शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण शिक्षण विषयाच्या मूल्यमापन पद्धतीत बदल

By admin | Updated: August 23, 2015 00:54 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना सत्र २०१५-२०१६ पासून लागू केली आहे.

बाह्य परीक्षकांची नियुक्ती करणार : इयत्ता १२ वी साठी नवीन निकषचंदन मोटघरे लाखनीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना सत्र २०१५-२०१६ पासून लागू केली आहे.पर्यावरण शिक्षण हा विषय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम व सर्व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. या विषयाची गुण विभागणी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून प्रथम द्वितीय या प्रमाणे दोन सत्रामध्ये न विभागता वार्षिक पद्धतीने मुल्यमापन करावे लागणार आहे. पुर्नरचित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण शिक्षण या विषयाची अंमलबजावणी इयत्ता ११ वी साठी सन २०१२-१३ पासून व इयत्ता १२ वी साठी सन २०१३-१४ पासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत इयत्ता ११ वी व १२ वीसाठी पर्यावरण शिक्षण या विषयाची गुणविभागणी प्रत्येक सत्रात ३० गुण प्रकल्प व २० गुण अंतर्गत मूल्यमापन यात सेमीनार जर्नल याप्रमाणे असून दोन्ही सत्रातील प्रत्येकी ५० गुणांची बेरीज करून १०० पैकी मिळालेल्या गुणांचे रुपांतर ५० गुणांमध्ये करून ५० पैकी मिळालेले गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत दर्शविण्यात येतात. शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाची मूल्यमापन योजना सुधारीत करण्यात येत आहे. इयत्ता ११ वी व १२ वी पर्यावरण शिक्षण या विषयासाठी अंतर्गत व बाह्य परिक्षकांकडून मुल्यमापन करण्यात येईल. इयत्ता ११ वी साठी संबंधित महाविद्यालयातीलच शिक्षक बहि:स्थ व अंतर्गत परिक्षकाची कामे पाहतील. इयत्ता १२ वी साठी नवीन मूल्यमापन पद्धतीत बाह्य परीक्षकांची नियुक्ती मंडळाकडून करण्यात येईल. अंतर्गत परीक्षक व बाह्य परीक्षक यांच्या एकत्रित परीक्षणातून विद्यार्थ्यांना ५० पैकी मिळालेले गुण एकूण गुणांच्या बेरजेत धरून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात येईल. पर्यावरण शिक्षण व विषयात ५० पैकी मिळालेले गुण मंडळाकडे अधिकृत गुण तक्त्यात सादर करावयाच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पर्यावरण शिक्षण या विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सदर विषयामध्ये ५० गुणांपैकी उत्तीर्णतेसाठी ३५ टक्के गुण अर्थात १८ गुण आवश्यक राहतील. पर्यावरण शिक्षण या विषयाची लेखी परीक्षा नसल्यामुळे या विषयाच्या बाबतीत पुनर्मूल्यांकन होणार नाही. पर्यावरण शिक्षण या विषयात सवलतीचे गुण देय असणार नाही. शिक्षण मंडळाने बाह्य परीक्षकांसाठी व अंतर्गत परीक्षकांनी करावयाची कार्यवाहीची माहिती परिपत्रकात दिलेली आहे. अंतर्गत परीक्षकांनी प्रकल्पाचे २० गुण व सेमीनार, जर्नलच्या १० गुणांचे मुल्यमापन करावयाचे आहे. तर बाह्य परीक्षकाने प्रकल्प कार्याचे १० गुण व सेमीनार, जर्नलच्या १० गुणांचे मूल्यमापन करावयाचे आहे. नवीन मूल्यमापन योजनेमध्ये शिक्षण मंडळाने पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता १२ वी च्या मूल्यमापनात बाह्य परीक्षकांची नेमणूक केलेली आहे. नवीन मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना संधी मिळेल.