शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

भटक्यांच्या वस्तीत भाऊबीज साजरी

By admin | Updated: November 2, 2016 00:43 IST

समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भटक्या बांधवांनाही इतरांप्रमाणे दिवाळीचा आनंद घेता यावा ...

फुंकर आपुलकीची : भेट देणारे आणि भेट घेणारेही भारावलेभंडारा : समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याच्या प्रयत्नात असलेल्या भटक्या बांधवांनाही इतरांप्रमाणे दिवाळीचा आनंद घेता यावा म्हणून भटके विमुक्त परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवा विभागांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील भटक्यांच्या चार वस्त्यांमध्ये आज मंगळवारला भाऊबीज साजरी करण्यात आली. भटक्या समाजातील बांधवांना ओवाळून त्यांना भेटवस्तू देण्यात आले. झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मिळालेले प्रेम आणि आपुलकी पाहून भटके समाजबांधव भारावलेले दिसत होते.आज एकीकडे प्रत्येक सणांचा स्वच्छंदपणे आनंद घेतला जात असताना आपल्या पैकीच असलेले मात्र भटके म्हणून ओळखले जाणारे समाजबांधव हा आनंद साजरा करू शकत नाही. अनेक अडीअडचणी आणि समस्यांसह जीवन जगत असलेल्या या भटक्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांनाही एक नागरिक म्हणून सर्व अधिकार मिळावे व सामान्य नागरिकाप्रमाणे जीवन जगता यावे, यासाठी भटके विमुक्त परिषद धडपडत आहे. हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण सण असलेल्या दिवाळी या सणाच्या निमित्ताने भटक्यांच्या वस्त्यांमध्ये आनंद पसरावा म्हणून आज मंगळवारला भटके विमुक्त परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्यावतीने भटक्यांच्या वस्तीत जाऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. भंडारा शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या कतारी समाजाच्या वस्तीत जाऊन भटक्या बांधवांना ओवाळण्यात आले व भेटवस्तू देण्यात आले. याचवेळी बिऱ्हाडातील महिलांनाही भेटवस्तू देण्यात आले. फराळ करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी सुंदरलाल अंकूशे या भटक्या बांधवाने मनोगत व्यक्त करताना अशा उपक्रमांमुळे आम्ही समाजात सन्मानाने जगू शकत असल्याचे सांगितले. यामुळे आम्हाला आमचे हक्क व अधिकारी मिळू लागले असून शिक्षणापासून ते सर्वच क्षेत्रात पूढे येण्याची संधी मिळत असल्याचे सांगून असेच सोबत रहा, असा आग्रह त्यांनी केला. यावेळी नगर संघचालक अनिल मेहर व व्यापारी सतराम कौराणी यांना भटक्या समाजातील महिलांनी ओवाळले. कतारी समाज बांधवांसोबत भाऊबीज साजरी केल्यानंतर कारधा येथील मांग, गारुडी लोकांसोबतही संध्याकाळी साजरा करण्यात आली. लाखांदूर व लाखनी तालुक्यातील भटक्यांच्या वस्तीत जाऊन कार्यक्रमात सहभाग घेतला. भटक्या बांधवांसाठी दिलेल्या भेटवस्तू समाजातील दानशूर मंडळींकडून घेण्यात आल्या होत्या. यावेळी जिल्हा संघचालक राम चाचेरे, विहिंप जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, जिल्हा सहकार्यवाह रामकृष्ण बिसने, जिल्हा प्रचार प्रमुख राजेंद्र दोनाडकर, विभाग प्रचारक राहूल चव्हाण, सुखराम कटरे, जिल्हा प्रचारक प्रशांत कावरे, पंकज देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक शिवशंकर नाकाडे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन शिवा कांबळी यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)