शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

रास्ता रोकोतील आंदोलकांना आश्वासनाचे गाजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:40 IST

फोटो चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानाचे चुकारे अडल्याच्या कारणावरून भाजपच्या वतीने सिहोरा येथे भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको ...

फोटो

चुल्हाड (सिहोरा) : उन्हाळी धानाचे चुकारे अडल्याच्या कारणावरून भाजपच्या वतीने सिहोरा येथे भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. चर्चेत तोडगा निघाला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी पुन्हा १५ दिवसांचा अल्टिमेटम शासनाला देण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका करण्यात आली आहे. आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी यांनी केले.

उन्हाळी धानाचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळाले नाही. यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाचे गर्तेत जात आहे, आर्थिक अडचणीचा सामना करीत असताना राज्य सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. या शिवाय बोनसची अर्धी राशी मिळालेली नाही. शासन ठोस उपाययोजना करीत नाही. फक्त कागदी घोडे नाचवत वेळ मारून नेली जात आहे. शेतकऱ्यांना आश्वासनाचे गाजर दाखवीत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात निधीअभावी बोजवारा सुरू आहे. नदीपात्रातून गाळ उपसा करण्यात येत नसल्याने पाण्याचा उपसा करताना अडचणी येत आहेत. पंपगृहामध्ये अनेक समस्या आहेत. मान्सून पूर्व या समस्या निकाली काढण्यात येत नाही. यामुळे जलद गतीने पाण्याचा उपसा चांदपूर जलाशयात होत नाही. राज्य सरकारने नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. खरीप हंगामात सुरू असताना खत पुरवठा करण्यात येत नाही. कृषी विभागाची यंत्रणा असताना चौकशी व कारवाई करीत नाही. या व अन्य विषयाला घेऊन सिहोरा गावात राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजेपासून परिसरातील शेतकरी आंदोलनस्थळी जमा झाले, या रास्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी, तालुकाध्यक्ष राजेश पटले, किसान आघाडीचे सुभाष बोरकर यांनी केले. रास्ता रोको आंदोलनात राज्यातील महाआघाडी शासनाचा खरपूस समाचार घेण्यात आला. नंतर आंदोलनकर्त्यांचे विषयावर चर्चा करण्यात आली, चर्चेत तहसीलदार तेले, कार्यकारी अभियंता कुरझेकर, उपविभागीय अभियंता सिंग, स्नेहल सोनटक्के, पोलीस निरीक्षक पाटील, न्यायमूर्ती, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे उपस्थित होते. शेतकरी व जनसामान्यांना न्याय देणाऱ्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. परंतु चर्चेत तोडगा निघाला नाही.

आंदोलनकर्त्यांना भरीव आश्वासन मिळाले नाही. यानंतर भाजपचे नेते व कार्यकर्ते थेट राष्ट्रीय महामार्गावर आले. माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार चरण वाघमारे, तारिक कुरेशी, तालुकाध्यक्ष राजेश पटले, सुभाष बोरकर, किशोर राहगडाले, सतीश चौधरी, बंटी बानेवार, देवानंद लांजे, बंडू बनकर, डॉ. अशोक पटले, विकास बिसने, नंदू राहंगडाले, अंबादास काणतोडे, पिंटू हूड, मयूरध्वज गौतम, गजानन निनावे, मोतीलाल ठवकर, योगराज तेंभरे, सचिन खांगार, गोपाल येडे, नंदू तुरकर, विनोद पटले, डॉ. मुरलीधर बानेवार, मुन्ना फुंडे, भास्कर सोनवणे, अमित जयस्वाल, सुनील पटले यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत होणार नाही, याकरिता आंदोलनकर्त्यांना अटक व सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी शासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. पुन्हा बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनस्थळी शेतकरी व जनसामान्य नागरिकांची गर्दी लक्षात घेता पोलीस निरीक्षक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती.