शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

बैलही गेला..अन् नांगरही

By admin | Updated: November 20, 2015 01:33 IST

कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे ....

उरल्या केवळ आठवणी : आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीतमोहाडी : कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. दुष्काळी परिस्थतीने बेजार झालेल्या शेतकऱ्याला बदलत्या परिस्थितीत घडामोडींचाही फटका बसत आहे. पारंपारिक औजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलजोडीचे अस्तित्व धोक्यात असताना त्यांच्या जोडीला असणारा नांगरही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.भल्या पहाटे डोक्यावर पारंपारिक नांगर, पुढे बैलांची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले टाकणारा बळीराजा शेतात उभा राहून आधुनिक यंत्राद्वारे होणारी नांगरणी पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतामध्ये नांगरणीसाठी राबराब राबणारी बैलांची जोडी हाकताना शेतकऱ्यांच्या मुखातून घुमणारा आवाज दमला असून अत्याधुनिक यंत्राचा आवाज शिवारात घुमत आहे. ग्रामीण व खेड्यापाड्यांतील सर्रास शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केल्याने नांगरासह पारंपारिक साधने दिसेनाशी होऊ लागली आहेत. बळीराजाने बैलजोड्यांकडे पाठ फिरविल्याने शेतीसाठी वापरला जाणारा नांगरही दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे शेतात नांगर ओढणाऱ्या बैलांच्या जोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. शेती कामासाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, जेसीबी विद्युत मोटारींसारख्या उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. सध्या शेतकरी सर्वच बाजुंनी संकटात सापडला आहे. दुष्काळाची दाहकता वाढली असून सिंचनाची समस्या उभी ठाकली आहे.शेतातील कामे यांत्रिकीकरणामुळे सोपी व जलद होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. कृषिप्रधान देशात शेतीच्या कामाकडे युवावर्गाने नाक मुरडल्याने जमीनदार व शेतीमालकही शेती करण्याबाबत निरुत्साही बनले आहेत. पारंपारिक शेती व्यवसायात आधुनिक यंत्रसामुग्रींनी केलेली आगेकूच पाहता शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा बळीराजाच्या खिशाला अधिक चाट देणारी आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेती मशागतीसाठी होणारा खर्च, रासायनिक खते, कीटकनाशके, जास्त पीक देणारी बी-बियाणे, मजुरांची देणी अशी शेतीच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. त्याबदल्यात मिळणारे उत्पन्न आणि हमीभाव याची शाश्वती देता येत नाही. शेतीचे झपाट्याने आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीत आल्याचा विरोधाभास व्यक्त होत असतो. (शहर प्रतिनिधी)