शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांकरिता जाचक अटी रद्द करा

By admin | Updated: October 7, 2014 23:30 IST

जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन त्यांनी १२००

भंडारा : जिल्ह्यात हरितक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पांतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात येऊन त्यांनी १२०० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आणि त्याचे वाटपही सामाजिक न्यायभवनात असलेल्या गोसेखुर्द पुनर्वसन विशेष पॅकेज अंतर्गत वितरण सुरु आहे. परंतु सालेबर्डी, पांधी, पिंडकेपार, खैरी येथील प्रकल्पग्रस्तांवर जाचक अटी लादल्या जात आहेत. त्या जाचक अटी रद्द करा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे.जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या लाख मोलाच्या जमीनी, घरे, शासनाने राष्ट्रीय गोसेखुर्द प्रकल्पात संपादित करून त्यांना मोबदल्याचे नोटीस दिले. नोटीसमधील भूधारक मय्यत असल्यास त्यांच्या वारसांना कीचकट अटींची पूर्तता करावी लागते. मय्यत असल्यास जाहीरनामा प्रकाशित करणे, वारसानाची सहमतीपत्र, इंडेमिटीबाँड या अटींची पूर्तता प्रकल्पग्रस्तांनी मूळ मोबदला मिळाला तेव्हा केली होती. परंतु आता प्रकल्पग्रस्तांना मुळ मोबदला अत्यल्प असल्याने शासनाने १२०० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज गोसेखुर्द प्रकल्पासाठी घोषित केले व त्याचे वितरण गोसेखुर्द पुनर्वसन विशेष विभागाची सामान्य क्रमांक १,२,३ अशी विभागाची निर्मिती करून प्रकल्पग्रस्तांना विविध लाभांश चे पॅकेज नोटीस देण्यात आले. नंतर प्रकल्पग्रस्तांनी ते नोटीस तहसील कार्यालय स्थित पाच महिन्यापूर्वी गोसेखुर्द पुनर्वसन कार्यालयात प्रत्येकी १०० रुपयांचे तीन ते चार कोर्ट फी स्टँपपेपरवर शपथपत्र, करारनामा, तलाठी वारसानपत्र, सहमतीपत्राच्या माध्यमातून पाच महिन्यापूर्वी जमा करून दिले व प्रकल्पग्रस्तांकडून बँक खातेही मागितले. परंतु आता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही माशी कुठे शिंगली कुणास ठाऊक? याआधी भूसंपादन अधिकारी जोशी यांनी जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त गावाचे मय्यत वारसानाची प्रकरणे सह्या करून निकाली काढून त्यांच्या खात्यात दहा दिवसाच्या अवधित संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा केली. सध्या संबंधित कार्यालयाचे भूसंपादन अधिकारीचे कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी बनकर सांभाळत आहेत. त्यांनी संबंधित गावाच्या तलाठ्यांना बोलावून मय्यत वारसानांची माहिती जाणून घेतल्याची माहिती आहे. मय्यत वारसांची प्रकरणे योग्य असल्यास त्यांची प्रकरणे निकाली काढून रक्कम अदा करण्यात यावे अशी मागणी सालेबर्डी, पांधी, खैरी प्रकल्पग्रस्त करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या या समस्येकडे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कोणत्याही प्रकारचे अटी न लादता इतर भूधारकांचे प्रकरणे निकाली काढून, पॅकेज रक्कम खात्यात जमा करण्याची मागणी जोर धरत आहे. (नगर प्रतिनिधी)