शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

घरकूल लाभार्थ्यांची बोळवण

By admin | Updated: May 25, 2016 01:17 IST

घरकुल लाभार्थ्याला शासनाकडुन घरकुलचा मोफत लाभ मिळत असला तरी प्रशासनाच्या चुकीमुळे वेळेवर देयेके मिळत नसल्याने नको रे बाबा घरकुल म्हनण्याची वेळ आली आहे.

लाभार्थ्यांची पायपीट : ८६ लाभार्थ्यांच्या घरकुलाचा निधी गेला परतप्रमोद प्रधान लाखांदूरघरकुल लाभार्थ्याला शासनाकडुन घरकुलचा मोफत लाभ मिळत असला तरी प्रशासनाच्या चुकीमुळे वेळेवर देयेके मिळत नसल्याने नको रे बाबा घरकुल म्हनण्याची वेळ आली आहे. पुर्ण घरकुल बांधकामावर १ लक्ष १० हजार लिहिण्यास सांगितल्यानंतर १० हजार रुपये कमी मिळाल्याने आपली फसगत झाल्याची ओरड लाभार्थ्यांमधे सुरु आहे.लाखांदूर तालुक्यात सन २०१४-१५ ला ५९१ घरकुल बांधकामाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. अनेक तांत्रिक अडचणीमुळे आता हे लाभार्थी आर्थीक अडचणीत सापडले आहेत. ईंदिरा आवास योजने अंतर्गत तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना १ लक्ष रुपयाचे अनुदान तसेच निर्मल भारत अभियान कडुन ४ हजार ६०० रुपये व महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५ हजार ४०० रुपये शौचालय बांधकामाचे असे एकुण १ लक्ष १० हजाराचे अनुदान मिळणार म्हणुन लाभार्थी आनंदात होते. ५९१ लाभार्थ्यानी शासनाच्या निधिची प्रतिक्षा न करता आज ना उद्या निधि मिळेल म्हणु उसनवार व व्याजाने रक्कम काढुन घरकुल व शौचालयाचे बांधकाम पुर्ण केले. लाभार्थ्याला पहिला व दुसरा हप्ता उशिरा का होईना मिळाला. परंतु शेवटचा हप्ता अंतीम देयके मिळण्यासाठी आता पंचायत समीतीमध्ये पायपीट करावी लागत आहे.पंचायत समिती कार्यालयात जावुन अधिकची माहिती घेतली असता त्या ८६ लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाचा निधी मार्च एंडिंग मुळे शासनाकडे परत गेला असुन आता तो निधी मिळणार की नाही याबद्द्ल बोलण्यास एकही अधिकारी व कमर्चारी पुढे येत नसल्याचे दिसुन येत आहे. स्वत: लाभार्थ्याने उसनवार करुन पुर्ण केलेल्या घरकुल बांधकामाचा मिळणार की नाहि म्हणुन लाभार्थी संभ्रमावस्थेत आहे. त्या ८६ घरकुल लाभार्थ्यांची दररोज पंचायत समिती कार्यालयात पायपीठ सुरु एकुण घेणारा कुणीही नसल्याने घरकुल नको रे बाबा म्हणन्याची वेळ त्यांचेवर येवुन ठेपली आहे.फक्त एक लाखाचा निधी मिळालाघरकूल बांधकामाबद्द्ल दुसरा प्रकार गंभीर आहे. इंदिरा आवास योजने अंतर्गत तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याना १ लक्ष रुपयाचे अनुदान तसेच निर्मल भारत अभियान कडुन ४ हजार ६०० रुपये व महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ५ हजार ४०० रुपये शौचालय बांधकामाचे असे एकुण १ लक्ष १० हजाराचे अनुदान मिळणार म्हणून लाभार्र्थी आनंदात होते. परंतु घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फक्त १ लाखाचा निधी लाभार्थ्याला देण्यात आला. घरकुलावर शासनाचे माहिती फलक व मिळणारे अनुदान लिहिण्यात आले. एकिकडे १ लक्ष १० हजाराच्या निधितुन घरकुलाचे बांधकम झाल्याचे घरकुलावर असताना १० हजाराचा निधी कमी का देण्यात आला. असा प्रश्न लाभार्थ्याला पडला. या संदर्भात पंचायत समिती कार्यालयात सदर प्रतिनीधीने माहिती घेतली असता कुणीही बोलण्यास सक्षम दिसून आले नाही. यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे योजना फसवी कि अधिकारी फसवे असा प्रश्न लाभार्थ्यापुढे नक्कीच पडला. मार्च एंडिंग मुळे परत गेलेला निधी परत लाभार्थ्याला मिळणार काय व उरलेला १० हजाराचा निधी मिळणार का म्हणुन लाभार्थी प्रतीक्षेत आहेत.