शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

बैलही गेला..अन् नांगरही

By admin | Updated: November 20, 2015 01:33 IST

कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे ....

उरल्या केवळ आठवणी : आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीतमोहाडी : कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. दुष्काळी परिस्थतीने बेजार झालेल्या शेतकऱ्याला बदलत्या परिस्थितीत घडामोडींचाही फटका बसत आहे. पारंपारिक औजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलजोडीचे अस्तित्व धोक्यात असताना त्यांच्या जोडीला असणारा नांगरही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.भल्या पहाटे डोक्यावर पारंपारिक नांगर, पुढे बैलांची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले टाकणारा बळीराजा शेतात उभा राहून आधुनिक यंत्राद्वारे होणारी नांगरणी पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतामध्ये नांगरणीसाठी राबराब राबणारी बैलांची जोडी हाकताना शेतकऱ्यांच्या मुखातून घुमणारा आवाज दमला असून अत्याधुनिक यंत्राचा आवाज शिवारात घुमत आहे. ग्रामीण व खेड्यापाड्यांतील सर्रास शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केल्याने नांगरासह पारंपारिक साधने दिसेनाशी होऊ लागली आहेत. बळीराजाने बैलजोड्यांकडे पाठ फिरविल्याने शेतीसाठी वापरला जाणारा नांगरही दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे शेतात नांगर ओढणाऱ्या बैलांच्या जोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. शेती कामासाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, जेसीबी विद्युत मोटारींसारख्या उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. सध्या शेतकरी सर्वच बाजुंनी संकटात सापडला आहे. दुष्काळाची दाहकता वाढली असून सिंचनाची समस्या उभी ठाकली आहे.शेतातील कामे यांत्रिकीकरणामुळे सोपी व जलद होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. कृषिप्रधान देशात शेतीच्या कामाकडे युवावर्गाने नाक मुरडल्याने जमीनदार व शेतीमालकही शेती करण्याबाबत निरुत्साही बनले आहेत. पारंपारिक शेती व्यवसायात आधुनिक यंत्रसामुग्रींनी केलेली आगेकूच पाहता शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा बळीराजाच्या खिशाला अधिक चाट देणारी आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेती मशागतीसाठी होणारा खर्च, रासायनिक खते, कीटकनाशके, जास्त पीक देणारी बी-बियाणे, मजुरांची देणी अशी शेतीच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. त्याबदल्यात मिळणारे उत्पन्न आणि हमीभाव याची शाश्वती देता येत नाही. शेतीचे झपाट्याने आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीत आल्याचा विरोधाभास व्यक्त होत असतो. (शहर प्रतिनिधी)