शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

प्रवासी निवारा परिसरात लागले कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:44 IST

येथील प्रवासी निवारा येथे काही वर्षाआधी तंटामुक्त समितीतर्फे ३२ हजार खर्च करून येथे चार कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे बस प्रवासी निवारामध्ये प्रत्येक प्रवाशांना सुरक्षा वाटायची.

ठळक मुद्देग्रामपंचायतीचा पुढाकार : देखरेख करण्याची जबाबदारीही ग्रामपंचायतीवर

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : येथील प्रवासी निवारा येथे काही वर्षाआधी तंटामुक्त समितीतर्फे ३२ हजार खर्च करून येथे चार कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे बस प्रवासी निवारामध्ये प्रत्येक प्रवाशांना सुरक्षा वाटायची. परंतु लागलेले कॅमेरे जास्त काळ टिकू शकले नाही. कालांतराने अतिक्रमण हटाव मोहिमेत बंद कॅमेरेही हटावण्यात आले होते आणि तेव्हापासून बेपत्ता झालेले कॅमेरे याविषयीचे ‘लोकमत’ने वेळोवेळी वचा फोडली. याची दखल घेत प्रवासी निवारा अड्याळ येथे ग्रामपंचायतच्या पुढाकारातून कॅमेरे लावण्यात आले. यामुळे ग्रामस्थ तथा प्रवाशांनी ग्रामपंचायतचे आभार माणले.अड्याळ प्रवासी निवारामध्ये रोज सकाळ सायंकाळ शाळेच्या वेळेवर जिकडे तिकडे विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु या दोन्ही वेळेला इथे एकही वाहतुक नियंत्रक नसल्यामुळे वाटेल तिथे मिळेल त्या ठिकाणी विद्यार्थी, प्रवासी, वाहने उभे असतात परंतु यामुळे धोका कधीही होऊ शकतो परंतु याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते आणि जेव्हा एखादी घटना घडली की मग अचानकपणे पोलिसांचा ताफा दिसून येतो.याला म्हणायचे तरी काय, तहाण लागल्यावर विहिर खोदण्याचे शहापणपण योग्य राहिल का की त्याआधीच प्रयत्न महत्वाचे आहे, हा एक प्रश्नच आहे.सीसीटीव्ही कॅमेरे उपयोगाचे कुणाचे, हाही एक प्रश्नच आहे. लावलेल्या कॅमेरा यंत्राचे वेळोवेळी देखभाल तसेच याची मुख्य यंत्रणा सध्या ग्रामपंचायतमध्ये आहे परंतु ही यंत्रणा पोलीस स्टेशन अड्याळ कार्यालयातच ठेवावी तसेच यानंतर पोलीस प्रशासनाने या यंत्रणाची जबाबदारी देखभाल करावी, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. परंतु याला भंडारा पोलीस अधिक्षक मान्यता देणार की नाही अशीही चर्चा सध्या गावात रंगत आहे.सीसीटीव्ही कॅमेरामुळे सर्वात जास्त मदत ग्रामस्थांना तर होईलच परंतु त्याहीपेक्षा पोलीस प्रशासनाला होऊ शकते. मागील अनेक वर्षापासून कॅमेरे बंद घरात कैद होते. आणि त्यांना पुन्हा कार्यान्वीत करण्याचे काम येथील ग्रामपंचायत कार्यालयाने केले आहे. यासाठी पुन्हा पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रत्येकी एक एक कॅमेरा दिला तर प्रवासी निवारामध्ये पुन्हा सुरक्षेत भर पडू शकते.अड्याळ बस प्रवासी निवारा मधील खड्डे बुजले आणि कॅमेरे लावण्यात आले परंतु आजही मोठा प्रकाश देणारे पथदिवे लागले नाही. याहीमुळे इथे अंधारातच प्रकाश दिसतो. बस प्रवासी निवारा येथे सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थी घराला जाण्यास बेकाबु दिसतात त्यामुळेच की काय बस आल्यानंतर संपूर्ण विद्यार्थी धाव घेतात यामुळे मोठा अपघात कधीही याठिकाणी होवू शकतो. याची शक्यताही नाकारता येत नाही. लागलेले कॅमेरे आपला काम करतीलच परंतु अपघात होणार नाही यासाठी याठिकाणी कुणाची आणि कशाची आवश्यकता आहे याची खबरदारी घेणार कोण, हा एक मोठा प्रश्न आहे.बसप्रवासी निवारामध्ये विद्यार्थ्यांची मदत करणार कोण याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहेत.याविषयीची माहिती गावातील शाळा, कॉन्व्हेंट व पोलीस स्टेशनला दिली आहे. चक्क प्रकाश देणारे स्ट्रीट लाईट लवकरच लावण्यात येईल, अशी माहिती भ्रमणध्वनीद्वारे मिळाली.-जयश्री कुंभलकर,सरपंच अड्याळ.