शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमाअभावी शेतकरी संकटात

By admin | Updated: July 4, 2016 00:35 IST

शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात सुमार सापडला असताना त्याच्या मदतीकरिता शासन, प्रशासनही डोळेझाक करीत आहे.

न्यायाची अपेक्षा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षपालांदूर : शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात सुमार सापडला असताना त्याच्या मदतीकरिता शासन, प्रशासनही डोळेझाक करीत आहे. संकटकालीन स्थितीत पिकविमा कामात यावा, याकरिता शेतकरी पिक कर्जासोबत विमा उतरवितो. यातून थोडीफार मदतीची अपेक्षा धरीत धैर्याने शेती कसतो. पालांदूर परिसरात सतत तीन वर्षापासून कोरडा, ओला दुष्काळ पडत आला आहे. २०१४-२०१५, २०१५-२०१६ या दोन वर्षात दुष्काळ पडत ५० पैशाच्या आत आणेवारी जाहीर करून जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळाला. मात्र विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा पालांदूर येथील लाभार्थ्यांना पिकविमा मिळालाच नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटांचा सामना करीत आहे.विमा कंपनी व विदर्भ ग्रामीण बँक यांच्यात समन्वय नसल्याने ग्राहकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. २०१४-२०१५ चा पिकविमा लगेच सहा महिन्यात मिळणे अगत्याचे असल्याने आजही मिळाला नसल्याचे पत्रपरिषदेत नत्थू सीताराम खंडाईत रा. पालांदूर यांनी सांगितले. दोन वर्षात दुष्काळ पडून पिकविमा कंपनी विमा रक्कम द्यायला टाळाटाळ का करते हे अनुत्तरीत आहे. जिल्हा, तालुका, गाव एकच असताना पिकविमा मंजूर होऊनही न मिळणे म्हणजे लोकशाहीची कुचंबना करणे होय. वारंवार क्षेत्रीय व्यवस्थापक ग्रामीण बँक भंडारा यांच्याशी प्रत्यक्ष भेटूनही आश्वासनाच्या भोपळ्यापलिकडे हातात काहीही लागले नाही. पाहू, प्रयत्न सुरु असून वरिष्ठांकडे विषय वर्ग केला असून लवकरच विमारक्कम मिळण्याची आशा दाखवतात. परंतू कृती शून्य आहे.प्रभावित शेतकरी विचारतो कर्ज घेतेवेळी शेतकऱ्याला तात्काळ व्याज सुरु होतो. मग आता २ वर्षापासून पिकविम्याची रक्मक मिळाली नसल्याने लाभार्थ्यांना त्या रकमेचा व्याज मिळेल काय? वर्षाच्या अनेक फेऱ्या क्षेत्रीय बँक भंडाऱ्याला माराव्या लागल्या. याचा खर्च मिळेल काय? वारंवार भ्रमणध्वनी वरून विषयाला हात घालून विचारणा करावी लागली याचा खर्च मिळेल काय? न मिळाल्यास ग्राहक मंचात धाव घ्यावी लागेल.आमचा लोकप्रतिनिधींनी व्यापारी झाल्याने निवडणुकीपुरताच आमचा आहे. 'रुपया लगाव रुपया कमाव' सूत्राने वागत असल्याने लोकप्रतिनिधींचा धाक, प्रशासनावर उरला नाही. याचा वाईट परिणाम समाजमनावर होऊन लोकप्रतिनिधीविषयी राग जोर करीत आहे. (वार्ताहर)पिकविमा प्रकरण वरिष्ठस्तरावर गेलेला आहे. शाखास्तरावर येताच तात्काळ लाभार्थ्यांना वाटप करण्यात येईल. क्षेत्रीय स्तरावर प्रक्रियासुरु असून पुढील कार्यवाहीकडे लक्ष आहे. ग्राहक आमचेच असल्याने काळजी सुरु आहे. - संजय सेलूकरशाखा व्यवस्थापक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, पालांदूर (चौ.)