शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जनगणना म्हणजे व्यवस्था बदलणे होय, माणसे मोजणे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

मोहाडी : हेतुपुरस्सर ओबीसींची जनगणना करण्यास टाळाटाळ करण्यामागे राज्यकर्त्यांचा डाव असून जनगणना करणे म्हणजे व्यवस्था बदलविणे होय, फक्त माणसे ...

मोहाडी : हेतुपुरस्सर ओबीसींची जनगणना करण्यास टाळाटाळ करण्यामागे राज्यकर्त्यांचा डाव असून जनगणना करणे म्हणजे व्यवस्था बदलविणे होय, फक्त माणसे मोजणे नाही, असे प्रतिपादन ओबीसी महामोर्चाचे बाळासाहेब गावंडे, यवतमाळ यांनी मोहाडी येथे आयोजित ओबीसी अधिकार मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.

ओबीसींचे अधिकार या विषयावर पंचायत समिती मोहाडीच्या सभागृहात एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब गावंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी जातीव्यवस्था या देशात निर्माण करण्यात आली, त्यानुसार ब्राह्मण हे कर्मकांड करतील. छत्रिय हे रक्षणाचे काम करतील, तर वैश्य हे व्यापार करतील व या उच्च जातींची सेवा करण्याचे कार्य शूद्रांना देण्यात आले आणि शूद्रांत ओबीसींची गणना करण्यात येते. त्यामुळेच उच्च जातींची मुले उच्च पदावर आणि ओबीसी व इतर जातींची मुले चपराशी, बाबू, बळेबाबू, पोलीस, सैनिक या पदावर घेतले जातात आणि यांना हुकूम, आदेश देणारे कोण तर उच्च वर्णीय लोक याचा विचार करणे अतिआवश्यक झालेले आहे.

आपण ओबीसी ६५ टक्के असूनही आजही उच्चवर्णीयांची गुलामी करीत आहोत. २०१६ मध्ये ३१४ ओबीसींचे यूपीएससीमध्ये सिलेक्शन झाले होते. परंतु, सरकारने क्रिमिलेअरची अट घालून या ३१४ मुलांचे सिलेक्शन रद्द केले. त्या मुलांना काय वाटले असेल, एवढी मेहनत घेऊन. दुसरीकडे ओम बिर्ला यांची मुलगी यूपीएससीची परीक्षा न देताही तिला सुपर क्लास वनची पोस्टिंग देण्यात आली. या प्रकरणाचासुद्धा ओबीसींनी विचार करायला हवा. जो प्रधानमंत्री स्वतःला ओबीसी म्हणवून घेतो, तोच सर्वोच्च न्यायालयात हलफनामा प्रस्तुत करतो की, ओबीसींची जनगणना करता येणार नाही. याला काय म्हणावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम धर्मशास्त्र नाकारले होते आणि अठरापगड जातींच्या हातात तलवारी दिल्या होत्या आणि रयतेचे राज्य स्थापन केले होते. म्हणून, महाराजांना बहुजन प्रतिपालक शिवाजी महाराज असे संबोधले जात होते. त्यांचे राज्य म्हणजे शेतकऱ्यांचे राज्य होते. त्यांच्या राज्यात जाती व्यवस्थेला थारा नव्हता. आरमाराचे प्रमुख मुसलमान होते. तुकाराम महाराजांनीसुद्धा आपली ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली आहे. हे ग्रामगीतेच्या पहिल्याच पानावर नमूद आहे आणि शेतकरी म्हणजे कोण तर ओबीसी.

ओबीसींची जनगणना झाली तर ओबीसींचा खरा आकडा देशासमोर येईल आणि त्या लोकसंख्येच्या आधारावर ओबीसींना सेवा, सवलती द्याव्या लागतील आणि जर ओबीसी सुखी, संपन्न व सुशिक्षित झाला, तर आपला गुलाम राहणार नाही व आपण राज्यकर्ते होऊ शकणार नाही म्हणून ओबीसींची जनगणना होऊ दिली जात नाही. हिंदू हिंदू करून ओबीसींना या मुद्द्यावरून दुसरीकडे वळविण्याचे कारस्थान रचले जात आहे. याचेसुद्धा भान ठेवावे लागेल. त्यामुळे ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, यासाठी ओबीसींनी आता एल्गार पुकारावा व त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण, डॉ. सुनील चवळे, आशीष माटे, ज्ञानेंद्र आगाशे उपस्थित होते.