शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

उमेदवारांची लढत उन्हाशीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:59 IST

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे. वाढत्या उन्हाचे चटके नेते आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.

ठळक मुद्देतापमान चाळीशी पार : उकाड्याने नेते, कार्यकर्ते घामाघूम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे. वाढत्या उन्हाचे चटके नेते आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ, वाशिम मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली आहे. गावागावातील मतदारापर्यंत पोहचण्याची उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडपड सुरू आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे त्यात अडथडा येत आहे. कायम वातानुकूलीत वाहनात फिरणारे नेते आणि कार्यकर्ते अक्षरक्ष: घामाघूम होत आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तसाही विदर्भाचा उन्हाळा कडकच असतो. गत आठवड्यापासून कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे असल्याचे दिसत आहे. सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदविली जात आहे. राज्यात उष्णतेची लाट आली असून त्यात आणखी भर पडणार आहे.उमेदवार आणि कार्यकर्ते वातानुकूलीत वाहनातून गावात पोहचत असले तरी तेथे लोकांमध्ये मिसळण्यासाठी खाली उतरावेच लागते. त्यावेळी अंगाची लाहीलाही होते. उन्हात फिरण्याची सवय नसलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांची प्रकृतीही बिघडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारांच्या प्रश्नांसोबतच उन्हाच्या तडाक्याचा सामनाही उमेदवाराला करावा लागत आहे.भंडारा-गोंदियाचा पारा ४१ अंशावर, सकाळपासून चटकेभंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे शुक्रवारी तापमान ४१ अंश सेल्सिअस होते. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. यामुळे प्रचार यंत्रणा दुपारी सुस्तावते.वातानुकूलीत वाहनात फिरणाऱ्या नेत्यांची उन्हाने चांगलीच त्रेधा उडत आहे. वाहनातून खाली उतरल्यापासून चेहºयावरील घामच टिपावा लागतो.दुपारी प्रचारासाठी गावात गेलेल्या नेते, कार्यकर्त्यांना मतदार भेटत नाही. उन्हात सभा आणि बैठका घेणेही शक्य नाही. त्यामुळे सकाळी व सायंकाळी प्रचारावर भर देतात.उन्हात फिरण्याची सवय नसलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते. पाणी आणि खाद्य पदार्थाची काळजी घेताना मोठी कसरत होते. गावात गेल्यावर सोबतचे मिनरल वॉटर प्यालास मतदारांचा गैरसमज होवू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांनी दिलेलेच पाणी आणि खाद्य पदार्थ घेतल्याशिवाय प्रचार दौºयामध्ये पर्याय नसतो.