शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी केंद्र-राज्य सरकार असंवेदनशील

By admin | Updated: April 1, 2017 00:37 IST

दिवसेंदिवस धान शेतीसाठी खर्च वाढत असूनही धानाला योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे,...

प्रफुल्ल पटेल यांचा आरोप : एप्रिल महिन्यात राष्ट्रवादी करणार आंदोलनेभंडारा : दिवसेंदिवस धान शेतीसाठी खर्च वाढत असूनही धानाला योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे, असे असतानाही केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या समस्याविषयी गंभीर नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी व शेतकरीविरोधी सरकारच्या धोरणांविरूद्ध येत्या १५ एप्रिलनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्यात धरणे, आंदोलने, निदर्शने करणार असल्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिला.स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु या तीन वर्षात जिल्ह्यात कुठलाही विकास शोधून सापडत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला खर्चावर आधारीत समर्थन मूल्य नाही.यापूर्वी देशात व राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना शेतमालाला योग्य तो भाव देण्यात आला होता. देशात आणि राज्यात सत्ता परिवर्तन झाले तर शेतकऱ्यांना समर्थन मूल्य वाढवून दिले जाईल, अशी आश्वासने लोकसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. परंतु मागील तीन वर्षांत एकही आश्वासने पूर्ण झालेली नाही. लोकसभा, विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली नाही. शेतमालाच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च, मजुरी, बियाणांचा खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारनियमनाच्या समस्यांनी शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. पीकविमा योजनेचे काम खाजगी कंपनीला दिल्यामुळे एकाही शेतकऱ्याला पिकविम्याचा लाभ मिळाला नाही. भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात बेरोजगारीची समस्या आहे. ‘भेल’ प्रकल्पाचे काम रखडले आहे. ‘अच्छे दिन’चा नारा देऊन निवडणुका जिंकणाऱ्या सरकारने जिल्ह्यात सुईच्या टोकाईतकाही विकास केलेला नाही. सामान्य माणसाचा जीवनस्तर तीन वर्षांत एक टक्काही सुधारलेला नाही. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण जिल्ह्यात धरणे, आंदोलने, मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणार असल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, अ‍ॅड.जयंत वैरागड़े, सभापती नरेश डहारे उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)