शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

भंडारा खनिकर्म पथकाची पांजरा रेती घाटावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST

तुमसर: तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रेती घाटाचा लिलाव नसताना मागील अनेक दिवसांपासून सर्वांत जास्त रेतीची चोरी सुरू आहे. भंडारा ...

तुमसर: तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रेती घाटाचा लिलाव नसताना मागील अनेक दिवसांपासून सर्वांत जास्त रेतीची चोरी सुरू आहे. भंडारा येथील खनिकर्म पथकाने शनिवारी सकाळी धडक दिली. दरम्यान, रेती घाटातील १३ ट्रॅक्टरचालकांनी रेती रिकामी करून पसार झाले. सदर १३ ट्रॅक्टरचालकांविरुद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रेती तस्करांत एकच खळबळ माजली आहे.

पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदीपात्रात गुणवत्तापूर्ण रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मागील काही दिवसांपासून रेती तस्करांनी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. याबाबत भंडारा येथील खनिकर्म विभागाला माहिती मिळाली. त्या आधारावर खनिकर्म विभागाच्या पथकाने पांजरा येथील घाटावर शनिवारी धडक दिली. रेती तस्करांनी ट्रॅक्टरमधील रेती रिकामी करून धूम ठोकली. खनिकर्म विभागाच्या पथकात कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे त्यांना पकडण्यात यश आले नाही. या घाटात समूहाने रेतीचे उत्खनन करण्यात येते. नदीपात्रात रेती उत्खनन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. अचानक धडक दिलेल्या पथकामुळे येथे तस्करांची भंबेरी उडाली.

रेती तस्करांनी कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टरमधील रेती रिकामी केली व ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. परंतु खनिकर्म विभागाच्या पथकाने ट्रॅक्टरच्या संख्येसह सविस्तर माहिती तुमसर तहसीलदारांना दिली. तहसीलदारांच्या निर्देशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात तेरा ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भा.दं.वि. ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉक्स

महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह:

राज्याच्या महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत नदीपात्रातील रेती चोरीप्रकरणी संबंधित गावातील तलाठी यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तुमसर तालुक्यातील पांजरा सोंड्या माडगी येथे मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे. सदर रेती घाट खनिकर्म विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू असताना महसूल प्रशासनाने कारवाई केल्याचे दिसत नाही, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तालुक्यात अर्थकारणाची चर्चा सुरू आहे. तालुक्यातील रेती घाट सुरक्षित नाहीत, त्यामुळे पर्यावरणासह महसुलाचे मोठे नुकसान होत आहे.