शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

दोन वर्षांत पूर्ण होणार बायपास रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:34 IST

मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जातो. नागपूरपासून मुजबीपर्यंत चारपदरी असलेला हा मार्ग भंडारा शहरात येताच दोन ...

मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून जातो. नागपूरपासून मुजबीपर्यंत चारपदरी असलेला हा मार्ग भंडारा शहरात येताच दोन पदरी होतो. त्यामुळे वाहतुकीचा मोठा ताण पडून आजवर अनेक अपघात झाले आहेत. सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागते. त्यामुळे नवीन बायपास रस्त्यासाठी वर्षभरापूर्वी खा. सुनील मेंढे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. ना. गडकरी यांनी नवीन बायपास रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. अलीकडेच या कामाचे टेंडर निघाले आहेत. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

सहापदरी असलेल्या या बायपास रस्त्याची लांबी १४ किलोमीटर असणार आहे. यासाठी ५६.८९ हे. आर जमीन १३ गावांमधून संपादित करायची होती. आजिमाबाद, बेला, भिलेवाडा, दवडीपार, दिघोरी, गिरोला, हंसापूर, खापा, कोरंभी, पलाडी, सालेबर्डी, सिरसघाट, उमरी येथील जमिनीचे संपादनाचे काम सुरू झाले होते. त्यातील ९० टक्के भूसंपादनाची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित भूसंपादन लवकरच होणार आहे. या रस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च ६१८.७५ कोटी रुपये असून भूसंपादन व युटिलिटी शिफ्टिंगसह ७३८ कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च यावर होणार आहे.

असा असेल नवीन बायपास मार्ग

प्रस्तावित बायपास मार्ग शहापूर, बेलावरून वळण घेऊन तीर्थक्षेत्र कोरंभी येथे वैनगंगेवर नवीन पूल बांधून गिरोला, भिलेवाडा मार्गावर चारपदरी रस्त्याला मिळणार आहे. या बायपास रस्त्याचे काम पूर्ण होताच सर्व प्रवासी व माल वाहतूक येथून वळवली जाईल. त्यामुळे दुपदरी राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताला आळा घालता येणार आहे. या रस्त्यावर उड्डाणपूल, चार मोठे पूल, सहा लहान वाहन भूमिगत रस्ते, सर्व्हिस रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार बस थांबे राहणार आहेत.