शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 00:57 IST

तालुक्यातील कोष्टी येथील अल्पभूधारक शेतकरी सेवकराम परसराम पंचबुध्दे (४६) यांनी सततच्या नापीकीला कंटाळत, कर्जापायी स्वत:च्या शेतावर कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी कोष्टी येथे घडली होती.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील कोष्टी येथील अल्पभूधारक शेतकरी सेवकराम परसराम पंचबुध्दे (४६) यांनी सततच्या नापीकीला कंटाळत, कर्जापायी स्वत:च्या शेतावर कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दोन महिन्यापूर्वी कोष्टी येथे घडली होती. सदर आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनाने तात्काळ त्या मृतकांच्या कुंटुबियांना १५ लक्ष रुपये आर्थिक मदत करावी, अशी मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.मृतक शेतकरी सेवकराम पंचबुध्दे यांनी आपल्या शेतातील अर्धा एकराचा ऊस माणस अँग्रो साखर कारखाना युनिट क्रमांक चारला विकला होता.परंतू सदर ऊस हा कारखान्यात मृतकाच्या नावावर न चढवता त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर चढवून एक प्रकारे फसवणूक करीत त्यांच्यावर अन्याय केल्याचा आरोप मृतकांच्या कुंटुबियांना केला.मृतक शेतकºयाने देव्हाडा माणस साखर कारखाना प्रशासनाला विकलेल्या ऊसाचा चुकारा हा वेळेवर मिळत नव्हता. सदर मोबदल्याविषयी वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासनाने मोबदला दिला नाही. त्यामुळे त्या शेतकºयाचे मानसिक संतुलन बिघडले. आता ऊसाचा मोबदला मिळणार नाही, कुटुबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, मुलांचे शिक्षण, पुर्वीच्या कर्जाची परतफेड कशी करायची, मुलींच्या लग्नाची चिंता या आर्थिक विवंचनेत तो सापडला होता. त्यामुळे त्यांनी नैराशाच्या खाईत लोटत आपल्या शेतावरील कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून स्वत:ची जिवनयात्रा संपवली.त्यांच्या आत्महत्यामुळे कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. मृतकाला माणस अँग्रो साखर कारखाना व्यवस्थापनाकडून वेळेवर ऊसाच्या चुकारा मिळाला असता तर त्याने मृत्युला कवटाळले नसते, त्यामुळे त्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मृत्युस देव्हाडा येथील साखर कारखाना प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांसमवेत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने केला आहे. त्यामूळे त्या आत्महत्याग्रस्त कुटूबियांना तात्काळ १५ लक्ष रूपयांचे आर्थिक मदत देण्याची मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विश्वास बडवाईक, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बालपांडे, कैलाश तितीरमारे, विक्रम कांबळे, प्रकाश नगरधने, अजय गौपाले, जितु सार्वे, कालीदास वनवे, आत्महत्याग्रस्त शेतकºयाची पत्नी, कुटुंब आदींनी जिल्हाधिकारी, तसेच कारखाना व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली.मागणीची पुर्ततान झाल्यास देव्हाडा साखर कारखानासमोर आत्महत्याग्रस्त कुटूबियांसमवेत जनआंदोलन करण्याचा ईशारा निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड