शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

तंटामुक्त समित्यांसमोर आव्हान

By admin | Updated: September 21, 2015 00:26 IST

राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या या समित्यांपुढे मात्र अवैध धंद्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अवैध धंदे बोकाळले : समित्यांनी समुपदेशनासह पोलिसांचीही मदत घ्यावीभंडारा : राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली आहे. गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या या समित्यांपुढे मात्र अवैध धंद्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.गावपातळीवर तंटे निर्माण होऊ नयेत. दाखल असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या तंट्यांचे निराकरण करून ते कमी करणे. गावासाठी गावातच लोकसहभागातून तत्काळ व सर्वमान्य तडजोड घडवून आणण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे, गावातील व राजकीय सामंजस्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणे. लोकांच्या सहकार्याने अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे व त्यांचे निर्मूलन करणे, अनिष्ट प्रथा व चालीरीती नष्ट करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आदी उद्दिष्ट समोर ठेवून या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करून गावाचा विकास साध्य करावयाचा असतो. अवैध धंदे, धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापीही साध्य होणार नाही. दारू, मटका, वरली हे भांडण तसेच शांतता धोक्यात येण्याचे मूळ कारण आहे. यामुळे अशा अवैध धंद्यालाच मूठमाती दिली तर गावांची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल होण्यास वेळ लागणार नाही. यावर शिक्कामोर्तब करून गावकऱ्यांच्या सहकार्याने तंटामुक्त गाव समितीने अवैध धंदे रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे शासनाने सुचविले आहे.त्या दृष्टीने प्रत्येक गावातील तंटामुक्त समितीने अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्याचा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून करणे, व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम राबविणे, व्यसनी लोकांचे समुपदेशन करणे, आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेणे वा इतर कामी पोलिसांना सहकार्य करणे ही कामे समिती पदाधिकाऱ्यांना करावी लागतात. भांडण तंटे व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरणाऱ्या दारूला गावातून हद्दपार करण्याचे कर्तव्य तंटामुक्त गाव समित्यांनी पोलिसांच्या सहकार्याने पार पाडणे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अपेक्षित आहे. मात्र याचा विसर बहुतांश समितीच्या पदाधिकाऱ्यांना पडल्याने गावात दारूसह अवैध धंद्याचे अस्तित्व अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.गावात शांतता राहावी, गावाचा सर्वांगीण विकास साधला जावा. यासाठी प्रत्येक तंटामुक्त गाव समितीने सभा बोलावून गावात असलेले अवैध धंदे हद्दपार करण्याचा ठराव घेणे गरजेचे आहे. तसेच त्याची प्रत पोलीस ठाण्याला द्यावी. अवैध धंदे करणाऱ्या धंदेवाईकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे आणि अवैधधंदे बंद करण्यासाठी विनवणी करावी. तरीही अवैध धंदे बंद होत नसतील तर संबंधित पोलीस ठाण्याचे सहकार्य घेऊन त्यावर योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने करणे तंटामुक्त गाव मोहिमेसाठी अतिशय आवश्यक आहे. तरच समित्यांना बळ येऊ शकणार आहे. (शहर प्रतिनिधी)