शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

उमेदवारांची लढत उन्हाशीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:59 IST

लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे. वाढत्या उन्हाचे चटके नेते आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.

ठळक मुद्देतापमान चाळीशी पार : उकाड्याने नेते, कार्यकर्ते घामाघूम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. सध्या पारा ४० अंशावर पोहचला असून त्यात आणखी वाढ होणार आहे. विदर्भातील सात मतदार संघात पहिल्या टप्यात मतदान होत असून प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांची पहिली लढत उन्हाशी होत आहे. वाढत्या उन्हाचे चटके नेते आणि कार्यकर्त्यांना बसत आहे.विदर्भातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर आणि यवतमाळ, वाशिम मतदार संघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरूवात झाली आहे. गावागावातील मतदारापर्यंत पोहचण्याची उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धडपड सुरू आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे त्यात अडथडा येत आहे. कायम वातानुकूलीत वाहनात फिरणारे नेते आणि कार्यकर्ते अक्षरक्ष: घामाघूम होत आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तसाही विदर्भाचा उन्हाळा कडकच असतो. गत आठवड्यापासून कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे असल्याचे दिसत आहे. सरासरीच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदविली जात आहे. राज्यात उष्णतेची लाट आली असून त्यात आणखी भर पडणार आहे.उमेदवार आणि कार्यकर्ते वातानुकूलीत वाहनातून गावात पोहचत असले तरी तेथे लोकांमध्ये मिसळण्यासाठी खाली उतरावेच लागते. त्यावेळी अंगाची लाहीलाही होते. उन्हात फिरण्याची सवय नसलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांची प्रकृतीही बिघडण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारांच्या प्रश्नांसोबतच उन्हाच्या तडाक्याचा सामनाही उमेदवाराला करावा लागत आहे.भंडारा-गोंदियाचा पारा ४१ अंशावर, सकाळपासून चटकेभंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे शुक्रवारी तापमान ४१ अंश सेल्सिअस होते. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवायला लागतात. यामुळे प्रचार यंत्रणा दुपारी सुस्तावते.वातानुकूलीत वाहनात फिरणाऱ्या नेत्यांची उन्हाने चांगलीच त्रेधा उडत आहे. वाहनातून खाली उतरल्यापासून चेहºयावरील घामच टिपावा लागतो.दुपारी प्रचारासाठी गावात गेलेल्या नेते, कार्यकर्त्यांना मतदार भेटत नाही. उन्हात सभा आणि बैठका घेणेही शक्य नाही. त्यामुळे सकाळी व सायंकाळी प्रचारावर भर देतात.उन्हात फिरण्याची सवय नसलेल्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागते. पाणी आणि खाद्य पदार्थाची काळजी घेताना मोठी कसरत होते. गावात गेल्यावर सोबतचे मिनरल वॉटर प्यालास मतदारांचा गैरसमज होवू शकतो. त्यामुळे गावकऱ्यांनी दिलेलेच पाणी आणि खाद्य पदार्थ घेतल्याशिवाय प्रचार दौºयामध्ये पर्याय नसतो.