता ११ वी व १२ वीसाठी पर्यावरण शिक्षण या विषयाची गुणविभागणी प्रत्येक सत्रात ३० गुण प्रकल्प व २० गुण अंतर्गत मूल्यमापन यात सेमीनार जर्नल याप्रमाणे असून दोन्ही सत्रातील प्रत्येकी ५० गुणांची बेरीज करून १०० पैकी मिळालेल्या गुणांचे रुपांतर ५० गुणांमध्ये करून ५० पैकी मिळालेले गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत दर्शविण्यात येतात. शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाची मूल्यमापन योजना सुधारीत करण्यात येत आहे. इयत्ता ११ वी व १२ वी पर्यावरण शिक्षण या विषयासाठी अंतर्गत व बाह्य परिक्षकांकडून मुल्यमापन करण्यात येईल. इयत्ता ११ वी साठी संबंधित महाविद्यालयातीलच शिक्षक बहि:स्थ व अंतर्गत परिक्षकाची कामे पाहतील. इयत्ता १२ वी साठी नवीन मूल्यमापन पद्धतीत बाह्य परीक्षकांची नियुक्ती मंडळाकडून करण्यात येईल. अंतर्गत परीक्षक व बाह्य परीक्षक यांच्या एकत्रित परीक्षणातून विद्यार्थ्यांना ५० पैकी मिळालेले गुण एकूण गुणांच्या बेरजेत धरून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात येईल. पर्यावरण शिक्षण व विषयात ५० पैकी मिळालेले गुण मंडळाकडे अधिकृत गुण तक्त्यात सादर करावयाच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पर्यावरण शिक्षण या विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सदर विषयामध्ये ५० गुणांपैकी उत्तीर्णतेसाठी ३५ टक्के गुण अर्थात १८ गुण आवश्यक राहतील. पर्यावरण शिक्षण या विषयाची लेखी परीक्षा नसल्यामुळे या विषयाच्या बाबतीत पुनर्मूल्यांकन होणार नाही. पर्यावरण शिक्षण या विषयात सवलतीचे गुण देय असणार नाही. शिक्षण मंडळाने बाह्य परीक्षकांसाठी व अंतर्गत परीक्षकांनी करावयाची कार्यवाहीची माहिती परिपत्रकात दिलेली आहे. अंतर्गत परीक्षकांनी प्रकल्पाचे २० गुण व सेमीनार, जर्नलच्या १० गुणांचे मुल्यमापन करावयाचे आहे. तर बाह्य परीक्षकाने प्रकल्प कार्याचे १० गुण व सेमीनार, जर्नलच्या १० गुणांचे मूल्यमापन करावयाचे आहे. नवीन मूल्यमापन योजनेमध्ये शिक्षण मंडळाने पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता १२ वी च्या मूल्यमापनात बाह्य परीक्षकांची नेमणूक केलेली आहे. नवीन मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना संधी मिळेल.