शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव जाणार केंद्राकडे

By admin | Updated: January 3, 2015 22:55 IST

सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहर वासीयांना दोन वेळी पाण्याचा शुध्द पुरवठा व्हावा यासाठी नगर पालिका प्रशासनाने ४ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना तयार केली होती. या पाणीपुरवठा योजनेत

इंद्रपाल कटकवार - भंडारासव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहर वासीयांना दोन वेळी पाण्याचा शुध्द पुरवठा व्हावा यासाठी नगर पालिका प्रशासनाने ४ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजना तयार केली होती. या पाणीपुरवठा योजनेत बदल करुन ७० कोटींची ही योजना १३५ कोटींपर्यंत गेली आहे. या आशयाचा प्रस्ताव जानेवारी २०१५ पर्यंत पाठविला जाण्याची शक्यता होती. मात्र हायड्रोलिक मॉडयूलींगचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. भंडारा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेची नितांत गरज होती. याअंतर्गत काही वर्षांपूर्वी नगर पालिकेने सुजल निर्माण व नगरोत्थान योजनेअंतर्गत जवळपास ७० कोटींची योजना तयार केली होती. याचा प्रस्तावही मुंबई येथील संबधित मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता. यात प्रथम ट्प्प्यातील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत सर्वेक्षणासाठी ५० लाखांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला होता. त्याअंतर्गत एनर्जी आॅडीट, वॉटर आॅडीट, ग्राहक सर्वेक्षण, जीआयएस मॅपींग सर्वेक्षण व हायड्रोलिक मॉडयूलींग चे काम करण्याचे ठरविण्यात आले होते. यातील फक्त मॉडयूलींग चे काम शिल्लक असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता कांबळे यांनी सांगितले.आगामी ३० वर्षासाठी ही वाढीव पाणीपुरवठा योजना असून नव्याने बाबू बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आरुढ झालेल्या प्रशासनाने या पाणीपुरवठा योजनेची रुपरेषा काही प्रमाणात बदलली आहे. या योजनेचा समावेश आता ‘अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फार स्मॉल अ‍ॅण्ड मिडीयम टाऊन’ मध्ये करण्यात आला आहे. परिणामी या योजनेचा खर्च ७० कोटी वरुन १३५ कोटीपर्यंत जाण्याची शक्यता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या आशयाच्या प्रस्तावाला अंतिम रुप देण्याचे काम सुरु असून तो प्रस्ताव जानेवारी अखेरी संबंधित मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार होता. मात्र आता याबाबत नवीन निर्णय घेण्यात आला असून हा वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.