शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

नळाला पाणी येण्याची शक्यता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:16 IST

सूर नदीचे खमाटा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना कारीत असलेल्या वरठीवासियांची नळाला पाणी येण्याची शेवटची आशा मावळली आहे.

इंटेकवेल पडले कोरडे : गाळ उपसूनही पाणी नाहीवरठी : सूर नदीचे खमाटा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना कारीत असलेल्या वरठीवासियांची नळाला पाणी येण्याची शेवटची आशा मावळली आहे. ४० फूट खोल इंटेकवेलमध्ये साचलेली गाळ उपसल्यावरही पाण्याचा स्त्रोत लागला नाही. त्यामुळे पाऊस किंवा धरणातील पाणी सोडल्याशिवाय नळाला पाणी येणार नाही. किमान दोन दिवसाआड पिण्याचे पाणी येईल, ही शक्यताही धुसर झाली आहे. आता पाऊस आल्याशिवाय नळाला पाणी मिळणे शक्य नाही.चार दिवसांपासून इंटेकवेलचे गाळ उपसणे सुरू आहे. ग्रामपंचायतचे सर्वच कर्मचारी पुढाकार घेऊन गाळ उपसत आहेत. जवळपास ६ ते ७ फुटपर्यंत गाळ उपसण्यात आले. परंतु शेवटपर्यंत पाणी लागले नाही. नदीपत्रात पाणी नाही. अशा स्थितीत जमिनीच्या आतील पाण्याचे स्रोत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपयोगी पडतात. परंतु गाळ उपसूनही पाण्याचा शोध न लागल्यामुळे पाणी टंचाईच्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहल्याखेरीज उपाय नाही अशी बिकट परिस्थिती वरठीवासियांवर आली आहे. सद्यस्थितीत पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी दमदार पावसाशिवाय पर्याय नाही. इंटेकवेल उपसून पाणी न लागल्यामुळे स्त्रोताच्या सर्व शक्यता संपल्या आहेत.बांधकाम बंद ठेवण्याचे आवाहन गावात मोठ्या प्रमाणात घराचे बांधकाम सुरू आहेत. नवीन घराच्या बांधकामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे बांधकाम ठेवणे आवश्यक आहे. १५ दिवस तरी किमान पाऊस येणार नाही. त्यामुळे गावात सुरू असलेले बांधकाम काही दिवस बंद ठेऊन पाणी टंचाईच्या स्थितीवर मात करता येऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संजय मिरासे व उपसरपंच मिलिंद रामटेके यांनी केले आहे.विहिरींचा जलस्रोत घसरलापाण्याचा स्त्रोत आटल्यामुळे सहा दिवसांपासून सुरू असलेली पाणी टंचाई व उष्णता असल्यामुळे विहिरीसह हातपंपावर गर्दी वाढली आहे. परिणामी अनेक भागतील विहिरी शेवटच्या घटका मोजत आहेत. सार्वजनिक विहिरीत भरपूर पाणी आहे, परंतु पाणी पिण्यायोग्य नाही. गावात असलेल्या बोरवेल्स आटण्याच्या स्थितीत आहेत. वरठी येथे असलेल्या अनेक भागातील विहिरी नावापुरते आहेत. २५.३० फूट खोल विहिरीत फूट - दोन फूट पाणी आहे. अनेक भागात खडक पाण्याच्या स्रोताला अडथळा ठरत आहेत. पाण्याचा नियमित उपसा वाढल्यामुळे अनेक विहिरी आटल्या आहेत. घरी विहीर असूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वरठी येथील सुभाष व शास्त्री वॉर्डात अनेक विहिरी नावापुरत्या उरल्या आहेत. पाण्याचा अपव्यय केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.पाण्याचा दुरूपयोग टाळल्याशिवाय पर्याय नाहीपाणी टंचाईच्या परिस्थितीत वरठीत दोन प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे, ते निशचिंत आणि ज्यांच्याकडे नाही ते चिंतेत आहेत. दमदार पावसाची सुरुवात झाली नाही तर सर्वांनाच पाणी टंचाईचा फटका बसू शकतो. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याच्या उपस्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली. त्यामुळे या परिस्थितीत सर्वांनी पाणी जपून वापरल्याशिवाय पर्याय नाही. अजूनही काही भागात पाण्याचा अपव्यय सुरू असून दुसऱ्या भागातील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.