शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

भंडारा खनिकर्म पथकाची पांजरा रेती घाटावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:24 IST

तुमसर: तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रेती घाटाचा लिलाव नसताना मागील अनेक दिवसांपासून सर्वांत जास्त रेतीची चोरी सुरू आहे. भंडारा ...

तुमसर: तुमसर तालुक्यातील पांजरा येथील रेती घाटाचा लिलाव नसताना मागील अनेक दिवसांपासून सर्वांत जास्त रेतीची चोरी सुरू आहे. भंडारा येथील खनिकर्म पथकाने शनिवारी सकाळी धडक दिली. दरम्यान, रेती घाटातील १३ ट्रॅक्टरचालकांनी रेती रिकामी करून पसार झाले. सदर १३ ट्रॅक्टरचालकांविरुद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे रेती तस्करांत एकच खळबळ माजली आहे.

पांजरा गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. नदीपात्रात गुणवत्तापूर्ण रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध आहे. मागील काही दिवसांपासून रेती तस्करांनी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. याबाबत भंडारा येथील खनिकर्म विभागाला माहिती मिळाली. त्या आधारावर खनिकर्म विभागाच्या पथकाने पांजरा येथील घाटावर शनिवारी धडक दिली. रेती तस्करांनी ट्रॅक्टरमधील रेती रिकामी करून धूम ठोकली. खनिकर्म विभागाच्या पथकात कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची संख्या कमी होती. त्यामुळे त्यांना पकडण्यात यश आले नाही. या घाटात समूहाने रेतीचे उत्खनन करण्यात येते. नदीपात्रात रेती उत्खनन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. अचानक धडक दिलेल्या पथकामुळे येथे तस्करांची भंबेरी उडाली.

रेती तस्करांनी कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टरमधील रेती रिकामी केली व ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. परंतु खनिकर्म विभागाच्या पथकाने ट्रॅक्टरच्या संख्येसह सविस्तर माहिती तुमसर तहसीलदारांना दिली. तहसीलदारांच्या निर्देशानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात तेरा ट्रॅक्टर चालकाविरुद्ध भा.दं.वि. ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉक्स

महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह:

राज्याच्या महसूल मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत नदीपात्रातील रेती चोरीप्रकरणी संबंधित गावातील तलाठी यांना जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तुमसर तालुक्यातील पांजरा सोंड्या माडगी येथे मोठ्या प्रमाणात चोरी सुरू आहे. सदर रेती घाट खनिकर्म विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू असताना महसूल प्रशासनाने कारवाई केल्याचे दिसत नाही, त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तालुक्यात अर्थकारणाची चर्चा सुरू आहे. तालुक्यातील रेती घाट सुरक्षित नाहीत, त्यामुळे पर्यावरणासह महसुलाचे मोठे नुकसान होत आहे.