शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पावसाच्या सावटातही मोकळ्या जागेत धान खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:37 IST

पालांदूर परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदी सुरू करण्यात आली. गोदामाच्या क्षमतेपेक्षा अधिक धान खरेदी करीत शेतकऱ्यांना ...

पालांदूर परिसरात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धान खरेदी सुरू करण्यात आली. गोदामाच्या क्षमतेपेक्षा अधिक धान खरेदी करीत शेतकऱ्यांना न्याय देण्यात आला. भरडाई आदेश होऊन मालाची उचल होईल, अशी अपेक्षा होती, परंतु शासन व प्रशासनाच्या डोईजड धोरणाने अजूनही भरडाई आदेश मिलर्स धारकांनी स्वीकारलेले नाहीत. त्यामुळे पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यातील धान खरेदी प्रभावित झालेली आहे.

यात शेतकरी नाहक गोवला जात असून, त्याच्या सहनशीलतेचा अंत शासन-प्रशासन पाहत आहे.

गत तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. कित्येक शेतकऱ्याच्या धान्याची नासाडीही झालेली आहे. पोती फाटून धान मातीमोल झालेले आहेत. इतकी विदारक परिस्थिती लोकप्रतिनिधींना कळवूनही शासन व्यवस्था सुधारलेली नाही. मात्र, शेतकरी व आधारभूत धान खरेदी केंद्र यांचे जिवाभावाची सांगड असल्याने धान खरेदी केंद्र धारकांनी जोखीम पत्करत खुल्या नभाखाली धान खरेदी शेतकऱ्यांच्या साक्षीने सुरू केलेली आहे. धान खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना नियमित मिळत आहेत, परंतु अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची धान मोजणी अजूनही शिल्लक आहे. ३१ मार्च, २०२१ ही धान मोजणीची अंतिम तारीख ठरलेली आहे. अशा कठीण प्रसंगात शेतकऱ्यांचे धान मोजणे निश्चितच आवाक्याबाहेरचे दिसते. लोकप्रतिनिधी कर्तव्यात कसूर करीत असल्याने अन्नदाता हतबल ठरलेला आहे. धान खरेदी केंद्र धारकांना विनवणी करीत धान मोजणीकरिता साकडे घातले आहे. शेकडो शेतकरी दररोज स्वतःच्या धानाच्या देखरेखीकरिता केंद्रावर हजेरी लावीत आहेत.

मात्र, निद्रिस्त शासन व्यवस्था अजूनही शेतकऱ्यांच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करीत आहे.

गणराज बाबा सुशिक्षित बेरोजगार धान खरेदी केंद्र मेंगापूर अंतर्गत २८ जानेवारीपर्यंत ८६१ शेतकऱ्यांचे २५५०८.८० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आलेली आहे. यातील ७६५ शेतकऱ्यांचे ४,२५,५३,७८७.२० चुकारे शेतकऱ्यांना मिळालेली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांचे चुकारेही लवकर येतील, अशी आशा आहे.

चौकट /डब्बा

हमीभावाने धान खरेदीला तीन महिने लोटल्यानंतरही शासनाने धानाच्या भरडाईचे दर अद्यापही निश्चित केलेले नसल्याने, धान भरडाईचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शासनाचे स्वतःची गोदाम व्यवस्था तोडगी असल्याने खासगी गोदाम व्यवस्थेवर धान खरेदीची दार-मदार आहे. शासनाने किमान शेतकरी हितार्थ तरी एक पाऊल मागे घेत, धान भरडाई प्रश्नावर मिलर्स ना सकारात्मकरीत्या सहकार्य करणे नितांत गरजेचे आहे. शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेश शासनाच्या धरतीवर महाराष्ट्रातील धान भरडाईचे नियोजन आखणी झाल्यास निश्चितच महाराष्ट्रातील भरडाईचा प्रश्न निकाली लागेल, यात शंका नाही!