शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

डाव्याकालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीला होते. त्यांनी दुसऱ्या कंपनीला अस्तरीकरणाचे काम दिले. ते काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षे पुर्ण होऊन देखील कालव्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कच्चे काम असल्याने पावसाळ्यात कालवा फुटण्याची शक्यता असते.

ठळक मुद्देगोसेखुर्द प्रकल्पाचा डावा कालवा : बारमाही सिंचनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा-कोसरा : गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे काम अजून किती वर्षे चालणार? असा प्रश्न कोंढा परिसरातील शेतकरी विचारत आहेत. गत पाच वर्षांपासून डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना बाराही महिने सिंचनाची सोय होऊ शकली नाही.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला सिंचनाची सुविधा करण्यासाठी गोसे येथे वैनगंगा नदीवर महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ३५ वर्षे झाले पण या प्रकल्पातून बाराही महिने कालव्यातून सिंचनासाठी पाणी मिळत नाही. प्रकल्पाचे दोन मुख्य कालवे आहेत. त्यामध्ये उजवा कालवा यामधून सिंचन सुविधा सुरु झाला आहे. पण कोंढ्याजवळून जात असलेल्या डावा कालवा याचे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. डाव्या कालव्याच्या कामात निविदामध्ये मोठा गैरव्यवहार झाला, काम निकृष्ठ दर्जाचे झाले म्हणून उच्च न्यायालय नागपूर यांनी कालव्याचे कामे पुन्हा करण्याचे आदेश दिले.त्यानुसार सन २०१४ पासून डाव्या कालव्याचे अस्तरीकरण काढून पुन्हा नव्याने अस्तरीकरणाचे काम सुरु करण्यात आले होते.डाव्याकालव्याचे काम श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कंपनीला होते. त्यांनी दुसऱ्या कंपनीला अस्तरीकरणाचे काम दिले. ते काम अत्यंत धिम्यागतीने केले जात आहे. त्यामुळे पाच वर्षे पुर्ण होऊन देखील कालव्याचे काम पूर्ण होऊ शकत नाही, ही शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी कच्चे काम असल्याने पावसाळ्यात कालवा फुटण्याची शक्यता असते. सोमनाळा गेट क्र. १ जवळ डावा कालव्याचे काम अपूरे असल्याने कालव्यात जेव्हा शेतकºयांसाठी पावसाळ्यात पाणी सोडले जाते, तेव्हा कालव्याची पाळ फुटण्याची शक्यता असते, असे प्रकार ठिकठिकाणी होत आहे, तेव्हा डाव्या कालव्याचे अस्तरीकरणाचे काम करण्याची गरज आहे.कोंढा व परिसरातील शेतकºयांना बाराही महिने सिंचनासाठी पाणी मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.नवीन कालवे काढण्याची गरजगोसे प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट क्र. १ जवळ भावड, सेंद्री गावातील शेतकºयांना शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून लहान कालवे काढले आहे. परंतु कोंढा येथील शेतकऱ्यांची शेती कोंढा स्मशानभुमी ते डाव्या कालव्यापर्यंत शेकडो एकर शेती आहे. त्या शेतीला सिंचन सुविधा देण्याचा विचार झाला नाही. तेव्हा डावा कालवा मुख्य अभियंता यांनी कोंढा येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा सर्वे करुन स्मशान भूमी कोंढा ते सोमनाळा गेट क्र. १ पासुन एक उपकालवा देऊन सिंचन सुविधा देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अशाप्रकारे डाव्या कालव्याचे रखडलेले काम पूर्ण करावे तसेच कोंढा येथील शेतकऱ्यांसाठी उपकालवा मंजूर करण्याची मागणी कोंढा गावकऱ्यांनी केली आहे. हा प्रश्न न सुटल्यास भविष्यात गावकऱ्यांचे पाण्यासाठी आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प