शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

‘बीटीबी’ने भाजी उत्पादकांना मिळते घामाचे दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:41 IST

शेतात पिकलेल्या पालेभाज्यांना बाजारात भाव मिळत नाही, अशी कायम ओरड शेतकऱ्यांची असते. परंतु भंडारा जिल्हा याला अपवाद आहे. येथे स्थापन झालेल्या ‘बीटीबी’ सब्जीमंडी असोसिएशनमुळे भाजी उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम योग्य मोबदल्यासह मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची गर्दी : स्थानिक भाजीपाल्यामुळे ग्राहकांनाही किफायतशीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतात पिकलेल्या पालेभाज्यांना बाजारात भाव मिळत नाही, अशी कायम ओरड शेतकऱ्यांची असते. परंतु भंडारा जिल्हा याला अपवाद आहे. येथे स्थापन झालेल्या ‘बीटीबी’ सब्जीमंडी असोसिएशनमुळे भाजी उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम योग्य मोबदल्यासह मिळत आहे. तर स्थानिक भाजीपाला ग्राहकांनाही किफायतशिर भावात उपलब्ध होत आहे. त्यामुळे या बाजारात भाजीपाला विकण्यासाठी शेतकºयांची तोबा गर्दी असते.भंडारा शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात बीटीबी सब्जीमंडी नावारुपास आली आहे. ताज्या भाजीपाल्याची उत्तम बाजारपेठ म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यातही ओळख झाली आहे. वैनगंगा आणि चुलबंद नदीच्या खोºयातील ताजा भाजीपाला दररोज या ठिकाणी विक्रीसाठी आणला जातो. जिल्ह्यातील आणि बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारीही येथे खरेदीसाठी येतात. स्थानिक स्तरावर बाजारपेठ आणि योग्य किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांची मुस्कटदाबीही थांबली आहे. बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांच्या दूरदृष्टीने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. दुसरीकडे ग्राहकांनाही शुद्ध आणि किफायतशीर भावाने भाजीपाला मिळत आहे.जिल्ह्यातील वांगे, टमाटर, मिरची, भेंडी, दोडका याची दररोज आवक होते. पाठविण्याचा आणि वाहतुकीचा खर्च न लागता स्थानिक बाजारात किफायतशीर भावात भाजीपाला उपलब्ध होत आहे. सध्या या बाजारात वांगे, मिरची, टमाटर, सांबार, दोडका, भेंडी, फुलकोबी याची मोठी आवक आहे. वांग्याला प्रतिकिलो ६ ते १० रुपये दर मिळत आहे. मिरची १८ ते २० रुपये प्रतिकिलो, टमाटर ८ ते १२ रुपये, सांबार ३० ते ३५ रुपये, दोडके १० ते २० रुपये, भेंडी १२ ते १४ रुपये, फुलकोबी १० ते १२ रुपये प्रतिकिलोचे दर शेतकºयांना मिळत आहे.शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून बीटीबीची स्थापना करण्यात आली. ११ लोकांची समिती यावर नियंत्रण ठेवते. दररोजच्या आवकाने कुटुंबाची बेरोजगारी दूर होत आहे. घरच्यांनाही काम मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच थांबत असल्याने विकासाला दिशा मिळाली आहे.बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी, भंडारा.