शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘बीटीबी’ने भाजी उत्पादकांना मिळते घामाचे दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 21:41 IST

शेतात पिकलेल्या पालेभाज्यांना बाजारात भाव मिळत नाही, अशी कायम ओरड शेतकऱ्यांची असते. परंतु भंडारा जिल्हा याला अपवाद आहे. येथे स्थापन झालेल्या ‘बीटीबी’ सब्जीमंडी असोसिएशनमुळे भाजी उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम योग्य मोबदल्यासह मिळत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची गर्दी : स्थानिक भाजीपाल्यामुळे ग्राहकांनाही किफायतशीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतात पिकलेल्या पालेभाज्यांना बाजारात भाव मिळत नाही, अशी कायम ओरड शेतकऱ्यांची असते. परंतु भंडारा जिल्हा याला अपवाद आहे. येथे स्थापन झालेल्या ‘बीटीबी’ सब्जीमंडी असोसिएशनमुळे भाजी उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम योग्य मोबदल्यासह मिळत आहे. तर स्थानिक भाजीपाला ग्राहकांनाही किफायतशिर भावात उपलब्ध होत आहे. त्यामुळे या बाजारात भाजीपाला विकण्यासाठी शेतकºयांची तोबा गर्दी असते.भंडारा शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात बीटीबी सब्जीमंडी नावारुपास आली आहे. ताज्या भाजीपाल्याची उत्तम बाजारपेठ म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यातही ओळख झाली आहे. वैनगंगा आणि चुलबंद नदीच्या खोºयातील ताजा भाजीपाला दररोज या ठिकाणी विक्रीसाठी आणला जातो. जिल्ह्यातील आणि बाहेरच्या जिल्ह्यातील व्यापारीही येथे खरेदीसाठी येतात. स्थानिक स्तरावर बाजारपेठ आणि योग्य किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांची मुस्कटदाबीही थांबली आहे. बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांच्या दूरदृष्टीने भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. दुसरीकडे ग्राहकांनाही शुद्ध आणि किफायतशीर भावाने भाजीपाला मिळत आहे.जिल्ह्यातील वांगे, टमाटर, मिरची, भेंडी, दोडका याची दररोज आवक होते. पाठविण्याचा आणि वाहतुकीचा खर्च न लागता स्थानिक बाजारात किफायतशीर भावात भाजीपाला उपलब्ध होत आहे. सध्या या बाजारात वांगे, मिरची, टमाटर, सांबार, दोडका, भेंडी, फुलकोबी याची मोठी आवक आहे. वांग्याला प्रतिकिलो ६ ते १० रुपये दर मिळत आहे. मिरची १८ ते २० रुपये प्रतिकिलो, टमाटर ८ ते १२ रुपये, सांबार ३० ते ३५ रुपये, दोडके १० ते २० रुपये, भेंडी १२ ते १४ रुपये, फुलकोबी १० ते १२ रुपये प्रतिकिलोचे दर शेतकºयांना मिळत आहे.शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून बीटीबीची स्थापना करण्यात आली. ११ लोकांची समिती यावर नियंत्रण ठेवते. दररोजच्या आवकाने कुटुंबाची बेरोजगारी दूर होत आहे. घरच्यांनाही काम मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच थांबत असल्याने विकासाला दिशा मिळाली आहे.बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जीमंडी, भंडारा.