शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बाह्मणीत घरकुलांचा घोळ !

By admin | Updated: May 8, 2015 00:43 IST

घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते.

तुमसर : घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते. परंतु बाम्हणी (माडगी) येथे गरजूंना घरकुल मंजूर झाले नाही. उलट श्रीमंतांना घरकुल देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.वैनगंगा नदी काठावर बाम्हणी (माडगी) हे तीन ते साडे तीन हजार लोकवस्तीचे जुने गाव आहे. या गावात शेतकरी कुटुंब तथा मोलमजूरी करणारे ओबीसी, कोळी, दलित बांधव राहतात. परंतु ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.बाम्हणी येथे ग्रामपंचायत कार्यालयापासून केवळ चार फूटावर प्रल्हाद श्रावण सेलोकर (४८) यांचे कुटुंब पडक्या झोपडीत वास्तव्याला आहे. कुटुंबात प्रल्हाद, तयंच्या पत्नी मीरा व मुलगी मीना (१७) यांचा समावेश आहे. दोन मुलींचे लग्न झाले. तुमसर येथे हे कुटुंब कंत्राटदाराजवळ कामावर जाते. मुलगी मीनाने इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली आहे. या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळते. घरी शौचालय नाही. घरकुलाकरिता अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. घर केव्हा कोसळेल या भितीने त्यांना ग्रासले आहे. दोन पिढ्या या घरात राहत होत्या. घरी शेती नाही. पुरात एकदा घर पडले होते. तेव्हा शासनाने दोन हजाराची आर्थिक मदत दिली होती. नियमित ग्रामपंचायतीला घरकर देत आहे. दोन वर्षापूर्वी गावात १० ते १२ घरकुल देण्यात आले. परंतु आम्ही त्यापासून वंचित राहिलो. अशी तक्रार प्रल्हाद सेलोकर यांनी दिली. दुसरे कुटुंब ईस्तारू मोडकू मेश्राम (६६) आंबेडकर वॉर्डात राहतात. त्यांना एक मुलगा दोडकू (३२) आहे. त्यांना दोन मुले आहेत. कोळी समाज बांधव असलेले मेश्राम कुटुंबियांचे सुद्धा पडक्या स्थितीत आहे. अनेकदा विनंती घरकुलाकरिता केली. परंतु घरकुल मंजूर केले नाही.आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर सुद्धा गावात घरकुल मिळाले नाही अशी खंत इस्तारू मेश्राम यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली. घरात वास्तव्य करताना सतत भिती वाटते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.रविंद्र तेजराम चावके यांची झोपडी शेवटची घटका मोजत आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. चावके यांच्या कुटुंबात दोन मुले व पत्नी आहे. घर केव्हा कोसळेल याचा नेम नाही. चावके सुद्धा हातावर आणून पानावर खातात. बाम्हणी येथे दलित बांधवांची १० ते १२ कुटुंब वास्तव्याला आहेत. शासनाचा निधी खास त्यांच्याकरिता राखीव असतो. परंतु या वस्तीत सुद्धा या कुटुंबाकरिता विकास कामे झाली नाहीत. असा आरोप दलित बांधवांनी लावला आहे.प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत विकासकामांचे नियोजन करण्याचा दावा करते. परंतु गरीब वंचितांना मात्र येथे न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे. (तालुका प्रतिनिधी)