शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

शतकोटी वृक्षलागवड योजनेचा फज्जा

By admin | Updated: September 19, 2015 00:36 IST

शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पावसाअभावी फज्जा उडालाअसून शासनाला यावर्षी ही योजना गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे.

आर्थिक भुर्दंड : फटका पावसाचासाकोली : शासनाच्या शतकोटी वृक्षलागवड योजनेचा पावसाअभावी फज्जा उडालाअसून शासनाला यावर्षी ही योजना गुंडाळून ठेवण्याची वेळ आली आहे. पावसाने दडी मारल्याने धानपिकानी माना टाकल्या आहेत. अशा स्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी निर्धारित केलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कसे पुर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.महसूल आणि वनविभागाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत राज्यासाठी ६ कोटी ४४ लाख ५६ हजार वृक्षांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यामध्ये वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, ग्रामविकास व जिल्हा परिषदवार कृषी विभाग व इतर विभागाचा यात समावेश आहे. हे उद्दिष्ट विभाग व जिल्हानिहाय देण्यात आले आहेत. निसर्गाने लहरीपणा दाखविल्याने सध्या जिल्ह्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून साकारलेले नाला बंधारे, माती नाला बंधारे, यामध्ये पाणी कमी आले. त्यामुळे झाडे लावल्यानंतर ती जगण्याची शक्यता खूपच कमी आहे. पाऊस सुरु असताना झाडे लागली गेली असली तर ती काही प्रमाणात जगली असती. परंतु आता पावसाने मोठी अडचण निर्माण केली आहे. शतकोटी योजनेचे उद्दिष्टे पूर्ण झाले तरी लावलेली झाडे जगणार कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशाही परिस्थितीत महसुल व वनविभागाने शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत राज्यात ६ कोटी ४४ लाख ५६ हजार झाडे लावण्याचे नियोजन करुन आराखडा तयार केला आहे. हा आराखडा जिल्हानिहाय व विभागनिहाय असून पावसाळा संपण्यापूर्वी ही झाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्था सहकारी संस्थाचा मदतीने हे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे. (तालुका प्रतिनिधी)