शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

प्रकल्पग्रस्तांकरिता जाचक अटी रद्द करा

By admin | Updated: October 7, 2014 23:30 IST

जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन त्यांनी १२००

भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन त्यांनी १२०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि त्याचे वाटपही सामाजिक न्यायभवनात असलेल्या गोसेखुर्द पुनर्वसन विशेष पॅकेज अंतर्गत वितरण सुरु आहे. परंतु सालेबर्डी, पांधी, पिंडकेपार, खैरी येथील प्रकल्पग्रस्तांवर जाचक अटी लादल्या जात आहेत. त्या जाचक अटी रद्द करा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमीनी, घरे, शासनाने राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पात संपादित करून त्यांना मोबदल्याचे नोटीस दिले. नोटीसमधील भूधारक मय्यत असल्यास त्यांच्या वारसांना कीचकट अटींची पूर्तता करावी लागते. मय्यत असल्यास जाहीरनामा प्रकाशित करणे, वारसानाची सहमतीपत्र, इंडेमिटीबाँड या अटींची पूर्तता प्रकल्पग्रस्तांनी मूळ मोबदला मिळाला तेव्हा केली होती. परंतु आता प्रकल्पग्रस्तांना मुळ मोबदला अत्यल्प असल्याने शासनाने १२०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज गोसेखुर्द प्रकल्पासाठी घोषित केले व त्याचे वितरण गोसेखुर्द पुनर्वसन विशेष विभागाची सामान्य क्रमांक १,२,३ अशी विभागाची निर्मिती करून प्रकल्पग्रस्तांना विविध लाभांश चे पॅकेज नोटीस देण्यात आले. नंतर प्रकल्पग्रस्तांनी ते नोटीस तहसील कार्यालय स्थित पाच महिन्यापूर्वी गोसेखुर्द पुनर्वसन कार्यालयात प्रत्येकी १०० रुपयांचे तीन ते चार कोर्ट फी स्टँपपेपरवर शपथपत्र, करारनामा, तलाठी वारसानपत्र, सहमतीपत्राच्या माध्यमातून पाच महिन्यापूर्वी जमा करून दिले व प्रकल्पग्रस्तांकडून बँक खातेही मागितले. परंतु आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही माशी कुठे शिंगली कुणास ठाऊक? याआधी भूसंपादन अधिकारी जोशी यांनी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त गावाचे मय्यत वारसानाची प्रकरणे सह्या करून निकाली काढून त्यांच्या खात्यात दहा दिवसाच्या अवधित संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा केली. सध्या संबंधित कार्यालयाचे भूसंपादन अधिकारीचे कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी बनकर सांभाळत आहेत. त्यांनी संबंधित गावाच्या तलाठ्यांना बोलावून मय्यत वारसानांची माहिती जाणून घेतल्याची माहिती आहे. मय्यत वारसांची प्रकरणे योग्य असल्यास त्यांची प्रकरणे निकाली काढून रक्कम अदा करण्यात यावे अशी मागणी सालेबर्डी, पांधी, खैरी प्रकल्पग्रस्त करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या या समस्येकडे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कोणत्याही प्रकारचे अटी न लादता इतर भूधारकांचे प्रकरणे निकाली काढून, पॅकेज रक्कम खात्यात जमा करण्याची मागणी जोर धरत आहे. (नगर प्रतिनिधी)