शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

धानपीक जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:51 IST

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : यावर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुडा किडीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपीक फस्त केले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या चिचोली येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले.चिचोली येथील रामदास नैताम, शालीक समरीत, शीतल मेश्राम, अश्विन मोटघरे, रघुनाथ समरत, मंगेश समरीत यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांच्या धानपिकावर प्रादुर्भाव होऊन पीक फस्त झाले आहे.किडीमुळे यावर्षी ...

ठळक मुद्देचिचोली येथील प्रकार : नापिकीमुळे शेतकरी त्रस्त

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : यावर्षी लाखांदूर तालुक्यात तुडतुडा किडीने हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपीक फस्त केले आहे. त्यामुळे नैराश्य आलेल्या चिचोली येथील दोन शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले.चिचोली येथील रामदास नैताम, शालीक समरीत, शीतल मेश्राम, अश्विन मोटघरे, रघुनाथ समरत, मंगेश समरीत यांच्यासह गावातील अन्य शेतकऱ्यांच्या धानपिकावर प्रादुर्भाव होऊन पीक फस्त झाले आहे.किडीमुळे यावर्षी एक रूपयाचेही धान मिळणे कठीण झाल्यामुळे रामदास नैताम व शालीक समरीत यांनी बुधवारला शेतातील धानपिक जाळून टाकले. असे असताना कृषी विभाग शेतात जावून प्रत्यक्ष पाहणी न करता टेबलावर सर्वेक्षण करून अहवाल पाठवित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना शेतकऱ्यांचे बळी गेले. कुठे तीव्र कीटकनाशकांच्या फवारणीमुळे जिवीतहानी तर कुठे फवारणीअभावी पीक हानी झाल्याचे वास्तव आहे. शेतकरी पिकांच्या संरक्षणार्थ विविध कीटकनाशकांची फवारणी करीत आहे मात्र पीक वाचविण्याच्या नादात त्याचाच मृत्यू झाल्याचे वास्तव पुढे आले आहे. धान उत्पादनात अग्रेसर भंडारा जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे जीव जाईल या भीतीपोटी अनेकांनी फवारणी टाळली. फवारणी टाळल्याने अनेक भागात तुडतुडा या किडीसह अन्य किडीची लागण होऊन हजारो हेक्टर क्षेत्रातील धानपिक नष्ट झाले आहे. धानपीकाच्या लोंबी भरल्या असताना किडीमुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला. उत्पादन खर्चावर आधारित धानाला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे. परिणामी कर्जबाजारी व नापिकीच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकलेला असतानाही धान उत्पादक शेतकऱ्यांविषयी लोकप्रतिनिधी बोलण्यासाठी तयार नसल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.तुडतुडा या किडीमुळे हातात आलेले धानपिक नष्ट झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतातील धानपीक जाळले आहे. प्रशासनाने आतातरी या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप बुराडे यांनी केली आहे.