शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

बाह्मणीत घरकुलांचा घोळ !

By admin | Updated: May 8, 2015 00:43 IST

घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते.

तुमसर : घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते. परंतु बाम्हणी (माडगी) येथे गरजूंना घरकुल मंजूर झाले नाही. उलट श्रीमंतांना घरकुल देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.वैनगंगा नदी काठावर बाम्हणी (माडगी) हे तीन ते साडे तीन हजार लोकवस्तीचे जुने गाव आहे. या गावात शेतकरी कुटुंब तथा मोलमजूरी करणारे ओबीसी, कोळी, दलित बांधव राहतात. परंतु ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.बाम्हणी येथे ग्रामपंचायत कार्यालयापासून केवळ चार फूटावर प्रल्हाद श्रावण सेलोकर (४८) यांचे कुटुंब पडक्या झोपडीत वास्तव्याला आहे. कुटुंबात प्रल्हाद, तयंच्या पत्नी मीरा व मुलगी मीना (१७) यांचा समावेश आहे. दोन मुलींचे लग्न झाले. तुमसर येथे हे कुटुंब कंत्राटदाराजवळ कामावर जाते. मुलगी मीनाने इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली आहे. या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळते. घरी शौचालय नाही. घरकुलाकरिता अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. घर केव्हा कोसळेल या भितीने त्यांना ग्रासले आहे. दोन पिढ्या या घरात राहत होत्या. घरी शेती नाही. पुरात एकदा घर पडले होते. तेव्हा शासनाने दोन हजाराची आर्थिक मदत दिली होती. नियमित ग्रामपंचायतीला घरकर देत आहे. दोन वर्षापूर्वी गावात १० ते १२ घरकुल देण्यात आले. परंतु आम्ही त्यापासून वंचित राहिलो. अशी तक्रार प्रल्हाद सेलोकर यांनी दिली. दुसरे कुटुंब ईस्तारू मोडकू मेश्राम (६६) आंबेडकर वॉर्डात राहतात. त्यांना एक मुलगा दोडकू (३२) आहे. त्यांना दोन मुले आहेत. कोळी समाज बांधव असलेले मेश्राम कुटुंबियांचे सुद्धा पडक्या स्थितीत आहे. अनेकदा विनंती घरकुलाकरिता केली. परंतु घरकुल मंजूर केले नाही.आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर सुद्धा गावात घरकुल मिळाले नाही अशी खंत इस्तारू मेश्राम यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली. घरात वास्तव्य करताना सतत भिती वाटते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.रविंद्र तेजराम चावके यांची झोपडी शेवटची घटका मोजत आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. चावके यांच्या कुटुंबात दोन मुले व पत्नी आहे. घर केव्हा कोसळेल याचा नेम नाही. चावके सुद्धा हातावर आणून पानावर खातात. बाम्हणी येथे दलित बांधवांची १० ते १२ कुटुंब वास्तव्याला आहेत. शासनाचा निधी खास त्यांच्याकरिता राखीव असतो. परंतु या वस्तीत सुद्धा या कुटुंबाकरिता विकास कामे झाली नाहीत. असा आरोप दलित बांधवांनी लावला आहे.प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत विकासकामांचे नियोजन करण्याचा दावा करते. परंतु गरीब वंचितांना मात्र येथे न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे. (तालुका प्रतिनिधी)