शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:40 IST

केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना केंद्र आणि राज्यात असणाऱ्या युतीच्या शासनाने बंद केल्या आहेत. यामुळे गावात उदासीनतेचे चित्र बघायला मिळत आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : मोहगाव येथे ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : केंद्र आणि राज्य शासनाचे चुकीचे धोरणामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्था व व्यवसाय गडगडले आहेत. गावाचे चित्र भकास झाले आहे. विकास शोधून सापडत नाही. ग्रामपंचायतीच्या तिजोऱ्या रिकाम्या आहेत. युपीए शासनाचे काळातील योजना केंद्र आणि राज्यात असणाऱ्या युतीच्या शासनाने बंद केल्या आहेत. यामुळे गावात उदासीनतेचे चित्र बघायला मिळत आहे. सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.तुमसर बपेरा राज्य मार्गावरील मोहगाव (खदान) येथे नवनिर्मित ग्राम पंचायत भवनाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मधुकर कुकडे होते. नवनिर्मित ग्राम पंचायत भवनाचे उद्घाटन खासदार पटेल यांच्या करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार अनील बावनकर, जिल्हा परिषदेचे सभापती धनेंद्र तुरकर, महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतीक्षा कटरे, प्रेरणा तुरकर, विजय डेकाटे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष गजानन लांजेवार, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव कहालकर, उमेश तुरकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विठ्ठलराव रहमतकर, सरपंच उमेश कटरे, बिंदू मोरे उपस्थित होते.खा.पटेल म्हणाले, नोटबंदी आणि जीएसटीने ग्रामीण अर्थव्यवस्था ढासळली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेली आहेत. उज्ज्वला गॅस योजनेने महिलांना लॉलीपॉप ठरत आहे. गॅस खरेदी करणे मुश्कील झाले आहे.साडेचार वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने सामान्य जनतेचे दिवाळे काढले आहेत. युपीए आणि आघाडी शासनाच्या कार्यकाळात सिहोरा परिसरात महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पूर्ण केला आहे. ग्राम पंचायत मध्ये निधी होता. परंतु अनेक योजना बंद करण्यात आल्याने निधी नाही.रोजगार हमी योजने अंतर्गत पैसे सुद्धा शासन वेळेवर देत नाही. जनधन योजनेत गरीबांनी खाते उघडले. परंतु ही योजना कुठे गायब झाली कळत नाही. केंद्र व राज्यातील सरकारला खुर्चीवरून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचेही ते खासदार पटेल म्हणाले.याप्रसंगी खासदार मधुकर कुकडे, सभापती धनेंद्र तुरकर यांचीही समयोचित भाषणे झाली. संचालन गजानन लांजेवार यांनी तर आभार सरपंच उमेश कटरे यांनी मानले.