शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अभियान

By admin | Updated: April 8, 2015 00:49 IST

या अभियानाचा मुख्य उद्देश बालकांचे आरोग्य सुधारणे व गरजू बालकांना त्वरीत सेवा उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे. ..

बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ : वंदना वंजारी यांचे प्रतिपादन भंडारा : या अभियानाचा मुख्य उद्देश बालकांचे आरोग्य सुधारणे व गरजू बालकांना त्वरीत सेवा उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेवून बालकांचे आरोग्य सुदृढ करावे. तसेच बालकांना निरोगी आरोग्य देवून बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी अभियानाची जास्तीत जास्त जनजागृती करावी व सुदृढ बालक, सशक्त युवक निर्माण करून संपन्न महाराष्ट्र निर्माण करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी यांनी केले.जागतिक आरोग्य दिनानिमित्त बाल आरोग्य अभियानाचा शुभारंभ आरोग्य विभागातर्फे सामान्य रुग्णालय येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्य व वित्त सभापती संजय गाढवे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वंदना वंजारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डोईफोडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिवेदी, आहार तज्ञ वनिता चकोले प्रामुख्याने उपस्थित होते.आपल्या उद्घाटनपर भाषणात आरोग्य सभापती गाढवे यांनी सुरक्षित आरोग्यासाठी पौष्टीक अन्नाचा वापर करावा. त्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करा. भाजीपाल्यावर किटकनाशक फवारणी टाळावी जेणे करून विषबाधीत फळे, अन्न खाण्यास टाळता येईल, असे सांगितले.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर यांनी सुरक्षित अन्नाविषयी माहिती देवून संपूर्ण जिल्ह्यात बाल आरोग्य अभियान राबविण्याविषयी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य पर्यवेक्षक भगवान मस्के यांनी केले तर आभार जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. श्रीकांत आंबेकर यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, नर्सिंग स्कुलचे प्रशिक्षणार्थी तसेच रुग्णालयातील अधिपरिचारीका व स्टाफ नर्स उपस्थित होते. (प्रतिनिधी)