शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बैलही गेला..अन् नांगरही

By admin | Updated: November 20, 2015 01:33 IST

कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे ....

उरल्या केवळ आठवणी : आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीतमोहाडी : कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारत देशात शेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे बळीराजाने गुडघे टेकल्याचे दिसत आहे. दुष्काळी परिस्थतीने बेजार झालेल्या शेतकऱ्याला बदलत्या परिस्थितीत घडामोडींचाही फटका बसत आहे. पारंपारिक औजारे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. बैलजोडीचे अस्तित्व धोक्यात असताना त्यांच्या जोडीला असणारा नांगरही कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.भल्या पहाटे डोक्यावर पारंपारिक नांगर, पुढे बैलांची जोडी हाकत शेताच्या दिशेने पावले टाकणारा बळीराजा शेतात उभा राहून आधुनिक यंत्राद्वारे होणारी नांगरणी पाहत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतामध्ये नांगरणीसाठी राबराब राबणारी बैलांची जोडी हाकताना शेतकऱ्यांच्या मुखातून घुमणारा आवाज दमला असून अत्याधुनिक यंत्राचा आवाज शिवारात घुमत आहे. ग्रामीण व खेड्यापाड्यांतील सर्रास शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधुनिक साधनांचा वापर करण्यास सुरुवात केल्याने नांगरासह पारंपारिक साधने दिसेनाशी होऊ लागली आहेत. बळीराजाने बैलजोड्यांकडे पाठ फिरविल्याने शेतीसाठी वापरला जाणारा नांगरही दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे शेतात नांगर ओढणाऱ्या बैलांच्या जोडीऐवजी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असून यांत्रिकीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येऊ लागला आहे. शेती कामासाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, जेसीबी विद्युत मोटारींसारख्या उपकरणांचा उपयोग करण्यात येत आहे. सध्या शेतकरी सर्वच बाजुंनी संकटात सापडला आहे. दुष्काळाची दाहकता वाढली असून सिंचनाची समस्या उभी ठाकली आहे.शेतातील कामे यांत्रिकीकरणामुळे सोपी व जलद होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत आहे. कृषिप्रधान देशात शेतीच्या कामाकडे युवावर्गाने नाक मुरडल्याने जमीनदार व शेतीमालकही शेती करण्याबाबत निरुत्साही बनले आहेत. पारंपारिक शेती व्यवसायात आधुनिक यंत्रसामुग्रींनी केलेली आगेकूच पाहता शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा बळीराजाच्या खिशाला अधिक चाट देणारी आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेती मशागतीसाठी होणारा खर्च, रासायनिक खते, कीटकनाशके, जास्त पीक देणारी बी-बियाणे, मजुरांची देणी अशी शेतीच्या खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. त्याबदल्यात मिळणारे उत्पन्न आणि हमीभाव याची शाश्वती देता येत नाही. शेतीचे झपाट्याने आधुनिकीकरण होत असताना शेती अडचणीत आल्याचा विरोधाभास व्यक्त होत असतो. (शहर प्रतिनिधी)