शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

विविध समस्यांसाठी बसपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

भंडारा जिल्हा हा नैसर्गीक साधन संपत्तीने समृद्ध आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्यात पर्यटन व औद्योगिक विकास झालेला नसून आजही ...

भंडारा जिल्हा हा नैसर्गीक साधन संपत्तीने समृद्ध आहे. मात्र त्या तुलनेत जिल्ह्यात पर्यटन व औद्योगिक विकास झालेला नसून आजही जिल्हा रोजगाराच्यादृष्टीने मागास राहिलेला आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र निवडणुकीपुर्वी दिलेली आश्वासने आता प्रत्यक्षात पूर्ण होत नसल्याने तरूणांसह शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेवून भंडारा शहरासह जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी यावेळी निवेदनातून इंजि. नासरे यांनी केली आहे.

भंडाराचे रेल्वे स्थानक हे शहरापासून दूर अंतरावर वरठी येथे आहे. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच गैरसोय होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून रेल्वे स्थानक हे शहरात आणण्याची गरज आहे. अनेकदा ट्रेन उशिरा आल्यानंतर गोंदिया व नागपूर जिल्ह्यातून अपडाऊन करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना रात्री बसेस अथवा ॲटो अभावी वरठी ते भंडारा प्रवास काहीप्रसंगी पायीच करावा लागतो. अन्यथा आपल्या खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, ही वस्तुस्थिती आहे.

भंडारा शहरात रेल्वे समिती बनविली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी भंडारा शहरात रेल्वे स्थानक आणण्याची केलेली घोषणा हवेत विरली आहे. मागील काही वर्षात वरठी ते जवाहनगर असलेला २२ कि.मी.ची रेल्वे पटरी उखडून काढण्यात आली. मात्र हा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी नुकतेच वरठीपर्यंत मेट्रो रेल्वे येत असल्याचे सुतवाच केले आहे. त्यामुळे ही मेट्रो भंडारा शहरातून सुरू झाल्यास नागरिकांना सोयीचे होणार आहे. याशिवाय शासनाला महसूल देखील प्राप्त होवू शकतो. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर सर्वसामान्यांना वरठीला जावून नागपूरला जाणे खर्चिक ठरत आहे.

अनेक तालुक्यांना भंडारा शहरात रेल्वे स्थानक आल्यास सोयीचे होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी, शैक्षणिक, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी यापुर्वीही प्रशासनाला निवेदन दिले आहेत. यासाठी गेल्या काही दिवसापासून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचा विचार करून रेल्वे मेट्रोची सुविधा वरठी ते भंडारा शहरापर्यंत पुरविण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टी जिल्हा शाखा भंडाराच्यावतीने झोन प्रभारी इंजि. संजय नासरे, प्रदेश सचिव प्रा. जय मेश्राम, संघटनमंत्री यशवंत वैद्य, उमराव सेलोकर, डॉ. भैय्यालाल मेश्राम, गिरीष गजभिये, मनिषा गजभिये, हेमा गजभिये, भीमराव लोखंडे, चंद्रमणी गोंडाने यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.

बॉक्स

भंडारा शहरातून मेट्रो रेल्वे सुरू करा

सर्वच तालुक्यांच्या दृष्टीने भंडारा शहर हे सोयीचे आहे. यासाठी शासनासह लोकप्रतिनिधींनी वरिष्ठस्तरावर दखल घेवून मेट्रो रेल्वे भंडारा शहरातून सुरू करावी. यामुळे सामान्यांना दिलासा मिळून विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, शासकीय व खाजगी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोयीचे ठरणार आहे. यासाठी भंडारा शहरात मेट्रो सुरू व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.