शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

रानडुक्कर, रोहीचे संरक्षण रद्द करा

By admin | Updated: August 4, 2014 23:35 IST

पूर्व विदर्भात शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर आणि रोही, निलगाय उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांना केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अंतर्गत असलेल्या सुची

भंडारा : पूर्व विदर्भात शेतातील उभ्या पिकांचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर आणि रोही, निलगाय उपद्रवी ठरणाऱ्या प्राण्यांना केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अंतर्गत असलेल्या सुची क्रमांक ३ मध्ये संरक्षण देण्यात आले आहे. सदर संरक्षण रद्द करून सुची क्रमांक ५ मध्ये समावेश करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन केंद्रीय वने व पर्यावरण मंत्र्यांना साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीराम दादा टिचकुले यांनी दिले आहे. विशेष म्हणजे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ४४० गावातील ११ हजार ३०६ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या यावर आहेत. या संदर्भात सकारात्मक निर्णय झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात होणारे नुकसान थांबविले जाऊ शकते.पुर्व विदर्भातील धान आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रानडुक्कर आणि रोही या प्राण्यांचा शेतीसाठी प्रचंड उपद्रव आहे. शेतात उभ्या पिकाची या दोन्ही वन्य प्राण्यांकडून प्रचंड नासाडी केली जाते. पिकांचे डोळ्यादेखत नुकसान होत असतानाही या प्राण्यांना मारण्याची परवानगी शेकऱ्याला नाही. परिणामी नुकसान सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील ४० टक्के क्षेत्र झुडपी जंगलाने व्याप्त आहे. रानडुक्कर आणि रोही दिवसभर झुडपी जंगल आणि शेतात लपून राहतात व रात्रीच्या वेळी समुहाने येवून शेतपिकाचे नुकसान करतात.केंद्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या क्रमांक १ च्या सुचीमध्ये समाविष्ट असलेल्या बिबट, चित्ता, वाघ, सिंह या प्राण्यांचे खाद्य म्हणून रानडुक्कर आणि रोही यांचा समावेश सुची क्रमांक ३ मध्ये असल्याने या प्राण्यांची विनापरवानगी शिकार करता येत नाही. हा अधिनियम लागू झाल्यापासून ४० वर्षानंतर वाघ, सिंह यांच्या प्रजनाचे कमी झालेले प्रमाण आणि वाढलेली अवैध शिकार यामुळे या प्राण्यांची संख्या नगण्य झाली आहे. जेव्हा की, रानडुक्कर व रोही यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. शासनाकडून वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आलेले नाहीत. जंगलामध्ये या प्राण्यांना पुरेशा प्रमाणात खाद्य न मिळाल्याने प्राण्यांनी गावाच्या आणि शेतीच्या दिशेने वाटचाल करणे सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यादेखत नुकसान पहावे लागत आहे. शासनाकडून परवानगी घेवून या प्राण्यांना मारण्याची सोय आहे. मात्र परवानगी घेताना असलेल्या अटी यामुळे याचा कुणीही लाभ घेत नाही. नुकसानीनंतर शासनाकडून मिळणारी भरपाईसुद्धा होणाऱ्या नुकसानीचा दहा टक्केच असते. अशा परिस्थितीत सुची क्रमांक ३ मध्ये असलेले संरक्षण रद्द करून सुची क्रमांक ५ मध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केंद्रीय वने व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे दादा टिचकुले यांनी केली आहे. (प्रतिनिधी)