शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

बाह्मणीत घरकुलांचा घोळ !

By admin | Updated: May 8, 2015 00:43 IST

घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते.

तुमसर : घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते. परंतु बाम्हणी (माडगी) येथे गरजूंना घरकुल मंजूर झाले नाही. उलट श्रीमंतांना घरकुल देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.वैनगंगा नदी काठावर बाम्हणी (माडगी) हे तीन ते साडे तीन हजार लोकवस्तीचे जुने गाव आहे. या गावात शेतकरी कुटुंब तथा मोलमजूरी करणारे ओबीसी, कोळी, दलित बांधव राहतात. परंतु ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.बाम्हणी येथे ग्रामपंचायत कार्यालयापासून केवळ चार फूटावर प्रल्हाद श्रावण सेलोकर (४८) यांचे कुटुंब पडक्या झोपडीत वास्तव्याला आहे. कुटुंबात प्रल्हाद, तयंच्या पत्नी मीरा व मुलगी मीना (१७) यांचा समावेश आहे. दोन मुलींचे लग्न झाले. तुमसर येथे हे कुटुंब कंत्राटदाराजवळ कामावर जाते. मुलगी मीनाने इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली आहे. या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळते. घरी शौचालय नाही. घरकुलाकरिता अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. घर केव्हा कोसळेल या भितीने त्यांना ग्रासले आहे. दोन पिढ्या या घरात राहत होत्या. घरी शेती नाही. पुरात एकदा घर पडले होते. तेव्हा शासनाने दोन हजाराची आर्थिक मदत दिली होती. नियमित ग्रामपंचायतीला घरकर देत आहे. दोन वर्षापूर्वी गावात १० ते १२ घरकुल देण्यात आले. परंतु आम्ही त्यापासून वंचित राहिलो. अशी तक्रार प्रल्हाद सेलोकर यांनी दिली. दुसरे कुटुंब ईस्तारू मोडकू मेश्राम (६६) आंबेडकर वॉर्डात राहतात. त्यांना एक मुलगा दोडकू (३२) आहे. त्यांना दोन मुले आहेत. कोळी समाज बांधव असलेले मेश्राम कुटुंबियांचे सुद्धा पडक्या स्थितीत आहे. अनेकदा विनंती घरकुलाकरिता केली. परंतु घरकुल मंजूर केले नाही.आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर सुद्धा गावात घरकुल मिळाले नाही अशी खंत इस्तारू मेश्राम यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली. घरात वास्तव्य करताना सतत भिती वाटते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.रविंद्र तेजराम चावके यांची झोपडी शेवटची घटका मोजत आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. चावके यांच्या कुटुंबात दोन मुले व पत्नी आहे. घर केव्हा कोसळेल याचा नेम नाही. चावके सुद्धा हातावर आणून पानावर खातात. बाम्हणी येथे दलित बांधवांची १० ते १२ कुटुंब वास्तव्याला आहेत. शासनाचा निधी खास त्यांच्याकरिता राखीव असतो. परंतु या वस्तीत सुद्धा या कुटुंबाकरिता विकास कामे झाली नाहीत. असा आरोप दलित बांधवांनी लावला आहे.प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत विकासकामांचे नियोजन करण्याचा दावा करते. परंतु गरीब वंचितांना मात्र येथे न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे. (तालुका प्रतिनिधी)