शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

सुरक्षेचे दंडुके पेलवणाऱ्या हातात स्वच्छतेसाठी झाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 22:09 IST

सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू दिसले.

ठळक मुद्देवरठी पोलिसांचा उपक्रम : पोलीस ठाणे परिसरासह रस्त्यावर स्वच्छता अभियान

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सुरक्षा व सुव्यवस्थाची जबाबदारी पोलिसांवर असते. हातात दंडुके व जबादारी दिलेल्या भागात शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलीस विभागाची दमछाक नेहमी पाहायला मिळते. कायदा व सुवव्यस्था सांभाळण्यासाठी गावातील गुन्हेगारी साफ करणाऱ्या पोलिसांच्या हातात परिसर स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू दिसले. खाकी वर्दी दिसली की अनेकांना घाम फुटतो पण ही खाकी वर्दी स्वच्छता मोहीम राबवताना झळकली. गुन्हेगारी सफाई प्रमाणे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी वरठी पोलिसांनी घेतलेले पुढाकार चर्चेचा तेवढाच आकर्षणाचा विषय आहे.वरठी येथील जगनाडे चौकातील जैन मंदिर परिसरात पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाणे भाड्याच्या घरात असून त्या समोरील भागात जागेची वाणवा आहे. पार्कींगची सोय नाही. पोलीस ठाणे समोरील भागात असलेल्या खुल्या जागेत घाण व कचरा पडून होता. वरठी-भंडारा मार्गावर असलेल्या पोलीस ठाणेला जाणाºया वळण मार्गावरील रस्त्याच्या कडेला मोठा खड्डा आहे. त्या भागात कचरा वाढल्याने पोलीस ठाणेचे 'लुक' जनावरांच्या गोठ्यासारखे दिसत होते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण होते. परिसरात पसरलेली घाण व कचरा लक्षात घेऊन नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक एस.बी. ताजने यांनी स्वच्छता मोहीम हातात घेतली. पोलीस ठाणे समोरील जागेत सपाटीकरण करून व्यायाम व खेळण्यासाठी मैदान तयार केले. रस्त्याच्या कडेला उगवलेले कचरा व घाण स्वच्छ करण्यात आली.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत, हवालदार सचिन गभने, छाया मेश्राम, भारती टेकाम, राकेश बोरकर, कुंदन फुलबांधे, त्रिमूर्ती लांडगे, संदीप बनते व नंदकिशोर मारबते यांनी स्वत: हातात फावडे व झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. या भागात राहणारे पंचायत समिती माजी सदस्य रवी येळणे यांना माहिती मिळताच तेही हातात फावडा घेऊन सहभागी झाले. पोलीस ठाणे व रस्त्याच्या पलीकडचे संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आले.पोलिसांना कामाचा प्रचंड ताण असतो. २४ तास अलर्ट रहावे लागते. कधी कोणती घटना घडणार आणि कुठं धावत जावे लागणार याचा नेम नाही. यामुळे या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळ राखून स्वत: ला सज्ज ठेवावे लागते. आॅन ड्युटी त्यांना खूप कमी वेळ आरामासाठी मिळतो. वेळप्रसंगी येणाऱ्या आवाहनाला तयार ठेवण्यासाठी सवड मिळाल्यावर रिलॅक्स ठेवणे आवश्यक असते. अशा रिकाम्या वेळचा सदुपयोग पोलिसांनी स्वच्छता मोहिमेकरिता राखून ठेवला आहे. गत अनेक दिवसांपासून सवड मिळताच स्वच्छता मोहीम फत्ते करण्यावर भर देतात. पोलीस ठाण्यासमोरील अख्खे परिसर त्यांनी स्वत: स्वच्छ करून खेळण्याचे मैदान तयार केले. यासोबत मुख्य मार्गावर असलेले कचरा आणि घाण साफ करून लगतच्या भागात वृक्षारोपण करण्याचे मानस असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांना रस्त्यावर साफसफाई करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर बघ्याची गर्दी जमली होती. स्वच्छेतेचा हा आदर्श नुसते बघ्याच्या स्वरूपात पाहून गावात चर्चिल्या जाणार की यापासून बोध घेऊन प्रत्येकजण ही जबाबदारी म्हणून ही योजना अमलात आणेल हा यक्ष प्रश्न आहे. स्वच्छता हि एकाची नाही तर संपूर्ण गावातील नागरिकांची जबाबदारी आहे.